‘लव्ह जिहाद’विरोधात हिंदूगर्जना!

    24-Jan-2023
Total Views | 70
against love jihad morcha
कराड : ‘लव्ह जिहाद’, गोहत्या आणि धर्मांतराविरोधात तसेच समान नागरी कायद्याच्या मागणीसाठी सोमवार, दि. २३ जानेवारी रोजी कराड शहरात भव्य स्वरुपात हिंदूगर्जना मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शहरात नागरिक विशेष करुन महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तेलंगणचे आमदार राजासिंह ऊर्फ राजाभैय्या यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “देशातील बहुसंख्य लोक आक्रमकपणे आंदोलन करत आहेत. मोर्चे काढत आहेत, तरी जनभावना आणि न्याय मागण्यांचा आदर करून, ’लव्ह जिहाद’, गोहत्या आणि धर्मांतराविरोधातील कायदा करण्याबरोबरच समान नागरी कायद्याची मागणीही सरकारने पूर्ण करावी,” असे ते म्हणाले.

कराडचे प्रवेशद्वार असलेल्या पांढरीच्या मारुती मंदिरापासून आमदार राजाभैय्या, भाजप नेते डॉ. अतुल भोसले, विक्रम पावसकर, एकनाथ बागडी यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या मुख्य मार्गावरून हिंदूगर्जना मोर्चा निघाला होता. भगव्या टोप्या घातलेल्या युवती व महिला हातात ध्वज व आपल्या मागण्यांचे फलक घेऊन मोर्चाच्या अग्रभागी सहभागी झाल्या होत्या. मोर्चात हिंदुत्ववादी संघटना सहभागी झाल्याने या आंदोलनाला भव्य स्वरूप आले होते. मोर्चेकर्‍यांनी हिंदू विरोधी प्रवृत्तीच्या विरोधात घोषणा दिल्याने सारा परिसर दणाणून गेला होता.

आपल्या भाषणात राजाभैय्या म्हणाले की,“ हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार तरुणांनी जोपासण्याची आवश्यकता असताना बाळासाहेबांच्या जन्मदिनी आज हजारो तरुण हिंदुत्वाचा विचार घेऊन या आंदोलनात सहभागी झाले आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या म्हणण्याप्रमाणे हिंदू तरुण केवळ मंदिरात घंटा वाजवणारा नव्हे, तर देशद्रोह्यांना ठोकणाराही असला पाहिजे. लव्ह जिहाद, गोहत्या आणि धर्मांतर रोखण्याची आज आवश्यकता असून, तरुणांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेनुसार अखंड हिंदू राष्ट्र बनवण्यासाठी कटिबध्द राहिले पाहिजे,” असे आवाहनही राजाभैय्या यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराजांना छळणार्‍या आणि छत्रपती संभाजी महाराजांचे तुकडे तुकडे करून त्यांना मारणार्‍या औरंगजेबाला ‘एमआयएम’चे आमदार अथवा अन्य कोणी दयाळू म्हणत असतील, तर अशा प्रवृत्तींना झोडपून हाकलून दिले पाहिजे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह जे पक्ष हिंदूविरोधी आहेत. त्यांच्याबाबत हिंदू जनतेने गांभीर्याने विचार करण्याची नितांत गरज असल्याचे आवाहनही राजाभैय्या यांनी आपल्या दमदार भाषणात या वेळी केले. अन्य मान्यवरांनीही या वेळी केलेल्या भाषणातून हिंदू गर्जना दुमदुमली.

‘लव्ह जिहाद’, गोहत्या आणि धर्मांतर या गंभीर प्रश्नांवर प्रचंड मोठी आंदोलने सुरु असल्याने आमच्या मागणीनुसार हे तीनही गैरकृत्ये रोखण्यासाठी कठोर कायदा व्हावा.
-राजासिंह ऊर्फ राजाभैय्या, तेलंगणचे आमदार





अग्रलेख
जरुर वाचा
नागपूरात हिंसाचार कसा घडला? जाणून घ्या सपूर्ण घटनाक्रम...

नागपूरात हिंसाचार कसा घडला? जाणून घ्या सपूर्ण घटनाक्रम...

दिवस होता सोमवार. रात्री ७.३० ते ८ वाजताच्या सुमारास नागपूर शहरातील काही भागात अचानक हिंसाचार उसळला. दोन गटात हाणामारी, दगडफेक, वाहनांची जाळपोळ या सगळ्या घटनांनी नागपूर हादरलं. एवढंच नाही तर जमाव पांगवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. तरीसुद्धा पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करत रात्री उशीरापर्यंत जमाव पांगवत हा हिंसाचार शांत केला. मुख्य म्हणजे हा सगळा प्रकार घडला तो म्हणजे कायम वर्दळ असलेल्या महाल परिसरात. सध्या नागपूरात संचारबंदी लागू करण्यात आलीये. मात्र, या घटनेची सुरुवात नेमकी कशी झाली? ..