मोठी सामाजिक आणि वैयक्तिक हानी

    11-Jun-2023
Total Views | 154
Article by Amita Apte on jayantrao Sahastrabudhe

संघ प्रचारक, ‘विज्ञान भारती‘चे संघटनमंत्री जयंतराव सहस्रबुद्धे यांचे प्रदीर्घ आजाराने दि. २ जून रोजी पहाटे दुःखद निधन झाले. जयंतराव यांची माझी खूप जुनी ओळख. म्हणजे २००५ पासूनची. तेव्हा ते कोकण प्रांत प्रचारक होते. त्यावर्षी चिपळूणच्या नागालॅण्ड विद्यार्थिनी वसतिगृहाची सुरुवात झाली. त्यानिमित्ताने जयंतरावांसोबत बैठकी होत असत. तेव्हा १३ मुलींची व्यवस्था वसतिगृहात होती. व्यवस्थापिका सुचिताताई भागवत, मदतनीस पुष्पाताई दांडेकर होत्या. दोन-तीन मोठ्या महिला, मी आणि माझ्या दोन-तीन मैत्रिणी वसतिगृहात नियमित असायचो. मुलींचा अभ्यास घेणे, त्यांच्याशी खेळणे, दुखलंखुपलं पाहणे, त्यांचे कपडे, अभ्यास इत्यादींकडे लक्ष देणे आम्ही अगदी मजेत, आनंदाने करायचो. मुली अगदीच शाळकरी असल्याने त्यांना घरची, आई-वडिलांची आठवण येई. मग त्यांना प्रेमाने जवळ घेणे, मायेने समजावणे हेही सहजपणे करायचो.

पण, अगदी सुरुवातीला आम्हाला मुलींशी कसे, काय बोलावे? भाषा अशा अनेक अडचणी होत्या. त्या काळात जयंतराव, अतुलजी जोग असे वरिष्ठ आमची बैठक घेत. नागालॅण्डमधील परिस्थिती, मुलींची परिस्थिती, आपल्याला नक्की काय करायचे आहे? कोणत्या उद्दिष्टाने मुली इथे आल्या आहेत? त्यांची काळजी घ्यायची म्हणजे काय करायचे? अशा अनेक विषयांवर चर्चा होत असे. मीही अगदी कॉलेजकन्या असल्याने हे सगळे प्रत्यक्ष संघसंस्कारच जणू माझ्यावर होत होते. ईशान्य भारताची पहिली ओळख झाली ती अशा बैठकांमधून! नागा मुलींसाठी ते ‘जयंत अंकल‘ होते. मुलींशी थोडावेळ का होईना, पण गप्पा मारल्याशिवाय कधी चिपळूण सोडत नसत. पूर्वांचल समजलेले आणि पूर्वांचलावर मनापासून प्रेम केलेले आमचे गुरू, मार्गदर्शक म्हणजे जयंतराव. माझं शिक्षण पूर्ण होण्याच्या मार्गावर असताना त्यांनी मला ‘नागालॅण्डला निदान सहा महिने दे‘ असे सांगितले होते.

तेव्हा मला वैयक्तिक आकांक्षांची क्षितिजे दिसत होती आणि मी त्यांना स्पष्ट ‘नाही‘ म्हणून सांगितले. इतक्या मोठ्या व्यक्तीने आपल्यावर विश्वास ठेवून काही सांगितले जे आपण करत नाही, याची बोच माझ्या मनात कायम राहिली. पण, मग संधी मिळताच ईशान्य भारताचा मार्ग धरला. उशिराने आणि कणभर तरी का होईना, आपण सांगितलेले काम करतो आहोत, याचे समाधान आहे. ‘कोविड’च्या अगदी आधी एका लग्नात भेट झाली होती. तेव्हा ते मला म्हणाले, “तुझे उद्योग कानावर येतायत, “ असं कौतुक करणारे जयंतराव मात्र गेले.त्यांच्या अपघाताची बातमीही अपघातानेच मला कळली. हे कधी ना कधी घडणार याची धाकधूक गेले अनेक महिने मनात आहे. तरी आज बातमी आल्यावर फार वाईट वाटतेय. सौम्य भाषा, सुस्पष्ट विचार, समोरच्याची अडचण समजून योग्य मार्गदर्शन करणारे, अत्यंत सालस, कुशाग्र बुद्धीचे, तासून तासून घडवलेले व्यक्तित्व असे अकारण आपल्यातून निघून जावे, ही फार फार मोठी सामाजिक आणि माझ्यासाठी वैयक्तिक हानी आहे.
जड अंतःकरणाने श्रद्धांजली.... श्रीराम!

अमिता आपटे
अग्रलेख
जरुर वाचा
१४ फूट x १४ फूट आकाराची कोठडी, २४ तास सुरक्षारक्षक, सीसीटीव्ही कॅमेरे; तहव्वूर राणाला NIA ने कुठे ठेवलंय?

१४ फूट x १४ फूट आकाराची कोठडी, २४ तास सुरक्षारक्षक, सीसीटीव्ही कॅमेरे; तहव्वूर राणाला NIA ने कुठे ठेवलंय?

(Tahawwur Rana kept Highly Secure NIA Cell) २००८ ला मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार तहव्वूर राणा याला गुरुवारी अमेरिकेतून प्रत्यार्पणानंतर ताब्यात घेण्यात आले आहे. भारतात आणल्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला १८ दिवसांची एनआयए कोठडी सुनावण्यात आली आहे. दिल्लीतील एनआयए मुख्यालयात, एक लहान, कडक सुरक्षा असलेला कक्ष आहे, जो आता गेल्या काही वर्षांतील भारतातील सर्वात हाय-प्रोफाइल दहशतवाद तपासाचे केंद्र बनला आहे. फक्त १४ फूट बाय १४ फूट आकाराच्या या कक्षात - सीसीटीव्ही कॅमेऱ्याखाली ..

तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणानंतर पंतप्रधान मोदींची १४ वर्षे जुनी पोस्ट व्हायरल! नेमकं काय म्हटलं होत?

तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणानंतर पंतप्रधान मोदींची १४ वर्षे जुनी पोस्ट व्हायरल! नेमकं काय म्हटलं होत?

(PM Narendra Modi Old Post On Tahawwur Rana) २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणाला १० एप्रिल रोजी भारतात प्रत्यार्पित करण्यात आले आहे.अनेक वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर आणि दीर्घ कायदेशीर लढाईनंतर भारताला राणाचे प्रत्यार्पण करण्यात यश आले आहे.आता राष्ट्रीय तपास यंत्रणांकडून त्याची चौकशी करण्यात येणार आहे. न्यायालयाने तहव्वूर राणाला १८ दिवसांची एनआयए कोठडी सुनावली आहे. राणाच्या प्रत्यार्पणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे १४ वर्षे जुने ट्विट आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121