सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागांना लवकरच पाणी मिळणार!

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    22-Jun-2023
Total Views | 51
 

Devendra Fadnavis
 
 
सातारा : उरमोडी, टेंभू आणि जीए कटापूर या तिन्ही योजनांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. या प्रकल्पातून सातरा जिल्ह्यातील दुष्काळी भागांना पाणी मिळणार आहे. त्याला गती, फेरप्रशासकीय मान्यता देऊन निधी देण्यासंदर्भात निर्णय झाल्याच फडणवीसांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज उदयनराजे आणि शिवेंद्र राजे यांच्यासोबत कराडमध्ये एकत्र बैठक केली. बैठकीनंतर बोलताना त्यांनी सातारा जिल्ह्याच्या दुष्काळी भागांना पाणी पुरवठ्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली.
 
 
 
देवेंद्र फडणवीस म्हणाले, "प्रशासकीय मान्यता देऊन प्रकल्पाच्या कामाला गती देतोय. दुष्काळी भागाला पाणी मिळालं पाहिजे. मुंबई-बँगलोर कॉरिडोअर मार्गावर मसवड एमआयडीसी तयार करायची आहे. अन्य एमआयडीसीचे प्रश्न आहेत. यासंदर्भात आज बैठक घेतली. केंद्र सरकारने प्राथमिक मंजुरी दिली आहे. लवकरच जमीन अधिग्रहण सुरु करणार आहोत. केंद्र सरकारने त्यांचा वाटा उचलण्याच मान्य केलय.” असं फडणवीसांनी सांगितलं.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
नागपूरात हिंसाचार कसा घडला? जाणून घ्या सपूर्ण घटनाक्रम...

नागपूरात हिंसाचार कसा घडला? जाणून घ्या सपूर्ण घटनाक्रम...

दिवस होता सोमवार. रात्री ७.३० ते ८ वाजताच्या सुमारास नागपूर शहरातील काही भागात अचानक हिंसाचार उसळला. दोन गटात हाणामारी, दगडफेक, वाहनांची जाळपोळ या सगळ्या घटनांनी नागपूर हादरलं. एवढंच नाही तर जमाव पांगवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. तरीसुद्धा पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करत रात्री उशीरापर्यंत जमाव पांगवत हा हिंसाचार शांत केला. मुख्य म्हणजे हा सगळा प्रकार घडला तो म्हणजे कायम वर्दळ असलेल्या महाल परिसरात. सध्या नागपूरात संचारबंदी लागू करण्यात आलीये. मात्र, या घटनेची सुरुवात नेमकी कशी झाली? ..