मराठा आरक्षणावर भुजबळांचं मोठं विधान!

    27-Jan-2024
Total Views | 140

Bhujbal & Jarange


मुंबई :
राज्य सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्याने मनोज जरांगेंनी शनिवारी आपले उपोषण मागे घेतले आहे. यावर ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगेंची सगे सोयऱ्यांना आरक्षण देण्याची मागणी कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही, असे ते म्हणाले आहेत. त्यांनी पत्रकार परिषद घेत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
 
छगन भुजबळ म्हणाले की, "माझं स्वत:चं असं मत आहे की, हे सगे सोयरे कायद्याच्या कसोटीवर अजिबात टिकणार नाही. ओबीसींच्या १७-१८ टक्के शिल्लक राहिलेल्या आरक्षणात तुम्हाला यायला मिळतंय आणि तुम्ही जिंकलात असं तुम्हाला वाटतंय. पण दुसरी एक बाजू तुम्ही लक्षात घ्या की, या १७-१८ टक्क्यांमध्ये जवळजवळ ८०-८५ टक्के लोक येतील. आतापर्यंत तुम्हाला ईडब्ल्युएसखाली १० टक्के आरक्षण मिळत होतं, त्यातील ८५ टक्के मराठा समाजाला मिळत होतं. ते आता यापुढे मिळणार नाही. ओपनमध्ये उरलेले ४० टक्के होतं त्यातही तुम्हाला आरक्षण मिळत होतं. तेसुद्धा आता मिळणार नाही. १० टक्के ईडब्ल्युएस आणि उरलेले ४० टक्के या ५० टक्क्यामध्ये तुम्हाला संधी होती. यात दुसरं कुणीच नसून फक्त मोठा मराठा समाज आणि २,३ टक्के ब्राम्हण समाज आणि जैन वगैरे असा एखादा समाज होता. या सगळ्यावर आता तुम्हाला पाणी सोडावं लागेल आणि १७ टक्के शिल्लक असलेल्या जागेवर ३७४ जातींबरोबर तुम्हाला आता झगडावं लागेल," असे ते म्हणाले.
 
"मराठा समाजाचा विजय झाला असं तुर्त वाटतंय पण मला पुर्णपणे तसं वाटत नाही. अशाप्रकारे झुंड शाहीने नियम आणि कायदे बदलता येत नाहीत. मराठा समाजाला सरकारने दिलेली ही एक नोटीस आहे. याचं नंतर रुपांतर होणार आहे. १६ फेब्रुवारीपर्यंत यावर हरकती मागवण्यात आल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील ओबीसी आणि इतर समाजातील वकील आणि सुशिक्षित नागरिकांनी या सगळ्यांचा अभ्यास करून अशा प्रकारच्या हरकती ताबडतोब पाठवण्यासाठी प्रयत्न करावेत. लाखोंच्या संख्येने सरकारकडे या हरकती पाठवाव्यात. ओबीसी समाजाच्या सर्व कार्यकर्त्यांनी या हरकती पाठवाव्या जेणेकरुन याची दुसरी बाजूदेखील आहे हे सरकारच्या लक्षात येईल," असे आवाहनही त्यांनी केले आहे.
 
ते पुढे म्हणाले की, "जात ही जन्माने येते, ती एखाद्याच्या शपथपत्राने येते का? जात मुळात जन्मानं माणसाला मिळत असते. त्यामुळे कुणी असं म्हणत असेल की, १०० रुपायंचं पत्र देऊ आणि आमची जात झाली तर हे अजिबात होणार नाही. हे कायद्याच्या विरोधात होईल. ओबीसींवर अन्याय केला जातोय की, मराठ्यांना फसवलं जात आहे यावर सगळ्यांनी विचार करायला हवा," असेही ते म्हणाले आहेत.

अग्रलेख
जरुर वाचा
२१ वर्षांनी पुन्हा रंगभूमीवर चतुरस्र अभिनेते सचिन खेडेकर; चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित

२१ वर्षांनी पुन्हा रंगभूमीवर चतुरस्र अभिनेते सचिन खेडेकर; चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित 'या' नाटकात दिसणार मुख्य भूमिकेत!

एखादा कलाकार कितीही मोठा झाला, कितीही राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवले, मसालापटांपासून चरित्रपटांपर्यंत आभाळाएवढ्या उंचीच्या व्यक्तिरेखा साकारल्या तरी रंगभूमीची ओढ कधीच संपत नाही. कोणताही हाडाचा कलाकार ठराविक वेळेनंतर पुन्हा तो रंगभूमीकडे वळतो, इथे होणाऱ्या तिसऱ्या घंटेसोबत व्यक्तिरेखेत शिरतो, प्रयोगांमागून प्रयोग करत त्यातच रमतो आणि जिवंत कला पाहण्याचा अनुभव रसिकांना देताना स्वत:लाही धन्य मानू लागतो. चतुरस्र अभिनेते सचिन खेडेकरही याला अपवाद नाहीत. मराठीपासून हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये ..

सर्वसमावेशक विकासासाठी पतपेढी चळवळ आवश्यकच : विद्याधर अनास्कर

सर्वसमावेशक विकासासाठी पतपेढी चळवळ आवश्यकच : विद्याधर अनास्कर

2025 हे वर्ष संयुक्त राष्ट्राने ‘आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष’ म्हणून जाहीर केले आहे. याच सहकार क्षेत्राचे जाळे महाराष्ट्रात खूप खोलवर रुजले आहे. त्यातील महत्त्वाचा भाग म्हणजे सहकारी वित्तीय संस्था आणि या वित्तीय संस्थांमधील महत्त्वाचा भाग म्हणजे, सहकारी पतसंस्था म्हणजेच सहकारी पतपेढी. सर्वसामान्य माणसांच्या जवळच्या आणि त्यांच्या अर्थकारणातही या पतसंस्थांना आजही जिव्हाळ्याचे स्थान आहे. पण, आज याच पतसंस्थांची चळवळ ही काही गैरप्रकारांमुळे संशयाच्या भोवर्‍यात सापडली आहे. त्यानिमित्ताने पतसंस्थांच्या अर्थकारणाचा, ..