"लोकांच्या जीवावर उठलेल्या काँग्रेसची आता खैर नाही"

खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचा इशारा

    21-Aug-2022
Total Views | 93

sujay
 
 
अहमदनगर : "महाविकास आघाडी सरकारच्या काळात वाळू तस्करांच्या भल्यासाठी लोकांच्या जीवावर उठण्यापर्यंत काँग्रेस कार्यकर्त्यांची मजल गेली होती आणि या सगळ्याला माजी महसूलमंत्र्यांचे आशीर्वाद होते'असा आरोप खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केला आहे. या सर्वांची आता गय केली जाणार नाही, असा सज्जड दमही विखे पाटील यांनी दिला आहे. आताचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे दोघे या सगळ्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार आहेत असेही विखे पाटील म्हणाले.
 
महाविकास आघाडीच्या काळात जिल्ह्यातील वाळू माफियांनी त्यावेळच्या महसूल मंत्र्याच्या आशीर्वादाने हैदोस घातला होता. महसूल मंत्र्याचे नातेवाईक, कार्यकर्ते, यांची लोकांच्या डोक्याला पिस्तूल लावण्यापर्यंत मजल गेली होती. जिल्ह्यातील राष्ट्रवादीनेही या सर्व गोष्टींना छुपा पाठिंबाच दिला होता. नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेणारे कोणीच नव्हते, त्यांना वाचवायला कोणीच पुढे येत नव्हते. आत लवकरच ही परिस्थिती बदलली जाणार आहे, हे सर्व धंदे करणारे लोक आणि त्यांचे पाठीराखे या सर्वांना मुळापासून उपटून काढण्यासाठीच आता काम करणार असा इशाराच विखे पाटीलांनी दिला.
 
 
आमच्या पक्षात असे काळे धंदे करणाऱ्यांनी येऊच नये, त्यांच्याशी संगनमत असलेल्या अधिकाऱ्यांनीही आमच्याकडे येऊ नये, अशा कोणालाच आमच्या पक्षात स्थान मिळणार नाही, माझ्या कार्यकर्त्यांनीही या असल्या लोकांपासून दूरच राहावे असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.
जरुर वाचा
तुला घाबरण्याची गरज नाही..., शमीच्या लेकीने धुलीवंदन सण साजरा केल्याप्रकरणी मध्य प्रदेश मंत्र्याने पत्राद्वारे शमीला दिला धीर

"तुला घाबरण्याची गरज नाही...", शमीच्या लेकीने धुलीवंदन सण साजरा केल्याप्रकरणी मध्य प्रदेश मंत्र्याने पत्राद्वारे शमीला दिला धीर

Mohmmed Shami टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने उपवास सुरू असताना पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यादरम्यान ज्यूस प्यायल्याने त्याला एका मौलवीने इस्लामचा धर्म भ्रष्ट केल्याप्रकरणी टीका केली. उपवास सुरू असतानाही तो ज्यूस पित होता. त्याने उपवास पाळल्यावरून काही धर्मांधांनी त्याला धारेवर धरले. त्यानंतर आता त्याच शमीच्या लेकीने धुलीवंदन सणाचा आनंद घेतल्याने टीका करण्यात आली. यामुळे आता मध्य प्रदेशचे मंत्री विश्वास सारंग यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. कट्टरपंथींनी अनेक सीमा ओलांडल्या असल्याचे..