मुख्यमंत्र्यांची सुटका नाहीच, कोर्टाकडून कोठडीत वाढ!

    19-Jun-2024
Total Views | 49
Delhi cm kejriwal custody
 

नवी दिल्ली :     दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पुन्हा एकदा न्यायालयाने झटका दिला आहे. अरविंद केजरीवाल यांना राऊस अव्हेन्यू कोर्टाने दणका दिला असून न्यायालयीन कोठडीत वाढ केली आहे. दिल्ली मद्य घोटाळाप्रकरणी ईडीने केजरीवाल यांची चौकशी केली होती. या चौकशीत ईडीने न्यायालयात आपली बाजू मांडली असून कोर्टाने कोठडीत वाढ केली आहे.


दरम्यान, कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत दि. ०३ जुलैपर्यंत वाढ केली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे अरविंद केजरीवाल यांना लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी ०१ जूनपर्यंत जामिनावर सुटका करण्यात आली होती. मुदत संपताच केजरीवाल यांनी आत्मसमर्पण केल्याचे पाहायला मिळाले होते.

दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दि. २१ मार्चला अटक करण्यात आली होती. त्यानंतर केजरीवाल यांची रवानगी तिहार तुरुंगात करण्यात आली होती. दरम्यान, अरविंद केजरीवाल दिल्ली सरकारचा कारभार कारागृहातून चालवित आहे.


अग्रलेख
जरुर वाचा
मुंबई मेट्रो-३

मुंबई मेट्रो-३ 'बीकेसी ते आचार्य अत्रे' मार्गाचे लोकार्पण

कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे' मेट्रो ३ मार्गिकेतील बीकेसी ते आचार्य अत्रे चौक, वरळी अशा टप्पा २ अच्या संचलनाची प्रतीक्षा अखेर आता संपली आहे. या मार्गिकेसाठी मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस)कडून टप्पा २ अ ला सुरक्षा प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यामुळे या टप्प्याच्या संचलनाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार, आज दि.९ रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई मेट्रो ३च्या या टप्प्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे. यावेळी मुख्यमंत्री बीकेसी ते सिद्धिविनायक मंदिर स्थानकापर्यंत मेट्रोने ..

मसूद अजहरचा भाऊ जैशचा दहशतवादी अब्दुल रौफ अझहर ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये ठार!

मसूद अजहरचा भाऊ जैशचा दहशतवादी अब्दुल रौफ अझहर ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये ठार!

पहलगाम हल्ल्या नंतर भारताने पाकिस्तानी दहशतवाद्यांना जबरदस्त उत्तर ‘ऑपरेशन सिंदूर’ पूर्ण केले. दि. ७ मे रोजी रात्री १ वाजून ४ मिनिटांनी ते दीड वाजताच्या दरम्यान ऑपरेशन सिंदूर पूर्ण झाले. भारतीय दलांनी पाकिस्तानमध्ये बहावलपूर आणि मुरीदके येथे हल्ले केले आणि जैश आणि लष्करचे मुख्यालय उद्ध्वस्त केले. कित्येक वर्षांपासून या दोन्ही दहशतवादी संघटना सातत्याने भारताविरोधात कारवाया करत आहेत. हल्ल्यात जैश-ए-मोहम्मद प्रमूख मसूद अझहरचा भाऊ अब्दुल रौफ अझहर जो जैश-ए-मोहम्मदचा ऑपरेशनल प्रमुख आणि आयसी-८१४ अपहरणाचा मास्टरमाइ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121