"हिंम्मत असेल तर..." भुजबळांचं जरांगेंना ओपन चॅलेंज

    31-Jan-2024
Total Views | 216

Bhujbal & Jarange


मुंबई :
हिंमत असेल तर मनोज जरांगेंनी मंडल आयोगाला चॅलेंज करुन दाखवावं, असं खुलं आव्हान मंत्री छगन भुजबळ यांनी दिलं आहे. दगाफटका झाला तर मंडल आयोगाला चॅलेंज करणार, असे वक्तव्य मनोज जरांगेंनी केले होते. यावर प्रतिक्रिया देताना भुजबळांनी हे चॅलेंज दिलं आहे.
 
"मराठा आरक्षणासंबंधीचा कायदा टिकवण्याची जबाबरदारी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे. त्यामुळे सगेसोयऱ्यांच्या कायद्यात दगाफटका झाला तर मी मंडल आयोगाला चॅलेंज करणार," असे मनोज जरांगे म्हणाले होते.
 
यावर छगन भुजबळ म्हणाले की, "मनोज जरांगे ३ कोटी मराठ्यांना मुंबईत आणणार होते. पण ३ कोटी किती आहे हे वाशीमध्ये सगळ्यांनी बघितलं. ज्यांना लाख आणि कोटी समजत नाही ते मंडल आयोगाला विरोध करतात. त्यांची हिंमत असेल तर त्यांनी मंडल आयोगाला चॅलेंज करुन दाखवावं."
 
त्यानंतर यावर मनोज जरांगेंनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, "भुजबळांना मराठ्यांची संख्या मोजण्यासाठी पुलावर उभं राहा असं सांगितल होतं. ६४ किलोमीटरची मराठ्यांची रांग होती. एकूण २७ टक्के मराठे आले होते. ते पुलावर थांबलेच नाहीत तर त्यांना ३ कोटी मराठे कसे दिसतील? त्यामुळे भुजबळांना आणखी समजावून सांगा की, मला चॅलेंज देऊन गोरगरिबांचं वाटोळं करु नका. त्यांनी जर पुन्हा अशा काड्या केल्या तर मंडल आयोग कोर्टाने स्वीकारलेला नाही, मी शंभर टक्के मंडल आयोगाला चॅलेंज करेन," असेही ते म्हणाले.



अग्रलेख
जरुर वाचा
२१ वर्षांनी पुन्हा रंगभूमीवर चतुरस्र अभिनेते सचिन खेडेकर; चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित

२१ वर्षांनी पुन्हा रंगभूमीवर चतुरस्र अभिनेते सचिन खेडेकर; चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित 'या' नाटकात दिसणार मुख्य भूमिकेत!

एखादा कलाकार कितीही मोठा झाला, कितीही राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवले, मसालापटांपासून चरित्रपटांपर्यंत आभाळाएवढ्या उंचीच्या व्यक्तिरेखा साकारल्या तरी रंगभूमीची ओढ कधीच संपत नाही. कोणताही हाडाचा कलाकार ठराविक वेळेनंतर पुन्हा तो रंगभूमीकडे वळतो, इथे होणाऱ्या तिसऱ्या घंटेसोबत व्यक्तिरेखेत शिरतो, प्रयोगांमागून प्रयोग करत त्यातच रमतो आणि जिवंत कला पाहण्याचा अनुभव रसिकांना देताना स्वत:लाही धन्य मानू लागतो. चतुरस्र अभिनेते सचिन खेडेकरही याला अपवाद नाहीत. मराठीपासून हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये ..

सर्वसमावेशक विकासासाठी पतपेढी चळवळ आवश्यकच : विद्याधर अनास्कर

सर्वसमावेशक विकासासाठी पतपेढी चळवळ आवश्यकच : विद्याधर अनास्कर

2025 हे वर्ष संयुक्त राष्ट्राने ‘आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष’ म्हणून जाहीर केले आहे. याच सहकार क्षेत्राचे जाळे महाराष्ट्रात खूप खोलवर रुजले आहे. त्यातील महत्त्वाचा भाग म्हणजे सहकारी वित्तीय संस्था आणि या वित्तीय संस्थांमधील महत्त्वाचा भाग म्हणजे, सहकारी पतसंस्था म्हणजेच सहकारी पतपेढी. सर्वसामान्य माणसांच्या जवळच्या आणि त्यांच्या अर्थकारणातही या पतसंस्थांना आजही जिव्हाळ्याचे स्थान आहे. पण, आज याच पतसंस्थांची चळवळ ही काही गैरप्रकारांमुळे संशयाच्या भोवर्‍यात सापडली आहे. त्यानिमित्ताने पतसंस्थांच्या अर्थकारणाचा, ..