असा होता उत्तरा बावकर यांचा प्रवास..

उत्तरा बावकर यांचे निधन, कलासृष्टी हळहळली

    13-Apr-2023
Total Views | 70
 
uttara bavkar
 
उत्तरा बावकर यांचे निधन झाले असे समजले आणि संपूर्ण मराठी आणि हिंदी कलासृष्टी गहिवरली. उत्तरा या एकेकाळच्या एनएसडी (नॅशनल स्कुल ऑफ ड्रमा)च्या गाजलेल्या विद्यार्थिनी. आणि त्यानंतर प्रशिक्षिका सुद्धा. इब्राहिम अल्काझी यांच्या शिष्या आणि त्यानंतरचा त्यांचा रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीतील प्रवास थक्क करणारा होता. 'तमस' या मालिकेपासून त्यांना कलासृष्टीने ओळख मिळवून दिली. त्यानंतर दूरदर्शन, मालिका, मराठी व हिंदी नाटके आणि अनेक चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनयच ठसा उमटवला. वयाच्या ७९ व्या वर्षी दीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले. अल्काझींच्या तालमीत तयार झाल्याने हिंदी रंगभूमीवरचा सुवर्णकाळ त्यांनी अनुभवला आणि स्वतःचे योगदान दिले. ‘अंधायुग’मधील गांधारी ही त्यांची भूमिका विलक्षण गाजली. प्रायोगिक रंगभूमीसाठीसुद्धा त्यांनी खूप कार्य केले.
 
अभिनयासोबत त्यांनी दिग्दर्शनही केले. जयवंत दळवींची अत्यंत गाजलेली नाटिका संध्या छाया च्या संहितेचे कुसुम कुमार यांनी हिंदी भाषांतर केले होते. या हिंदी नाटकाचे दिग्दर्शन त्यानं केले होते. उत्तरा बावकर यांनी १९८६ मध्ये ‘यात्रा’ या मालिकेतून मनोरंजनविश्वात पदार्पण केले होते. ‘एक दिन अचानक’, ‘रुक्मावती की हवेली’, ‘द बर्निंग सीजन’, ‘सरदारी बेगम’ यांसारख्या चित्रपटात त्या झळकल्या.
 
उत्तरा यांना १९८४चा संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. हिंदी नाट्य अभिनयासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. त्याचबरोबर ४ वर्षांनी १९८८ साली 'एक दिन अचानक' चित्रपटातील अभिनयासाठी सहाय्यक अभिनेत्रीचा नॅशनल फिल्म अवॉर्ड मिळाला होता.
अग्रलेख
जरुर वाचा
जन्म–मृत्यू बाबतच्या बोगस प्रमाणपत्रांना चाप! अधिनियमात सुधारणा; तात्काळ अंमलबजावणीचे महसूल मंत्र्यांचे निर्देश

जन्म–मृत्यू बाबतच्या बोगस प्रमाणपत्रांना चाप! अधिनियमात सुधारणा; तात्काळ अंमलबजावणीचे महसूल मंत्र्यांचे निर्देश

सरकारी व्यवस्थेतील उणीवांचा लाभ घेत जन्म-मृत्यू नोंदणीची प्रमाणपत्रे मिळविणाऱ्या परदेशी नागरिकांच्या हैदोसावर आता अंकुश बसणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवार, दि. १२ मार्च रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात निवेदन करून, विलंबाने करावयाच्या जन्म-मृत्यू नोंदीबाबतच्या कार्यपध्दतीनिश्चित केल्याचे सांगितले. तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार आजपासूनच महाराष्ट्रात नवीन बदल लागू होतील, अशी घोषणा केली...

लाठी मारी ते विधवांची होळी! महाराष्ट्राबाहेर होळी नेमकी कशी साजरी केली जाते ?

लाठी मारी ते विधवांची होळी! महाराष्ट्राबाहेर होळी नेमकी कशी साजरी केली जाते ?

होळी म्हणजे रंगांचा उत्सव. एका पौराणिक कथेनुसार हिरण्यकश्यपूची बहीण होलिका हिला अग्नी जाळू शकणार नाही असा वर मिळाला होता. हिरण्यकशपूने होलिकेला सांगितले की प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीवर बसावेस म्हणजे प्रल्हाद जळून मरेल आणि होलिका मात्र जिवंत राहील. हिरण्यकशपूचा सल्ला तिने ऐकला. परंतू प्रल्हादाने नारायणाचे नामस्मरण केल्याने होलिका जळून गेली आणि प्रल्हाद जिवंत राहिला या आनंदाप्रीत्यर्थ दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी प्रदोषकाली होलिकादहन केलं जाते. तसेच यावेळी दुष्ट प्रवृत्तीचा नाश व्हावा अशी प्रार्थना ..

स्वपक्षातील नेत्याच्या मुलाने तयार केलेलं चिन्ह हटवलं, हिंदीविरोधाच्य़ा नादात मुख्यमंत्री स्टॅलिन यांना पडला विसर! भाजप अध्यक्षांनी करुन दिली आठवण, म्हणाले...

स्वपक्षातील नेत्याच्या मुलाने तयार केलेलं चिन्ह हटवलं, हिंदीविरोधाच्य़ा नादात मुख्यमंत्री स्टॅलिन यांना पडला विसर! भाजप अध्यक्षांनी करुन दिली आठवण, म्हणाले...

(Tamil Nadu drops official Rupee Symbol from State Budget) तामिळनाडूमधील एमके स्टॅलिन यांचे सरकार आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून भाषेच्या मुद्द्यावर तणावाचे वातावरण आहे. यात आता तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन (M K Stalin) यांच्या निर्णयामुळे हा वाद पुन्हा पेटण्याची चिन्हे आहेत. तामिळनाडू सरकारने राज्याच्या २०२५-२६ च्या अर्थसंकल्पामध्ये रुपयाच्या चिन्हाऐवजी (₹) तमिळ भाषेतील रुबई मधील पहिले अक्षर ‘रु’ वापरण्याचा निर्णय घेतला आहे...