‘अर्थ’संवाद घडावा ही पंतप्रधान मोदींची इच्छा! : निर्मला सीतारामन

अर्थसंकल्पावर उद्योग जगतातील मान्यवरांशी चर्चा

    06-Feb-2023
Total Views | 83
 
budget 2023
 
मुंबई : “अर्थसंकल्प संसदेत सादर होईल, त्यानंतरची राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा, पंतप्रधांचे संबोधन, विरोधी पक्षाची टीपण्णी ही सर्व संसदीय प्रक्रिया पूर्ण झाल्यावर दि. 1 एप्रिलपासून अंमलबजावणी केली जाते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात एक नवा पायंडा पाडण्यास सुरुवात झाली. अर्थसंकल्प संसदेत लोकप्रतिनिधींसमोर जरी मांडण्यात आला. तरीही जनतेकडेही मांडला जावा,” अशी पंतप्रधानांची इच्छा होती. या नव्या संकल्पनेमुळे अर्थक्षेत्रातील मान्यवरांकडूनही सूचना येऊ लागल्या. अर्थमंत्रालयाने त्याचे स्वागत केले.
 
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी. त्यामुळेच मी स्वतः माझ्या संपूर्ण अर्थमंत्रालयाच्या टीमसोबत उपस्थित आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मुंबईतील वित्त, व्यापार आणि बँकिंग क्षेत्रातील मान्यवरांशी नुकताच मुंबईतील सेंट रेजिस येथे अर्थसंकल्पाबाबत संवाद साधला. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. अर्थसंकल्पाशी निगडीत अनेक विषयांवर त्यांनी विस्तृत प्रकाश टाकला. अर्थक्षेत्रातील विविध मान्यवरांच्या समस्या, सूचना आणि प्रश्न त्यांनी समजून घेतले. यावेळी केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ. भागवत कराड आणि पंकज चौधरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह अर्थमंत्रालयातील सचिवही उपस्थित होते.
 
budget 2023
 
यावेळी अर्थमंत्र्यांनी ‘स्टार्टअप्स’, ‘एमएसएमई’, ‘बँकिंग-इन्शुरन्स’सह विविध उद्योग संघटनांच्या प्रमुखांशी संवाद साधला. सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी त्या त्या क्षेत्राशी निगडीत गोष्टींवर भर देत प्रकाश टाकण्याची विनंती केली. “अर्थमंत्रालय सचिवांनी सर्वच विषयांच्या नोंदी घेतल्या आहेत. जिथे शक्य असेल, तिथे सुधारणाही केल्या जातील,” अशी माहितीही अर्थमंत्र्यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात हे सरकार राज्यांना सोबत घेऊन जाणारे आहे. राज्यांना मिळणारे 50 वर्षांसाठीचे कर्ज ही भरीव तरतूद आहे. देशाच्या विकासाच्या रथाचा वेग आता राज्यांनाही पकडावा लागेल. पायाभूत सुविधांवरील विकास हा दहा लाखांपर्यंत पोहोचू शकला, हे मोदी सरकारचे यश आहे. काही वर्षांपूर्वी आपण इतक्या गुंतवणुकीचा विचारही करू शकत नव्हतो. मात्र, पंतप्रधान मोदी आणि अर्थमंत्र्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रही पुढे जाईल,” असा विश्वास मी राज्याच्यावतीने व्यक्त करतो.
- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
 
‘अदानी समुहाबद्दलच्या निर्णयासाठी ’सेबी’ स्वायत्त!’
 
“गौतम अदानी प्रकरणावर भांडवली बाजार नियंत्रण संस्था ‘सिक्युरिटीज अ‍ॅण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया’ (सेबी) आपले काम करण्यासाठी स्वतंत्र आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेनेही यापूर्वीच आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भारतीय आर्यूर्विमा मंडळानेही (एलआयसी) या संदर्भात मध्यवर्ती बँकेला माहिती दिली आहे,” अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. मुंबईत केंद्रीय अर्थसंकल्पावर आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. ‘अदानी’ समुहाने ‘फॉलो पब्लिक ऑफर’ (एफपीओ) माघारी घेतल्याने भारताच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेबद्दल संशय व्यक्त केला जात आहे, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी हे उत्तर दिले. “असे निर्णय सर्वस्वी कंपन्यांचे असतात. प्रत्येक बाजारपेठेत या गोष्टी घडतच असतात. याउलट गेल्या दोन दिवसांत परकीय गंगाजळीत आठ दशलक्ष डॉलर्सने वाढ झाली आहे. भारतावर आजही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा विश्वास आहे. हेच यातून दिसून येते,” असेही त्या म्हणाल्या. शुक्रवारी ‘रिझर्व्ह बँके’नेही या संदर्भात भूमिका स्पष्ट केली होती. ‘’देशातील बँकिंग व्यवस्थेवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करून ती आणखी मजबूत कशी होईल, यासाठी आमचे प्रयत्न आहेत,” असे ‘आरबीआय’ने म्हटले होते त्याला जोडूनच अर्थमंत्र्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
 
अग्रलेख
जरुर वाचा
प.बंगालमधील मालदानंतर आता मुर्शिदाबादमध्ये वादंग, अफवा पसरवणाऱ्यांना पोलिसांकडून समज

प.बंगालमधील मालदानंतर आता मुर्शिदाबादमध्ये वादंग, अफवा पसरवणाऱ्यांना पोलिसांकडून समज

Marshidabad प. बंगालच्या मालदा जिल्ह्यानंतर मुर्शिदाबाद जिल्ह्यातील नौदामध्ये एका हिंसेला घेईन पोलिसांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीआहे. पोलिसांनी एक्स ट्विटर लिहिले की, मुर्शिदाबाद जिल्ह्यातील नौदात मोठा उपद्रव झाला. ज्यात हिंदूंच्या दुकानांना लक्ष्य करण्यात आले आहे. तसेच काही हिंदूंच्या शेतांचे, पिकांचे नुकसान करण्यात आले आणि तोडफोड करण्यात आली आहे. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला. या घटनेत ६ लोकांना अटक करण्यात आली आहे. इतर आरोपींना पोलीस शोधमोहिमेवर आहेत. ..

रौप्य महोत्सवी हिंदू नववर्ष स्वागतयात्रेत ठाणेकरांनी अनुभवला संस्कृतीचा महाकुंभ स्वागतयात्रेत सर्वधर्मीयांचा उत्साह

रौप्य महोत्सवी हिंदू नववर्ष स्वागतयात्रेत ठाणेकरांनी अनुभवला "संस्कृतीचा महाकुंभ" स्वागतयात्रेत सर्वधर्मीयांचा उत्साह

Hindu New Year ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वेशभूषा, चौकाचौकात रांगोळ्या...भगवे झेंडे - उपरणे आणि समाज प्रबोधनाचे धडे देणारे आकर्षक चित्ररथ अशा उत्साही वातावरणात गुढीपाडव्यानिमित्त निघालेल्या श्री कौपीनेश्वर सांस्कृतिक न्यास आयोजित हिंदु नववर्ष स्वागतयात्रेत यंदा ठाणेकरांनी "संस्कृतीचा महाकुंभ" अनुभवला. यंदा स्वागतयात्रेचे रौप्य महोत्सवी वर्ष होते. सकाळी ७ वा. श्री कौपिनेश्वर मंदिरात पालखीचे विधीवत पूजन करून प्रारंभ झालेल्या यात्रेत सर्वधर्मियांचा उत्साह दिसून आला. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार ..

सातपाटीकर ग्रामस्थ यांच्या वतीने हिंदू नववर्ष शोभायात्राचे आयोजन

सातपाटीकर ग्रामस्थ यांच्या वतीने हिंदू नववर्ष शोभायात्राचे आयोजन

Hindu New Year पालघर जिल्ह्यातील सातपाटी गावातील संस्कृती कलादर्पण संस्था आणि समस्त सातपाटीकर ग्रामस्थ यांच्या वतीने चैत्र शुद्ध प्रतिपदा शालिवाहन शके १९४७,विक्रमसंवत २०८१ रविवार दिनांक ३ मार्च २०२५ रोजी रोजी हिंदू नव वर्ष स्वागतयात्रेचे आयोजन करण्यात आले . संस्कृती कलादर्पण संस्था, सातपाटी वर्षभर गावात अनेक शैक्षणिक ,सांस्कृतिक कार्यक्रम राबवत असते.जसे ..२६ जानेवारी विद्यार्थी कवायत संचलन - जागर प्रजासत्ताक दिनाचा,तिथीनुसार शिवजन्मोत्सव,हिंदू नववर्ष शोभायात्रा ,हुतात्मा दिन - वक्तृत्व स्पर्धा,दिवाळी ..

लव्ह जिहाद : पीडितेला लग्नाचे आमिष दाखवत तीन वेळा केले गर्भवती; नंतर उपवास धरणे, गोमांस खाण्यास आणला दबाव

लव्ह जिहाद : पीडितेला लग्नाचे आमिष दाखवत तीन वेळा केले गर्भवती; नंतर उपवास धरणे, गोमांस खाण्यास आणला दबाव

love jihad उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यात लव्ह जिहादची love jihad एक घटना घडली आहे. अहमद रजा नावाच्या कट्टरपंथी युवकाने तिला आपल्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. त्यानंतर तिच्याशी शारीरिक-मानसिक शोषण करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. युवतीचे म्हणणे आहे की, अहमदने केवळ युवतीच्या भावनांसोबत खेळ केला नाहीतर, त्याने तिला मुस्लिम उपवास म्हणजेच रोजाचे पालन करण्यास भाग पाडले. त्यानंतर तिच्यावर गोमांस खाणे आणि नमाज पाडण्यासाठी दबाव टाकण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121