नागा साधूंना '१५ मिनिटे' दिली तर...; टी राजा यांचा ओवैसींवर हल्लाबोल!

    25-Jan-2025
Total Views | 71

Tiger Raja Singh

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Tiger Raja Singh Kolhapur)
"सनातन धर्मावर जेव्हा जेव्हा संकट आले, नागा साधूनी हातात शस्त्रे घेऊन आक्रांतांना चोख प्रत्युत्तर दिले. त्याच नागा साधूंना '१५ मिनिटे' दिली तर इस्लामिक कट्टरपंथींचा चांगलाच धडा बसेल.", असे प्रतिपादन तेलंगणाचे भाजप आमदार टायगर राजा सिंह ठाकुर यांनी केले. सकल हिंदू समाजाच्या वतीने कोल्हापूरच्या शिरोली येथे आयोजित केलेल्या विराट हिंदू महासभेत ते बोलत होते.

एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांचे भाऊ अकबरुद्दीन ओवेसी यांनी आपल्या एका जाहीर सभेत '१५ मिनिटांसाठी पोलिसांना हटवले तर शंभर कोटी हिंदूंना संपवू' अशा प्रकारचे वादग्रस्त विधान केले होते. अकबरुद्दीन ओवेसीच्या या विधानावरून राजकारणात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. त्याच '१५ मिनिटांच्या' वक्तव्याला टी राजा यांनी कडक शब्दांत प्रत्युत्तर दिल्याचे दिसते आहे.


ते म्हणाले, हिंदूशी पंगा घ्यायची हिंमत करू नका. उत्तर प्रदेशात सुरु असलेल्या महाकुंभात लाखो नाही तर कोट्यावधी हिंदू त्रिवेणी संगमात पवित्र स्नान करण्यासाठी येत आहेत. त्यामध्ये येणाऱ्या साधूंमध्ये नागा साधूही आहेत. नागा साधू कधीच सार्वजनिक ठिकाणी येत नाहीत. ते कुंभाच्या वेळीच बाहेर पडतात. त्यांचा इतिहास पाहिला तर, सनातन धर्मावर आक्रमण करणाऱ्यांना त्यांनी चोख प्रत्युत्तर दिसे आहे. जेव्हा जेव्हा हिंदूंचा उदय झाला तेव्हा इतिहास लिहिला गेला.", असे म्हणत त्यांनी ओवैसी बंधुंना चपराक लगावल्याचे दिसते आहे.

अग्रलेख
जरुर वाचा
जन्म–मृत्यू बाबतच्या बोगस प्रमाणपत्रांना चाप! अधिनियमात सुधारणा; तात्काळ अंमलबजावणीचे महसूल मंत्र्यांचे निर्देश

जन्म–मृत्यू बाबतच्या बोगस प्रमाणपत्रांना चाप! अधिनियमात सुधारणा; तात्काळ अंमलबजावणीचे महसूल मंत्र्यांचे निर्देश

सरकारी व्यवस्थेतील उणीवांचा लाभ घेत जन्म-मृत्यू नोंदणीची प्रमाणपत्रे मिळविणाऱ्या परदेशी नागरिकांच्या हैदोसावर आता अंकुश बसणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवार, दि. १२ मार्च रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात निवेदन करून, विलंबाने करावयाच्या जन्म-मृत्यू नोंदीबाबतच्या कार्यपध्दतीनिश्चित केल्याचे सांगितले. तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार आजपासूनच महाराष्ट्रात नवीन बदल लागू होतील, अशी घोषणा केली...

लाठी मारी ते विधवांची होळी! महाराष्ट्राबाहेर होळी नेमकी कशी साजरी केली जाते ?

लाठी मारी ते विधवांची होळी! महाराष्ट्राबाहेर होळी नेमकी कशी साजरी केली जाते ?

होळी म्हणजे रंगांचा उत्सव. एका पौराणिक कथेनुसार हिरण्यकश्यपूची बहीण होलिका हिला अग्नी जाळू शकणार नाही असा वर मिळाला होता. हिरण्यकशपूने होलिकेला सांगितले की प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीवर बसावेस म्हणजे प्रल्हाद जळून मरेल आणि होलिका मात्र जिवंत राहील. हिरण्यकशपूचा सल्ला तिने ऐकला. परंतू प्रल्हादाने नारायणाचे नामस्मरण केल्याने होलिका जळून गेली आणि प्रल्हाद जिवंत राहिला या आनंदाप्रीत्यर्थ दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी प्रदोषकाली होलिकादहन केलं जाते. तसेच यावेळी दुष्ट प्रवृत्तीचा नाश व्हावा अशी प्रार्थना ..

स्वपक्षातील नेत्याच्या मुलाने तयार केलेलं चिन्ह हटवलं, हिंदीविरोधाच्य़ा नादात मुख्यमंत्री स्टॅलिन यांना पडला विसर! भाजप अध्यक्षांनी करुन दिली आठवण, म्हणाले...

स्वपक्षातील नेत्याच्या मुलाने तयार केलेलं चिन्ह हटवलं, हिंदीविरोधाच्य़ा नादात मुख्यमंत्री स्टॅलिन यांना पडला विसर! भाजप अध्यक्षांनी करुन दिली आठवण, म्हणाले...

(Tamil Nadu drops official Rupee Symbol from State Budget) तामिळनाडूमधील एमके स्टॅलिन यांचे सरकार आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून भाषेच्या मुद्द्यावर तणावाचे वातावरण आहे. यात आता तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन (M K Stalin) यांच्या निर्णयामुळे हा वाद पुन्हा पेटण्याची चिन्हे आहेत. तामिळनाडू सरकारने राज्याच्या २०२५-२६ च्या अर्थसंकल्पामध्ये रुपयाच्या चिन्हाऐवजी (₹) तमिळ भाषेतील रुबई मधील पहिले अक्षर ‘रु’ वापरण्याचा निर्णय घेतला आहे...