बबनराव घोलप यांचा ठाकरेंना व्हॉट्सअॅपद्वारे राजीनामा!

    11-Sep-2023
Total Views | 64
 
Babanrao Gholap
 
 
मुंबई : ठाकर गटाचे उपनेते बबनराव घोलप यांनी व्हॉट्सअॅपद्वारे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना राजीनामा पाठवला आहे. पत्रकार परिषद घेत बबनराव घोलप यांनी आपली भुमिका स्पष्ट केली आहे. आठ दहा महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं की, हे जे ४० लोकं निघून गेलेले, आमदार, खासदार पुन्हा निवडून येता कामा नये. त्याच्यासाठी आपल्याला चांगली बांधणी केली पाहिजे. त्यांनी मला अमरावती किंवा शिर्डी यापैकी निवड करण्यासाठी सांगितले होते. मी शिर्डीची निवड केली, असं बबनराव घोलप म्हणाले. बबनराव घोलप यांना खासदार संजय राऊतांनी भेटायला बोलावले होते. आज (११ सप्टें.) घोलप राऊतांना भेटायला गेले आहेत.
 
"मी त्यांना कालच राजीनामा पाठवला आहे. मी गेली ५५ वर्ष शिवसेनेत काम करतो आहे. १९६८ ला माझ्या शाखेचं उद्घाटन बाळासाहेब ठाकरे यांनी केलं आहे. मी ५५ वर्षे झाले, शिवसेनेत काम करत आहे, त्यांनी मला काढून टाकावं, मी बाहेर जाणार नाही.मला संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी दिल्यानं कामाला लागलो होतो. मी संपर्कप्रमुख झाल्यावर चांगली तयारी केली. मला कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसला पण पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह दिसत नव्हता त्यामुळं त्यात बदल केला, पण त्याला मुंबईतून स्थगिती दिली. यानंतर काम सुरु होतं. ३५ शाखांची स्थापना केली होती. उद्धव ठाकरे यांचा नुकताच दौरा झाला, त्या दौऱ्याची माहिती मला देण्यात आली नव्हती."
 
"भाऊसाहेब वाकचौरे गद्दार होते ते शिवसेना सोडून गेले होते. वाकचौरेंनी कोर्टात केलेल्या केसेस सुरु आहेत पण त्याला पक्षात घेतलं. ते वाकचौरे आता प्रचार करत असताना, कार्यकर्ते संभ्रमात आहेत. वाकचौरेंना जर उमेदवार करायचे होते, तर मला का सांगितलं? उद्धव ठाकरे यांच्या दुष्काळी पाहणी दौऱ्यात वाकचौरे यांनाच पुढे पुढे करण्यात आले. जेव्हा जेव्हा उद्धव ठाकरे कॅमेऱ्याजवळ जात होते त्यावेळी मिलिंद नार्वेकर वाकचौरेंना पुढं ढकलत होते. त्यानंतर मी घरी गेलो उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार होतो पण दुसऱ्याच दिवशी सामनामध्ये माझं संपर्कपद काढून घेतल्याचे छापून आले. माझ्याशी अशी वागणूक असेल तर शिवसैनिकांचं काय असेल म्हणून मी हातानं राजीनामा लिहिला आणि व्हाटसअपवर राजीनामा उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवला." असं बबनराव घोलप म्हणाले.
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
जर्मनीमध्ये विविध प्रकारच्या क्षेत्रामध्ये होणार रोजगाराच्या संधी उपलब्ध: मंगल प्रभात लोढा

जर्मनीमध्ये विविध प्रकारच्या क्षेत्रामध्ये होणार रोजगाराच्या संधी उपलब्ध: मंगल प्रभात लोढा

Mangal Prabhat Lodha राज्य शासनाने कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी जर्मनीतील बाडेन वुटेनबर्ग राज्यासोबत करार केला आहे.या करारानुसार बाडेन वुटेनबर्ग येथे विविध प्रकारच्या क्षेत्रांमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. जर्मनीतील बाडेन वुटेनबर्ग येथील शिक्षण क्षेत्रातील तज्ञ शिष्टमंडळ दि.१६ ते २२ मार्च या कालावधीत महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून यादरम्यान ते विविध व्यावसायिक आणि औद्योगिक प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांना भेटी देत आहेत. या भेटीदरम्यान राज्यात विविध संस्थांमध्ये सुरु असलेले कौशल्य प्रशिक्षण आणि जर्मनीत ..

हरिद्वार येथे अखिल भारतीय शास्त्र स्पर्धेला सुरुवात

हरिद्वार येथे अखिल भारतीय शास्त्र स्पर्धेला सुरुवात

केंद्रीय संस्कृत विद्यापीठ, नवी दिल्ली आणि पतंजली विद्यापीठ, हरिद्वार यांच्या संयुक्त विद्यमाने ६२ वी अखिल भारतीय शास्त्र स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. दि. १८ ते २१ मार्च दरम्यान हरिद्वार येथे होत असलेल्या या स्पर्धेच्या उद्घाटन सत्रात पतंजली विद्यापीठाचे कुलगुरू आचार्य बाळकृष्ण यांनी सभागृहात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ते म्हणाले, संस्कृत ही केवळ प्राचीन भाषा नसून ती अध्यात्म, विज्ञान आणि संस्कृतीचा अद्भुत संगम आहे. संस्कृत ही आपली मूळ भाषा आहे, जी सत्यतेवर आधारित आहे. अशा कार्यक्रमांच्या माध्यमा..

पत्नीने आंधळ्यासारखं प्रेम करणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने केला खून! ड्रममध्ये ठेवण्यात आला मृतदेह, पत्नीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात केली तक्रार

पत्नीने आंधळ्यासारखं प्रेम करणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने केला खून! ड्रममध्ये ठेवण्यात आला मृतदेह, पत्नीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात केली तक्रार

Saurav Murder उत्तर प्रदेशातील मेरठमधील ब्रह्मपुरी पोलीस ठाणे परिसरात एक खळबळजनक घटना घडली आहे. ज्यात एका पत्नीने तिच्या प्रियकरासह तिच्या पतीची हत्या करण्यात आली. हत्येनंतर मृतदेह घरातील एका मोठ्या ड्रममध्ये ठेवण्यात आला आणि त्यावरील असणारे लोखंडी झाकण सिमेंटचा लेप देऊन बंद करण्यात आले. कोणालाही कसलाही संशय येऊ नये म्हणून, पत्नी तिच्या पतीच्या मोबाईलवरून त्याच्या जवळच्या लोकांना सतत मेसेज आणि कॉल करत. या संबंधीत घटनेची माहिती पोलिसांनी घटनास्थळी जाखल झाले होते. त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनास..