"प्रशिक्षक आणि खेळाडूंमधील..."; ड्रेसिंग रूमच्या वादावर प्रशिक्षक गौतम गंभीरने सोडले मौन

    02-Jan-2025
Total Views | 81

gautam gambhir
 
नवी दिल्ली : (Gautam Gambhir) भारतीय क्रिकेट संघ सध्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या या कसोटी मालिकेमध्ये भारतीय संघाची कामगिरी फारशी चांगली झालेली नाही. त्यामुळेच सिडनीमध्ये होणाऱ्या शेवटच्या कसोटी सामन्यापूर्वी मेलबर्न येथील पराभवाचे पडसाद भारतीय ड्रेसिंग रुममध्ये उमटल्याच्या चर्चा होत्या. मेलबर्न पराभवानंतर भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरने भारतीय खेळाडूंना फटकारल्याचे वृत्त माध्यमांमधून समोर येत होते. परंतु गंभीरने ड्रेसिंग रुममधील या चर्चेच्या बातम्या खोट्या असल्याचे सांगितले. प्रत्येक खेळाडूला कशावर काम करायचं आहे, हे ठाऊक आहे. हा कसोटी सामना कसा जिंकायचा या एकाच विषयावर त्यांच्याशी चर्चा झाल्याचे गंभीरने सांगितले.
 
ड्रेसिंग रूमच्या वादावर काय म्हणाला गंभीर?
 
पत्रकार परिषदेत गौतम गंभीरने ड्रेसिंग रूमच्या वादावर मौन सोडले. गौतम गंभीर म्हणाला की, प्रशिक्षक आणि खेळाडू यांच्यातील चर्चा ही ड्रेसिंग रूमपुरती मर्यादित असायला हवी. जोपर्यंत ड्रेसिंग रूममध्ये प्रामाणिक लोक आहेत तोपर्यंत भारतीय क्रिकेट सुरक्षित हातात आहे. फक्त एकच गोष्ट तुम्हाला संघात ठेवू शकते आणि ती म्हणजे तुमची कामगिरी. ते पुढे म्हणाले की संघाची भावना प्रथम सर्वात महत्वाची आहे. खेळाडू त्यांचे पारंपारिक खेळ खेळू शकतात, परंतु सांघिक खेळांमध्ये वैयक्तिक खेळाडूच योगदान देतात. सर्व खेळाडूंना माहित आहे की कोणत्या बाबींवर काम करायचं आहे. हा कसोटी सामना कसा जिंकायचा एवढीच चर्चा त्यांच्याशी झाल्याचे त्याने सांगितले. तसेच वेगवान गोलंदाज आकाशदीप दुखापतीमुळे पाचव्या कसोटीत खेळू शकणार नसल्याचेही सांगितले.
 
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेतील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना ३ जानेवारीपासून सिडनी क्रिकेट मैदानावर खेळवला जाणार आहे. भारतीय संघ या मालिकेत १-२ ने पिछाडीवर आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी भारताला सिडनी कसोटी सामना जिंकावा लागणार आहे. मात्र, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेच्या निकालावरही अवलंबून राहावे लागणार आहे. श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाचा २-० किंवा १-० असा पराभव केल्यास टीम इंडियाचा अंतिम फेरीत पोहोचण्याचा मार्ग मोकळा होईल.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
आधी शरिया आणि नंतर संविधान! कट्टरपंथी हाफिजुल हसनने तोडले अकलेचे तारे, भाजप नेते म्हणाले हा तर लोकशाहीचा घोर...

आधी शरिया आणि नंतर संविधान! कट्टरपंथी हाफिजुल हसनने तोडले अकलेचे तारे, भाजप नेते म्हणाले हा तर लोकशाहीचा घोर...

constitution झारखंडचे मंत्री हाफिजुल हसन यांनी सोमवारी १४ एप्रिल २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी संविधानाहून अधिक शरीयाला सर्वाधिक प्राधान्य देण्याबाबत वक्तव्य केले. त्यांनी आधी कुराण धर्मग्रंथास आपल्या हृदयात ठेवावे आणि संविधानाला आपल्या हातात ठेवावे, असा वक्तव्य केले. हसन यांनी केलेल्या अशा विधानावरून भाजप नेत्याने हसनला आरसा दाखवला आहे. भारतीय लोकशाहीचा घोर अपमान असल्याचा दावा आता भाजपने केला आहे. ज्यांच्या हृदयात शरीयत आहे त्यांच्यासाठी पाकिस्तान बांग्लादेशची दारं खुली राहणार आहेत. भारत ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121