वसईत तीन ग्रामपंचायतींसह एक पोट निवडणूक

अर्नाळ्यात दोन वेळा मशीन बंद पडल्याने मतदानाचा खोळंबा

    05-Nov-2023
Total Views | 37
Gram Panchayat Election Vasai District

खानिवडे :
वसई तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींसाठी व एका ग्रामपंचायटीमधील एक जागेसाठी झालेल्या पोट निवडणुकीत झालेल्या मतदानात मतदारांमध्ये मोठा उत्साह होता. यातील पूर्वेच्या सायवन येथे मतदान करण्यासाठी मतदारांच्या रांगा लागल्याचे दिसून आले.

मात्र याच बरोबर अर्नाळा येथे इ व्ही एम बंद पडल्याने मतदान खोळंबले होते .मिळालेल्या माहितीनुसार सकाळी जे मशीन बंद झाले त्याजागी दुसरी मशीन लावली मात्र तीही बंद पडली .त्यानंतर तिसरी मशीन लावून सकाळी दहा नंतर मतदानाला सुरवात झाली. यामुळे मतदारांमध्ये मोठा संताप निर्माण झाला होता.

वसई पूर्वेकडील एकमेव सायवन ग्रामपंचायतिची निवडणूक होत असून ९ सदस्य व एक सरपंच अशा १० जागांसाठी निवडणूक होत आहे .येथे सत्ताधारी बहूजन विकास आघाडी, शिवसेना व मनसे अशी तिरंगी लढत होत आहे.

सायवन ग्रामपंचायत हद्दीमध्ये घाटेघर, पळीपाडा, चाळीसगाव, सायवन व इतर गावपड्यांचा समावेश असून सुमारे १३०० मतदार आहेत . सध्या भात शेती कापणीची कामे असल्याने सकाळीच ग्रामस्थ मतदारांनी मतदानाचा हक्क बजवला .त्यामुळे येथे भल्या मोठ्या रांगा लागल्या होत्या . दुपारनंतर येथे ५० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाल्याचे सांगण्यात आले. तर दीड वाजेपर्यंत तिन्ही ग्रामपंचायतींमध्ये ४३ .७५ इतके मतदान खाल्ले होते.

सायावन येथे या गावचे मतदार असलेले माजी खासदार बळीराम जाधव, व ठाणे जिल्ह्य मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी मतदानाचा हक्क बाजवला व थेट सरपंचांसह सर्व उमेदवार जिंकतील असा विश्वास प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केला .पोट निवडणुकीत दुपारी दीड वाजेपर्यंत ७०टक्के मतदान झाले होते.

अग्रलेख
जरुर वाचा
हैदराबादमध्ये जंगलतोड करण्यात आलेल्या कांचा गचिबोवलीचे एआय जनरेट फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने अधिकाऱ्याला बजावली नोटीस

हैदराबादमध्ये जंगलतोड करण्यात आलेल्या कांचा गचिबोवलीचे एआय जनरेट फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने अधिकाऱ्याला बजावली नोटीस

Kancha Gachibowli तेलंगणा राज्यातील हैदराबाद विद्यापीठाच्या नजीक असणाऱ्या कांचा गचिबोवली (Kancha Gachibowli) ही ४०० एकर जंगलतोड करण्यात आली. तेलंगणा सरकारने आयटी कंपनी उभारण्यासाठी ही जागा घेतली होती. मात्र त्यांनी जंगलातील झाडे कापून नैसर्गिक हानी केली आहे. यामुळे संबंथित विद्यार्थ्यांनी याविरोधात आंदोलन केले होते. कांचा गचिबोवली जंगलात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या प्रात्यक्षिक करणासाठी फायदेशीर जंगल होते. यालाच देशभरातून विविध माध्यमातून निषेध व्यक्त करण्यात आला होता. याच पद्धतीने आता ..

वक्फ कायदा मंजूरीनंतर उत्तर प्रदेशात वक्फ दाव्यावर पहिली पोलीस तक्रार

वक्फ कायदा मंजूरीनंतर उत्तर प्रदेशात वक्फ दाव्यावर पहिली पोलीस तक्रार

Waqf Act संसदेच्या दोन्ही सभागृहात वक्फ सुधारित कायदा पारित झाल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सही करत कायद्याला मंजूरी देत वाट मोकळी केली आहे. याचा देशभरात चांगला प्रतिसाद दिसत आहे. तर काही धर्मांध यांचा गैर अपप्रचार करत आहेत. वक्फ कायदा लागू झाल्यानंतर इतरांच्या मालकी हक्कांवर वक्फ दावा करणाऱ्यांना आता चाप बसणार आहे. अशातच आता असेच एक प्रकरण समोर आले आहे. ज्यात अवैधपणे जमिनींवर वक्फने दावा केला आणि आता त्याविरोधात पोलीस तक्रार करण्यात आली आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील बरेलीतील असल्याचे सांगण्यात ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121