अयोध्या, मथुरा, काशीसाठी वचनबद्ध होतो, आहोत, भविष्यातही राहू!

विहिंपच्या केंद्रीय मार्गदर्शक मंडळ बैठकीत संतांची स्पष्ट भूमिका

    24-Jan-2025
Total Views |

VHP Baithak Mahakumbh (1)

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (VHP Baithak News Mahakumbh)
प्रयागराज येथे होत असलेल्या महाकुंभ परिसरात शुक्रवार, दि. २४ जानेवारी रोजी विश्व हिंदू परिषदेच्या केंद्रीय मार्गदर्शक मंडळाची बैठक संपन्न झाली. यावेळी देशभरातील संतगण सहभागी झाले होते. '१९८४ च्या धर्मसंसदेपासून संत समाज, हिंदू समाज, विश्व हिंदू परिषद आणि संघ हे अयोध्या, मथुरा आणि काशी येथील मंदिरांच्या प्राप्तीसाठी वचनबद्ध होते, आहेत आणि भविष्यातही राहतील.', अशी स्पष्ट भूमिका संतांनी व्यक्त केली.

हे वाचलंत का? : जगाला प्रेम, शांतता आणि सहिष्णुतेचे धडे देण्याची क्षमता भारताच्या तत्त्वज्ञानात

बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेला आचार्य महामंडलेश्वर अवधेशानंद गिरीजी महाराज, विहिंपचे केंद्रीय अध्यक्ष अॅड. आलोक कुमार, केंद्रीय महामंत्री बजरंगलाल बागरा आदी मान्यवर उपस्थित होते. केंद्रीय मार्गदर्शक मंडळाच्या बैठकीत पूज्य संतांनी जगभरातील हिंदू समाजाच्या धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक गरजा, आव्हाने आणि संकटांचा संदर्भ लक्षात घेता हिंदू समाजाला मार्गदर्शन केले.

VHP Baithak Mahakumbh

हिंदू मंदिरांना सरकारी नियंत्रणातून मुक्त करण्यासाठी देशभरात जागरण मोहीम सुरू झाली आहे. या मोहिमेचा शंखनाद आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील बडा सभेतून करण्यात आला. सर्व मंदिरे सरकारी नियंत्रणातून मुक्त करावीत, सरकारी नियंत्रण प्रस्थापित करणारे कायदे काढून मंदिरांचे व्यवस्थापन धर्माभिमानी भक्तांकडे सोपवावे, असे आवाहन यावेळी संतांनी केले.
भारताच्या उन्नतीसाठी सामाजिक समरसता, पर्यावरणाचे रक्षण, कौटुंबिक प्रबोधनाद्वारे हिंदू संस्कारांचे सिंचन आणि सामाजिक दुर्गुणांचे निर्मूलन, 'स्व' चे आत्मजागरण आणि चांगले नागरिकांचे कर्तव्य हे राष्ट्रीय चारित्र्याच्या विकासासाठी आवश्यक असल्याचेही संतांनी म्हटले.


VHP Baithak Mahakumbh

किमान तीन मुले जन्माला यावीत
हिंदू समाजाच्या घटत्या जन्मदराचे प्रमुख कारण म्हणजे हिंदू लोकसंख्येतील असमतोल. हिंदू समाजाचे अस्तित्व जपण्याची महत्त्वाची जबाबदारी म्हणून प्रत्येक हिंदू कुटुंबात किमान तीन मुले जन्माला आली पाहिजेत. हिंदू समाजाची लोकसंख्या समतोल राखण्यासाठी हिंदू समाजाचा जन्मदर वाढविण्याची गरज मार्गदर्शक मंडळाच्या पूज्य संतांनी व्यक्त केली आहे.

वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाबाबत खासदारांना आवाहन
वक्फ बोर्डाच्या निरंकुश आणि अमर्याद अधिकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकार कायदा सुधारणा कायदा आणणार आहे, केंद्रीय मार्गदर्शक मंडळ त्याचे स्वागत करते आणि हा कायदा मंजूर करून सर्व पक्षांच्या खासदारांनी त्यात सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

अग्रलेख
जरुर वाचा
जन्म–मृत्यू बाबतच्या बोगस प्रमाणपत्रांना चाप! अधिनियमात सुधारणा; तात्काळ अंमलबजावणीचे महसूल मंत्र्यांचे निर्देश

जन्म–मृत्यू बाबतच्या बोगस प्रमाणपत्रांना चाप! अधिनियमात सुधारणा; तात्काळ अंमलबजावणीचे महसूल मंत्र्यांचे निर्देश

सरकारी व्यवस्थेतील उणीवांचा लाभ घेत जन्म-मृत्यू नोंदणीची प्रमाणपत्रे मिळविणाऱ्या परदेशी नागरिकांच्या हैदोसावर आता अंकुश बसणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवार, दि. १२ मार्च रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात निवेदन करून, विलंबाने करावयाच्या जन्म-मृत्यू नोंदीबाबतच्या कार्यपध्दतीनिश्चित केल्याचे सांगितले. तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार आजपासूनच महाराष्ट्रात नवीन बदल लागू होतील, अशी घोषणा केली...

लाठी मारी ते विधवांची होळी! महाराष्ट्राबाहेर होळी नेमकी कशी साजरी केली जाते ?

लाठी मारी ते विधवांची होळी! महाराष्ट्राबाहेर होळी नेमकी कशी साजरी केली जाते ?

होळी म्हणजे रंगांचा उत्सव. एका पौराणिक कथेनुसार हिरण्यकश्यपूची बहीण होलिका हिला अग्नी जाळू शकणार नाही असा वर मिळाला होता. हिरण्यकशपूने होलिकेला सांगितले की प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीवर बसावेस म्हणजे प्रल्हाद जळून मरेल आणि होलिका मात्र जिवंत राहील. हिरण्यकशपूचा सल्ला तिने ऐकला. परंतू प्रल्हादाने नारायणाचे नामस्मरण केल्याने होलिका जळून गेली आणि प्रल्हाद जिवंत राहिला या आनंदाप्रीत्यर्थ दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी प्रदोषकाली होलिकादहन केलं जाते. तसेच यावेळी दुष्ट प्रवृत्तीचा नाश व्हावा अशी प्रार्थना ..

स्वपक्षातील नेत्याच्या मुलाने तयार केलेलं चिन्ह हटवलं, हिंदीविरोधाच्य़ा नादात मुख्यमंत्री स्टॅलिन यांना पडला विसर! भाजप अध्यक्षांनी करुन दिली आठवण, म्हणाले...

स्वपक्षातील नेत्याच्या मुलाने तयार केलेलं चिन्ह हटवलं, हिंदीविरोधाच्य़ा नादात मुख्यमंत्री स्टॅलिन यांना पडला विसर! भाजप अध्यक्षांनी करुन दिली आठवण, म्हणाले...

(Tamil Nadu drops official Rupee Symbol from State Budget) तामिळनाडूमधील एमके स्टॅलिन यांचे सरकार आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून भाषेच्या मुद्द्यावर तणावाचे वातावरण आहे. यात आता तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन (M K Stalin) यांच्या निर्णयामुळे हा वाद पुन्हा पेटण्याची चिन्हे आहेत. तामिळनाडू सरकारने राज्याच्या २०२५-२६ च्या अर्थसंकल्पामध्ये रुपयाच्या चिन्हाऐवजी (₹) तमिळ भाषेतील रुबई मधील पहिले अक्षर ‘रु’ वापरण्याचा निर्णय घेतला आहे...