सूर्याजी पिसाळने घराघरांत आग लावणे बंद करावे!

- भाजप आ. नितेश राणेंचा संजय राऊतांवर प्रहार

    09-Oct-2023
Total Views | 402
 
Raut
 
 
 
मुंबई : संजय राऊत हा शकुनी मामा, सूर्याजी पिसाळ आहे. बाळासाहेब तुझेही विठ्ठल होते ना मग त्यांचं घर का फोडले? असा सवाल करीत संजय राऊत यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये भांडण लावून दिली. आता आदित्य आणि तेजस यांच्यात भांडणे का लावताय? असा सवाल उपस्थित केला आहे. आग काड्या लावण्याचे काम स्वत:हून बंद करुन मग इतरांना संजय राऊत यांनी सल्ला द्यावा,असे भाजप आमदार नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
 
राऊतांना प्रत्त्युत्तर करताना राणे म्हणाले, "२०१९ ला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनण्याची स्वप्न हाच संजय राजाराम राऊत बघत होता. आणि पवार साहेब हे माझंच नाव चालवणार म्हणून आमदारांना फोन करायला लागला आणि याच्या लायकीप्रमाणे दोन ते तीन पेक्षा जास्त आमदार त्याच्या बैठकांना जमलेच नाही. म्हणजे हीच का याची लायकी आहे. सुनील राऊत ह्याची उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना लायकी कदाचित ओळखली. आणि म्हणून महाविकास आघाडीच्या सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये संजय राजाराम राऊतला साधं राज्यमंत्री पण बनवलं नाही."
 
"जी खिचडी चोरी करण्याची क्षमता ही राजाराम राऊतांच्या कुटुंबीयांमध्ये आहे. यासाठी तुम्हाला खरंच मानलं पाहिजे. ही क्षमता अजून कोणाच्याही कुटुंबीयांमध्ये नाही. फडणवीसांनी काय करावं? कुठे काम करावं? एवढं बोलण्याएवढे आपण मोठे नाही आहोत. योग्य वेळी ते निर्णय घेतील. ह्या तिघांना काम करू द्या. उगाच बडबड करू नका आणि राऊतांना फुलटाॅस देऊ नका. संजय राऊत हा शकुनी मामा, सूर्याजी पिसाळ आहे."
 
"बाळासाहेब तुझेही विठ्ठल होते ना मग त्यांचं घर का फोडले? संजय राऊत यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये भांडण लावून दिली. आता आदित्य आणि तेजस यांच्यात भांडणे का लावताय? पवारांसोबत देखील तेच केले. एकाबाजूला शरद पवार यांना विठ्ठल म्हणतोस ना मग सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यात का भांडण लावतो? जिकडे जातो तिकडचे घर फोडतो. असली काड्या टाकण्याची कामे बंद कर आणि मग दूस-यांना सल्ले दे." असा हल्लाबोल आ. नितेश राणेंनी राऊतांवर केला आहे.
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल, छत्तीसगढमध्ये २६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल, छत्तीसगढमध्ये २६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

Naxal free India छत्तीसगढ पोलिसांच्या ‘लोन वर्राटू’ अर्थात ‘घरी परत या’ या मोहिमेंतर्गत सोमवारी तब्बल २६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. त्यामुळे नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी पाऊल पडले आहे. छत्तीसगढ राज्यातील दंतेवाडा जिल्ह्यात सुरू असलेल्या नक्षल निर्मूलन मोहिम 'लोन वर्राटू' (आणि राज्य सरकारच्या पुनर्वसन धोरणामुळे एकूण २६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. यामध्ये ३ इनामी नक्षलवाद्यांचा समावेश आहे. हे आत्मसमर्पण ७ एप्रिल रोजी दंतेवाडा येथील डीआरजी कार्यालयात झाले. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांम..

ईशनिंदचा आरोप लावत जमावाने बांगलादेशी हिंदू युवकाला केली जबर मारहाण

ईशनिंदचा आरोप लावत जमावाने बांगलादेशी हिंदू युवकाला केली जबर मारहाण

Bangladeshi Hindu बांगलादेशातील टांगाइल जिल्ह्यात रविवार ६ एप्रिल २०२५ रोजी एका ४० वर्षीय हिंदू अखिल चंद्र मंडलवर काही कट्टरपंथींनी इशनिंदाचा आरोप करत जमावाने हल्ला केला आहे. कट्टरपंथीयांनी अखिल चंद्र मंडलवर इस्लमा धर्माविषयी आणि पैगंबर मोहम्मदांबाबत आरोप लावणयात आला आहे. ही माहिती प्रसारमाध्यमाद्वारे समोर आली आहे. त्यामुळे आता इतर वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,बांगलादेशात हिंदू अद्यापही सुरक्षित नसल्याचे वास्तव नाकारता येत नाही. यावेळी हल्ला सुरू असताना बचाव पथकाने मध्यस्थी केली, मात्र बचाव पथकाने ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121