जरांगे-भूजबळ पुन्हा भिडले! म्हणाले, "आधी साधं..."

    06-Feb-2024
Total Views |

Bhujbal & Jarange


मुंबई :
राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच चर्चेत असून यावरून मनोज जरांगे आणि मंत्री छगन भुजबळ पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. आधी ग्रामपंचायतीला उभे रहा, असे थेट आव्हानच आता मंत्री छगन भुजबळांनी मनोज जरांगेंना दिले आहे. मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगेंनी १० फेब्रुवारीपासून उपोषणाला बसणार असल्याची घोषणा केली. यावर आता छगन भुजबळांनी प्रतिक्रीया दिली आहे.
 
छगन भुजबळ म्हणाले की, "जरांगेंना सांगा तू आधी ग्रामपंचायतीला उभा राहा. छगन भुजबळ ग्रामपंचायतच नाही तर, मुंबईच्या महानगरपालिकेत २५ वर्ष निवडून येऊन दोन वेळा महापौर झाला आणि दोन वेळा आमदारसुद्धा झाला. त्यानंतर चारवेळा येवल्याला आमदार झाला. त्यामुळे तू मला सांगण्याची काही गरज नाही. तू आधी नीट उभा राहा."
 
ते पुढे म्हणाले की, "जरांदेखील कधी धनगर समाजाच्या बाजूने लढणार तर, कधी नाभिक समाजाकडून लढणार आहे असे म्हणून आमच्यात फुट पाडण्याचं काम करत आहे. तुम्हीच आमच्या धनगर आणि नाभिक समाजाच्या आरक्षणावर डल्ला मारण्याचं काम करत आहे. ते थांबवा, आमच्यावर खूप उपकार होतील. ओबीसी समाजातून आरक्षण घेण्याचं काम आधी मागे घ्या, आम्ही तुमचे उपकार मानू," असेही ते म्हणाले.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.
जरुर वाचा
२१ वर्षांनी पुन्हा रंगभूमीवर चतुरस्र अभिनेते सचिन खेडेकर; चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित

२१ वर्षांनी पुन्हा रंगभूमीवर चतुरस्र अभिनेते सचिन खेडेकर; चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित 'या' नाटकात दिसणार मुख्य भूमिकेत!

एखादा कलाकार कितीही मोठा झाला, कितीही राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवले, मसालापटांपासून चरित्रपटांपर्यंत आभाळाएवढ्या उंचीच्या व्यक्तिरेखा साकारल्या तरी रंगभूमीची ओढ कधीच संपत नाही. कोणताही हाडाचा कलाकार ठराविक वेळेनंतर पुन्हा तो रंगभूमीकडे वळतो, इथे होणाऱ्या तिसऱ्या घंटेसोबत व्यक्तिरेखेत शिरतो, प्रयोगांमागून प्रयोग करत त्यातच रमतो आणि जिवंत कला पाहण्याचा अनुभव रसिकांना देताना स्वत:लाही धन्य मानू लागतो. चतुरस्र अभिनेते सचिन खेडेकरही याला अपवाद नाहीत. मराठीपासून हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये ..

सर्वसमावेशक विकासासाठी पतपेढी चळवळ आवश्यकच : विद्याधर अनास्कर

सर्वसमावेशक विकासासाठी पतपेढी चळवळ आवश्यकच : विद्याधर अनास्कर

2025 हे वर्ष संयुक्त राष्ट्राने ‘आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष’ म्हणून जाहीर केले आहे. याच सहकार क्षेत्राचे जाळे महाराष्ट्रात खूप खोलवर रुजले आहे. त्यातील महत्त्वाचा भाग म्हणजे सहकारी वित्तीय संस्था आणि या वित्तीय संस्थांमधील महत्त्वाचा भाग म्हणजे, सहकारी पतसंस्था म्हणजेच सहकारी पतपेढी. सर्वसामान्य माणसांच्या जवळच्या आणि त्यांच्या अर्थकारणातही या पतसंस्थांना आजही जिव्हाळ्याचे स्थान आहे. पण, आज याच पतसंस्थांची चळवळ ही काही गैरप्रकारांमुळे संशयाच्या भोवर्‍यात सापडली आहे. त्यानिमित्ताने पतसंस्थांच्या अर्थकारणाचा, ..