कल्याणमध्ये उमेदवारीवरून स्थानिक भूमीपुत्राचा वाद उफाळला!

दरेकरांच्या उमेदवारीवरून ठाकरे गटात राजीनामा सत्र?

    05-Apr-2024
Total Views | 220
Kalyan Loksabha UBT Candidate Darekar
 

कल्याण :      कल्याण लोकसभा मतदारसंघातून उबाठा गटाने आपला उमेदवारांचे नाव जाहीर केले आहे. उबाठाने वैशाली दरेकर यांना उमेदवारी देऊन आपल्याच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची नाराजी ओढवून घेतली आहे. उबाठा ने स्थानिक उमेदवार दिला असला तरी तो भूमीपूत्र नाही. स्थानिक भूमीपुत्राला प्राधान्य देण्यात यावे असे आशयाचे मेसेज सोशल मिडीयावर व्हायरल होताना दिसत आहे.

दरम्यान, आता आगामी निवडणुकी आधीच उबाठा गटात ही भूमीपुत्र या मुद्द्यावरून वाद उफाळला असताना सोशल मिडियावरील पोस्ट पाहता दरेकरांपुढील अडचणी वाढताना दिसत आहे. उबाठातील पदाधिकाऱ्यांनी या नाराजीतून राजीनामा देण्याचा पावित्रा घेतल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.


मुख्यमंत्री केजरीवाल व आपचे 'हे' नेते जेलमध्ये गेलेत, वाचा सविस्तर

TitleType text here...

उबाठा गटाने दोन दिवसांपूर्वी कल्याण लोकसभा मतदारसंघातून त्यांचा उमेदवार कोण असेल याविषयी घोषणा केली. उबाठातून केदार दिघे, सुषमा अंधारे, आदित्य ठाकरे अशी नावे चर्चेत होती. सर्व नावे बाजूला सारून वैशाली दरेकर यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे एकीकडे माजी आमदार सुभाष भोईर यांचे सर्मथक तर दुसऱ्या बाजूला उबाठा मधील पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज झाले.

ठाकरे गटाने निवडणूकीच्या रिंगणात आणलेला हा पत्ता खरा आहे की खोटा याबाबत देखील चर्चा रंगल्या आहेत. उमेदवारी देण्यावरून वेगवेगळ्य़ा चर्चा रंगल्या असल्या तरी मतदारांच्या मनात मात्र स्थानिक भूमीपूत्रच असल्याचे सोशल मिडीयावर फिरणाऱ्या मेसेजने सिध्द होत आहे.

स्थानिक नागरिकांच्या मनातील उमेदवार हा उच्च विद्याविभूषित, हिंदू धर्म आणि देशाला मानणारा, गोरगरीबांच्या हाकेला धावून जाणारा, ठाण्यासह कोकण परिसरातील संपूर्ण भारतातील समस्यांची जाण असणारा, प्रदूषण, पर्यावरण, वाहतूक कोंडी, पाणीटंचाई, सांडपाणी, स्वयंरोजगार, ग्रामविकास इत्यादी समस्यांवर कार्य करणारा, स्थानिक समस्येला प्राधान्य देणारा असावा अशी अपेक्षा आहे.




 
अग्रलेख
जरुर वाचा
आम्ही टिकल्या काढून फेकल्या... अल्लाहु अकबर म्हणायला सुरुवात केली; पर्यटकांनी सांगितली हल्ल्याची थरारक कहाणी!

"आम्ही टिकल्या काढून फेकल्या... अल्लाहु अकबर म्हणायला सुरुवात केली"; पर्यटकांनी सांगितली हल्ल्याची थरारक कहाणी!

Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मिरच्या पहलगाममधील बैसरन खोऱ्यात मंगळवारी ४ दहशतवाद्यांकडून भ्याड हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात आतापर्यंत २८ जणांचा मृत्यू तर २० पेक्षा जास्त पर्यटक जखमी झाल्याची माहिती आहे. या हल्ल्यात काहींनी आपला नवरा गमावलाय, काही तरुणांना आपले प्राण गमवावे लागलेत. काहींनी आपल्या डोळ्यांसमोर वडिलांना मारताना पाहिलंय. सैरभर पळणारे लोक, मृतांचा खच, रक्ताचे पाट, मृतांच्या कुटुंबियांचा आक्रोश, किंकाळ्या आणि बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज या सगळ्या भयावह प्रसंगाचं वर्णन बचावलेल्या पर्यटकांनी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121