'कृष्णाकाठचं भयपर्व’ : सामाजिक इतिहासाचे एक पान

    25-Feb-2023
Total Views | 335
Krushnakathach Bhayparv

कृष्णाखोर्‍यातील अन्यायाच्या विरोधात झुंज देणारा एक क्रांतिकारक नायक म्हणजे बापू बिरु वाटेगावकर होय. बापूचा संघर्ष एका विशिष्ट जातीविरूद्ध नव्हता, तर तो समाजप्रधान व्यवस्थेतील अन्यायी समाजरचनेविरूद्ध होता. त्यामुळे ते लोकविलक्षण क्रांतिकारक नायक ठरतात, असा संदेश डॉ. विठ्ठल बापूजी ठोंबरे यांनी आपल्या ‘कृष्णाकाठचं भयपर्व’ या कादंबरीद्वारे दिला आहे.

भारतीय सामाजिक इतिहास हा शिवकाळ वगळता शोषणाचा व शोषितांच्या लुटीचा इतिहास आहे. या लुटीत सामान्य माणूस भरडला गेला आहे. मुख्यत: स्त्रियांच्या लुटीचाही एक स्वतंत्र संशोधनात्मक ग्रंथ निर्माण होऊ शकेल. असो. स्त्रियांची अब्रू लुटणार्‍यांविरोधात, सरंजामी प्रवृत्तीविरोधात ज्यांनी आवाज उठवला, त्यातील ठळक नाव म्हणजे बापू बिरू वाटेगावकर होय. बापूवर मराठीत लोकप्रिय चित्रपट निर्माण करण्यात आला आहे. त्यापुढे जाऊन या लोकविलक्षण नायकावर चरित्रात्मक कादंबरी लिहिणे तसे कठीण कार्य होते. त्यासाठी लेखकांच्या अंगी संशोधकवृत्तीची आवश्यकता असणे महत्त्वाचे. याशिवाय लेखन करताना चरित्रनायकाचा काळ, कौटुंबिक जीवन, समाजजीवन, त्याच्या स्वरूपाविषयी नव्याने वेध घ्यावा लागतो. हे गुण डॉ. विठ्ठल बापूजी ठोंबरे यांच्या ठायी दिसून येतात.
 
बापू बिरू वाटेगावकर यांच्या चरित्रात्मक कादंबरीतून ते उपेक्षित घटकांचे अंतरंग शोधतात. सामान्य माणसाचे दुःख, दैन्य, वासनांध वृत्ती, सवंगपणा, अगातिक मनोव्यथाच्या कंद गाभ्याला ते हात घालून सामाजिक इतिहासातील एक दुर्लक्षित पान उलगडतात. एकूण ३२० पृष्ठसंख्या असलेली ‘कृष्णाकाठचं भयपर्व’ ही एक आशयसंपन्न कादंबरी आहे. या कादंबरीत भयंकर वास्तवता आहे आणि या वास्तवेतून बापू बिरूचे बंडखोर जीवन उलगडत जाते. बापूच्या आयुष्यातील निवडक घटना आणि संघर्षाची माळ या कादंबरीत गुंफली आहे.१९६५ची गोष्ट आहे. देश स्वतंत्र झाला आणि खेडी पारतंत्र्यात गेली, असा तो काळ होता. असंख्य गावकरी अन्याय, अत्याचार सहन करीत होते. सग्यासोयर्‍यांची भलावण, दहशती वर्तन, गुंडगिरी आदी भांडवलावर गावातील सरंजामी प्रवृत्ती मजबूत बनत चालली होती. गावकरी दिवसेंदिवस स्वाभिमानशून्य होत चालले होते. अशा समाजाला स्वाभिमानाची जाणीव करून देणारा नायक दर्‍याखोर्‍यात धडपडत होता. तो नायक म्हणजे बापू बिरू वाटेगावकर होय.

बोरगाव हे छोटसे गुण्यागोविंदाने नांदणारे गाव आहे. गावात रंगा शिंदे, त्याचा सावत्र भाऊ आनंदा व त्याची टोळी गरीब गावकर्‍यांवर अन्याय, अत्याचार करीत होती. गरीब, असाहाय्य समाजातील स्त्रियांची बिनदिक्कत अब्रू लुटणारा रंगा गावात दरारा निर्माण करतो. पौरूषत्वाला आव्हान देणारी ही घटना होती. गावातील पैलवान, प्रामाणिक, कष्टाळू मेंढपाळ धनगर बापू बिरू वाटेगावकर हा सामान्य तरुण अन्यायग्रस्तांच्या हक्कांसाठी पुढे सरसावतो. गावकर्‍यांच्या सहकार्याने तो रंग्याच्या दहशतीला लगाम घालतो. रंग्याचा खून करून बापू भूमिगत होतो. येथूनच बापूच्या कार्याला कलाटणी मिळते. गरीब, असाहाय्य लोकांच्या अन्यायाचा हिशोब मागण्यास बापू प्रवृत्त होतो. त्यासाठी तो रस्त्यावर उतरतो.

बोरगाव व पंचक्रोशीत सरंजामी प्रवृत्तीमुळे भयाण, कठीण बनत चाललेल्या परिस्थिती विरोधात गरज ओळखून बापू लढण्याचे सामर्थ्य दाखवतो. अन्यायाने, शोषणाने मुर्दाड बनलेल्या अगतिक ग्रामीण रयतेला जागे करण्याचे कार्य बापू करतो. बापूंचा संघर्ष, भयंकर प्रसंग, लढा, विचार, साहस, धाडस, समजावून घ्यायचा असेल, तर त्यासाठी प्रस्तुत कादंबरी वाचणे जरूरीचे आहे.भूमिगत असताना बापूने निर्व्यसनी, अध्यात्मिक मूल्यांचा अंगीकार करून घेतलेला हा निर्णय सुधारणावादाकडे झुकणारा आहे. कष्टकरी शेतकर्‍यांच्या जमिनी भाऊबंदकीच्या व हडपणार्‍यांच्या तावडीतून सोडविणे, कर्जबाजारी शोषित, पीडित कुटुंबांना कर्जमुक्त करणे, स्त्रियांच्या अब्रूचे रक्षण करणे, गरजूंना मदत करणे अशा लोककल्याणकारी कामात उडी घेऊन बापू बिरू मानवतावादाचा जाहीरनामा मांडतात. यावरून बापूचा सत्याचा दृष्टिकोन किती व्यापक होता, हे लक्षात येते. बापूचे बंड म्हणजे त्या काळातील पुरूषधार्जिण्या व्यवस्थेला दिलेली सणसणीत चपराक आहे.

या काळात बापूंनी पुरुषी दांभिकता दाखवली नाही, कुठेही लुटमार वा चोरी केली नाही, कधीही आणि कुणालाही खंडणी मागितली नाही, कोणत्याही स्त्रीचा छळ केला नाही. उलट परस्त्रीच्या अब्रूला हात घालणार्‍या पोटच्या थोरल्या मुलास (तानाजी वाटेगावकर) यमसदनास पाठवले. बापूची ही नैतिकता स्त्रियांची प्रतिष्ठा वाढवणारा आहे. अशी ही बापूची कहाणी दंतकथा ठरत नाही, अनैतिक घटना रंगवून लबाडीचा इतिहास होत नाही, तर ती एक वास्तवतेची खरीखुरी कहाणी बनते.संपूर्ण कादंबरीचा आणि त्यातील प्रकृती संघर्षाचा, त्यातील ताणतणावाचा संदर्भ शोधताना आणखीन एक महत्त्वाची गोष्ट जाणवत राहते की, प्रत्येक परिस्थितीला आणि नियतीला सामोरे जाणारे धम्मवा आणि तिचा पती संगाप्पा, ब्राह्मण जगन्नाथ व त्याची मुलगी, सुंगधा, बापूच्या भावकितील एक महिला यांचा संघर्ष. म्हटले तर संघर्षच दिसत नाही, तर एका सबलाने दुसर्‍या दुर्बलांवर केलेला अत्याचारी, अन्यायी जीवघेणा खेळ वाटतो.

गोंदील पिता-पुत्र खून प्रकरण, पोलीस मदन पाटीलची खेळी व बापूला झालेली अटक, येरवडा कारागृहातील दिवस, जन्मठेपची शिक्षा हे सर्व प्रसंग वाचताना बापूवरचा नवा चित्रपट उभा राहतो. एकूणच डॉ. विठ्ठल ठोंबरे यांनी ही कादंबरी शास्त्रशुद्ध आणि कमालीच्या आत्मीय तळमळीतून साकार केली आहे. यातून विचारांची सहजता आणि भाषेची स्वाभाविकता प्रत्ययास येते. कृष्णाकाठच्या भाषेचा लहेजा, वाक्प्रचार, म्हणी, चटकदार शब्दयोजना यामुळे ही कादंबरी अधिक वाचनीय झाली आहे.
 
पुस्तकाचे नाव : कृष्णाकाठचं भयपर्व
 
लेखक : डॉ. विठ्ठल बापूजी ठोंबरे
 
प्रकाशन : जयमल्हार प्रकाशन, पुणे

पृष्ठसंख्या : ३२०

मूल्य : रु. ४९९/-


-विकास पांढरे



अग्रलेख
जरुर वाचा
प.बंगालमधील मालदानंतर आता मुर्शिदाबादमध्ये वादंग, अफवा पसरवणाऱ्यांना पोलिसांकडून समज

प.बंगालमधील मालदानंतर आता मुर्शिदाबादमध्ये वादंग, अफवा पसरवणाऱ्यांना पोलिसांकडून समज

Marshidabad प. बंगालच्या मालदा जिल्ह्यानंतर मुर्शिदाबाद जिल्ह्यातील नौदामध्ये एका हिंसेला घेईन पोलिसांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीआहे. पोलिसांनी एक्स ट्विटर लिहिले की, मुर्शिदाबाद जिल्ह्यातील नौदात मोठा उपद्रव झाला. ज्यात हिंदूंच्या दुकानांना लक्ष्य करण्यात आले आहे. तसेच काही हिंदूंच्या शेतांचे, पिकांचे नुकसान करण्यात आले आणि तोडफोड करण्यात आली आहे. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला. या घटनेत ६ लोकांना अटक करण्यात आली आहे. इतर आरोपींना पोलीस शोधमोहिमेवर आहेत. ..

रौप्य महोत्सवी हिंदू नववर्ष स्वागतयात्रेत ठाणेकरांनी अनुभवला संस्कृतीचा महाकुंभ स्वागतयात्रेत सर्वधर्मीयांचा उत्साह

रौप्य महोत्सवी हिंदू नववर्ष स्वागतयात्रेत ठाणेकरांनी अनुभवला "संस्कृतीचा महाकुंभ" स्वागतयात्रेत सर्वधर्मीयांचा उत्साह

Hindu New Year ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वेशभूषा, चौकाचौकात रांगोळ्या...भगवे झेंडे - उपरणे आणि समाज प्रबोधनाचे धडे देणारे आकर्षक चित्ररथ अशा उत्साही वातावरणात गुढीपाडव्यानिमित्त निघालेल्या श्री कौपीनेश्वर सांस्कृतिक न्यास आयोजित हिंदु नववर्ष स्वागतयात्रेत यंदा ठाणेकरांनी "संस्कृतीचा महाकुंभ" अनुभवला. यंदा स्वागतयात्रेचे रौप्य महोत्सवी वर्ष होते. सकाळी ७ वा. श्री कौपिनेश्वर मंदिरात पालखीचे विधीवत पूजन करून प्रारंभ झालेल्या यात्रेत सर्वधर्मियांचा उत्साह दिसून आला. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार ..

सातपाटीकर ग्रामस्थ यांच्या वतीने हिंदू नववर्ष शोभायात्राचे आयोजन

सातपाटीकर ग्रामस्थ यांच्या वतीने हिंदू नववर्ष शोभायात्राचे आयोजन

Hindu New Year पालघर जिल्ह्यातील सातपाटी गावातील संस्कृती कलादर्पण संस्था आणि समस्त सातपाटीकर ग्रामस्थ यांच्या वतीने चैत्र शुद्ध प्रतिपदा शालिवाहन शके १९४७,विक्रमसंवत २०८१ रविवार दिनांक ३ मार्च २०२५ रोजी रोजी हिंदू नव वर्ष स्वागतयात्रेचे आयोजन करण्यात आले . संस्कृती कलादर्पण संस्था, सातपाटी वर्षभर गावात अनेक शैक्षणिक ,सांस्कृतिक कार्यक्रम राबवत असते.जसे ..२६ जानेवारी विद्यार्थी कवायत संचलन - जागर प्रजासत्ताक दिनाचा,तिथीनुसार शिवजन्मोत्सव,हिंदू नववर्ष शोभायात्रा ,हुतात्मा दिन - वक्तृत्व स्पर्धा,दिवाळी ..

लव्ह जिहाद : पीडितेला लग्नाचे आमिष दाखवत तीन वेळा केले गर्भवती; नंतर उपवास धरणे, गोमांस खाण्यास आणला दबाव

लव्ह जिहाद : पीडितेला लग्नाचे आमिष दाखवत तीन वेळा केले गर्भवती; नंतर उपवास धरणे, गोमांस खाण्यास आणला दबाव

love jihad उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यात लव्ह जिहादची love jihad एक घटना घडली आहे. अहमद रजा नावाच्या कट्टरपंथी युवकाने तिला आपल्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. त्यानंतर तिच्याशी शारीरिक-मानसिक शोषण करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. युवतीचे म्हणणे आहे की, अहमदने केवळ युवतीच्या भावनांसोबत खेळ केला नाहीतर, त्याने तिला मुस्लिम उपवास म्हणजेच रोजाचे पालन करण्यास भाग पाडले. त्यानंतर तिच्यावर गोमांस खाणे आणि नमाज पाडण्यासाठी दबाव टाकण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121