श्रीयुत जयंत सहस्रबुद्धे यांच्या निधनाची अत्यंत दु:खद बातमी तृतीय वर्षाच्या दीक्षांत समारंभाच्या समारोपानंतर मिळाली. अचानक बसलेल्या या धक्क्याने आम्ही सर्वच स्तब्ध झालो आहोत. नऊ महिन्यांपूर्वी झालेल्या अपघातानंतर त्यांच्या तब्येतीत झालेल्या खात्रीशीर प्रगतीची बातमी आनंददायी होती. एक-दोन वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतरही ते पुन्हा एकदा हळूहळू त्यांचा सहवास आपल्या कार्यकर्त्यांना देऊ शकतील, असे आम्हा सर्वांना वाटत होते. डॉक्टर सर्वतोपरी प्रयत्न करत होते. घरातील सदस्यांचे सेवा करण्याचे कार्य सुरूच होते. स्थानिक स्वयंसेवकांचेही सहकार्य वेळोवेळी मिळत होते. मात्र, देशभरातील कार्यकर्त्यांची प्रार्थना होत असूनही उलटच घडले. आठवड्याभरात प्रकृती खालावल्यानंतर त्यांनी आज अचानक निजधामकडे प्रस्थान केले.
आपल्या सर्वांचे, ‘विज्ञान भारती’च्या हजारो कार्यकर्त्यांचे आणि विशेषत: त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन कसे करायचे? नियतीचा हा क्रूर खेळ विधिलिखित आहे. हे ठाऊक असूनही मन ते मानायला तयार नाही. परंतु, त्यावर उपायही काही नाही. त्यांची कार्यक्षमता, नेतृत्व क्षमता, गोड स्वभाव, स्मितहास्य, सुंदर गायन आणि स्मृतीतून प्रेरणा घेऊन पुढे आपले कर्तव्य बजावणे, हे विहित आहे. त्यांच्या दिवंगत आत्म्यास सद्गती लाभो, ही प्रार्थना करत मी माझ्या वैयक्तिक आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने त्यांच्या स्मृतीस श्रद्धांजली अर्पण करतो.
सरसंघचालक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ