'साहित्य संमेलनात राजकीय हस्तक्षेप होतोच, त्याला आम्ही काहीही करू शकत नाही!'

    27-Jun-2023
Total Views | 51
            
 

SAHITYA 
 
मुंबई : यंदाच्या साहित्य संमेलनासाठी अध्यक्षांची निवड झाल्या नंतर आयोजन व इतर अनेक बाबींविषयी चर्चा झाली. त्यावेळी मंडळाच्या उषा तांबे यांनी संमेलनात होणाऱ्या राजकीय हस्तक्षेपाविषयी भाष्य केले. "शासनाकडून अनुदान मिळते त्यामुळे राजकीय नेत्यांनाही संमेलन महत्वाचे वाटते. त्यांचा हस्तक्षेप होतोच मात्र त्याला आम्ही काहीही करू शकत नाही. आजवर एकाच व्यक्ती तब्बल १७ संमेलनांना उदघाटनप्रसंगी उपस्थित राहिला आहे. परंतु इलाज नाही" असे वक्त्यव्य उषा यांनी केले.
 
यावेळी आयोजनासोबतच खर्च व इतर बाबींवरही चर्चा झाली. मराठीला अभिजात दर्जा मिळत नसल्याच्या मुद्द्यावरूनही चर्चा झाली. यावेळी, आपण सर्वंनी एकत्र येऊन अभिजात दर्जा मिळ्वण्याविषयी प्रयत्न करायला हवेत असे प्रतिपादन तांबे यांनी केले. इतर भाषेतील उद्घटकांना यावर्षी मंचावर आमंत्रण देण्यापेक्षा आपल्याच भाषेतील मान्यवरांशी बोलावण्यात येईल परंतु दोन्ही बाजूंनी विचार होणे गरजेचं आहे असेही त्या पुढे म्हणाल्या.
 
तसेच गतवर्षी गेले गोलाकार रचल्याने प्रकाशकांची गैरसोय झाली यावर्षी तसे होऊ नये याची खबरदारी घेण्यात येईल.
अग्रलेख
जरुर वाचा
दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांचा

दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांचा 'अशी ही जमवा जमवी' चित्रपटाचा टिझर प्रदर्शित; 'या' तारखेला पाहायला मिळणार चित्रपट! जाणून घ्या

मैत्री, प्रेम, कुटुंब या विषयांवर आजवर बरेच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत; मात्र राजकमल एंटरटेनमेंट प्रस्तुत, लोकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित 'अशी ही जमवा जमवी' या चित्रपटात फक्त तरुणांचीच नाही तर वृद्ध मित्र मैत्रिणींचीसुद्धा एक धमाकेदार कहाणी आपल्याला अनुभवयाला मिळणार आहे. या दमदार आणि बहुप्रतीक्षित चित्रपटाचं टिझर प्रदर्शित झालंय, ज्यात अशोक सराफ आणि वंदना गुप्ते या दोन दिग्गजांची मजेदार जुगलबंदी पहायला मिळते. चित्रपटाचं नाव आणि रिलीझ झालेल्या टिझरवरून संपूर्ण सिनेमा पाहण्याची प्रेक्षकांची ..