"आपल्या पाठिंब्यामुळेच ..." विजयानंतर देवेंद्र फडणवीस यांचे पत्र व्हायरल

    24-Nov-2024
Total Views | 338

fadnavis

मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकींचा निकाल अखेर जाहिर झाला आणि महायुती सरकारला महाराष्ट्रतील जनतेने कौल दिला. भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट या तीन्ही पक्षांच्या गळ्यात लोकांनी विजयाची माळ घातली. अशातच आता भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील जनतेसाठी लिहीलेलं पत्र व्हायरल झाले आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील जनतेने त्यांच्यावर दाखवलेल्या विश्वासावर कृतज्ञता व्यक्त केली आहे.

महायुतीला मिळालेला विजय हा फक्त भाजप महायुतीचा नसून, महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाच्या विश्वासाचा विजय असल्याचे या पत्रात नमूद केले गेले आहे. मेहनत एकजूटता, लाडक्या बहिणींचे आशिर्वाद आणि पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वार महाराष्ट्राच्या तमाम जनतेने दाखवलेला विश्वास या विजयाचे खरे शिल्पकार आहेत असं मत फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. याच सोबत महायुतीच्या सर्व घटक पक्षांतील नेत्यांचे, पदाधिकाऱ्यांचे फडणवीस यांनी आभार मानले आहेत. सगळ्यांच्या पाठिंब्यामुळे महायुतीच्या विजयाला एक नवीन दिशा मिळाली असल्याचे मत फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. हा विजय भारतासह विकसित महाराष्ट्राचे स्वप्न साकारण्यासाठी प्रेरणा देत राहील असे म्हणत फडणवीस यांनी जनतेचे आभार मानले आहे.

अग्रलेख
जरुर वाचा
वक्फ कायदा मंजूरीनंतर उत्तर प्रदेशात वक्फ दाव्यावर पहिली पोलीस तक्रार

वक्फ कायदा मंजूरीनंतर उत्तर प्रदेशात वक्फ दाव्यावर पहिली पोलीस तक्रार

Waqf Act संसदेच्या दोन्ही सभागृहात वक्फ सुधारित कायदा पारित झाल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सही करत कायद्याला मंजूरी देत वाट मोकळी केली आहे. याचा देशभरात चांगला प्रतिसाद दिसत आहे. तर काही धर्मांध यांचा गैर अपप्रचार करत आहेत. वक्फ कायदा लागू झाल्यानंतर इतरांच्या मालकी हक्कांवर वक्फ दावा करणाऱ्यांना आता चाप बसणार आहे. अशातच आता असेच एक प्रकरण समोर आले आहे. ज्यात अवैधपणे जमिनींवर वक्फने दावा केला आणि आता त्याविरोधात पोलीस तक्रार करण्यात आली आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील बरेलीतील असल्याचे सांगण्यात ..

पश्चिम बंगालमधील हिंदूंसाठी धोक्याची

पश्चिम बंगालमधील हिंदूंसाठी धोक्याची 'ममता', मिथून चक्रवर्तींचा हल्लाबोल

Mamata Banerjee पश्चिम बंगालमध्ये वक्फ सुधारित कायद्यावरून रान पेटलं आहे. वक्फ सुधारित कायदा मंजूर झाल्यानंचर आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या हिंदूंसाठी धोक्याची घंटा ठरत असल्याचे प्रतिपादन भाजप नेते आणि अभिनेते मिथून चक्रवर्तींनी केले आहे. बंगालमध्ये वक्फ कायदा लागू होऊ देणार नसल्याचा दावा ममता बॅनर्जी यांनी केला आहे. यामुळे आपली व्होट बँक दुरावली जाऊ नये, हे लक्षात घेत कायद्या सुव्यवस्था न ठेवता बांग्लादेशप्रमाणे पश्चिम बांगलादेशची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच मिथून चक्रवर्तींनी बारताच्या संविधानाचा..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121