"श्रीसिद्धिविनायक मंदिरावर कोणीही दावा करणार नाही"

श्रीसिद्धिविनायक मंदिर संस्थेचे कोषाध्यक्ष पवन त्रिपाठी यांचा विश्वास

    18-Nov-2024
Total Views | 3430
 
Pawan Tripathy
 
मुंबई : राज्यातील मुंबई येथील दादरस्थित असलेले श्रीसिद्धिविनायक मंदिर हे महाराष्ट्र आणि हिंदूंचे आराध्य दैवत आहे. सिद्धिविनायक मंदिर हे मुंबईची आन बाण शान असल्याने श्री सिद्धिविनायक मंदिरावर वक्फ बोर्ड दवा करणार नाही., असे प्रतिपान श्रीसिद्धिविनायक मंदिराच्या संस्थेचे कोषाध्यक्ष पवन त्रिपाठी यांनी केले आहे. याप्रकरणची माहिती त्यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे. त्यांचा व्हिडिओ हा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
 
राज्यात आणि देशात वक्फ बोर्डाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडकिल्ल्यांवर, मंदिरावर दावा केला असल्याचे सांगण्यात येत आहे. अशातच मुंबई येथील श्रीसिद्धिविनायक मंदिरावर वक्फ बोर्डानेही दावा केल्याचे खोटे वृत्त असल्याची माहिती आता पवन त्रिपाठी यांनी त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितली आहे. ते म्हणाले की, दादरस्थित असलेल्या श्रीसिद्धिविनायक मंदिरावर केवळ देशाच नाहीतर जगात राहणाऱ्या सनातनी असणाऱ्यांची एक श्रद्धा आहे. श्रीसिद्धिविनायक मंदिर ही मुंबईची आन, बाण आणि शान आहे. यामुळे श्रीसिद्धिविनायक मंदिरावर कोणीही दावा करणार नाही, असे पवन त्रिपाठी यांनी त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले आहे.
 
 
 
दरम्यान राज्यात आणि देशात वक्फने हिंदू धर्मस्थळे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडकिल्ल्यावर दावा केला आहे. मध्यंतरी विशाळगडावर वक्फने दावा केला असून यावर अद्यापही वाद सुरूच आहे. यावेळी अनेक हिंदूंनी विशाळगडावर जाऊन या लॅण्ड जिहादचा विरोध दर्शवला होता. एवढेच नाहीतर काही दिवसांआधी आहिल्यानगर जिल्ह्यातील मडी येथील कानिफनाथ मंदिर आणि मंदिराच्या आसपास असलेल्या एकूण ४० एकर जागेवर वक्फने दावा केला आहे. देशात रेल्वे क्षेत्र सोडले तर सर्वाधिक मालमत्ता ही वक्फची असल्याची माहिती आहे.
 
अग्रलेख
जरुर वाचा
गांधीजींचा देश दुसरा गाल पुढे करणार नाही तर...; शशी थरूर यांनी पाकिस्तानला ठणकावलं!

"गांधीजींचा देश दुसरा गाल पुढे करणार नाही तर..."; शशी थरूर यांनी पाकिस्तानला ठणकावलं!

(Shashi Tharoor warns Pakistan) 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत सरकारने दहशतवादाविरोधातील आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी विविध देशांमध्ये सर्वपक्षीय शिष्टमंडळं पाठवली आहे. दरम्यान, काँग्रेसचे खासदार आणि सर्वपक्षीय शिष्टमंडळातील एका शिष्टमंडळाचे प्रमुख असलेले शशी थरूर यांनी महात्मा गांधींच्या वाक्याचा उल्लेख करत पाकिस्तानला कडक इशारा दिला आहे. "आता दुसरा गाल पुढे करण्याचे दिवस संपले. इथून पुढे दहशतवादी हल्ला झाल्यास महात्मा गांधींचा देश दुसरा गाल पुढे करणार नाही, आम्ही त्याला जशास तसे उत्तर देऊ,"असे थरूर यांनी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121