विरोधी पक्षांमध्ये गेल्यावर उद्धवजी ऍक्टिव्ह झालात काय?

मंत्री दीपक केसरकर यांचे प्रतिपादन

    18-Dec-2022
Total Views | 59
Deepak Kesarkar


शिर्डी : शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर हे हिवाळी अधिवेशनासाठी नागपूरला रवाना होण्यापूर्वी शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाला पोहचले. यावेळी दीपक केसरकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका करत केसरकर म्हणाले की, सत्ता जाताच उद्धव ठाकरेंच्या तोंडावरचा मास्क उतरलाय. तसेच ठाकरे आता रस्त्यावर उतरले हे चांगले आहे. मात्र ज्यावेळी लोकांसाठी रस्त्यावर उतरण्याची संधी होती तेव्हा उतरायला हवं होतं.त्यामुळे विरोधी पक्षांमध्ये गेल्यावर उद्धवजी तुम्ही ऍक्टिव्ह झालात का? असा सवाल दीपक केसरकरांनी केला.


जोपर्यंत सरकार अस्तित्वात होतं तोपर्यंत त्यांच्या चेहऱ्यावर मास्क होता मात्र, सत्ता जाताच दुसऱ्या क्षणी मास्क तो उतरला अशी बोचरी टीका त्यांनी केली. तसेच उद्धव ठाकरे यांची आमच्यासारख्या आमदारालासुद्धा भेटत नसल्याने महाराष्ट्र ठप्प झाला होता. विरोधी पक्षांमध्ये गेल्यावर महाराष्ट्र ऍक्टिव्ह झाला का..? असा सवाल करत केसरकर यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.


मंत्री दीपक केसरकरांनी यावेळी संजय राऊतांनाही टोला लगावला आहे, ते म्हणाले संजय राऊत जे बोलतात त्याच्या उलटं महाराष्ट्रात घडतं. त्यांनी वाईट बोललं की चांगलंच होत असतं. ज्यांच्याबद्दल संजय राऊत वाईट बोलले ती लोक मोठीचं झाली. संजय राऊतांनी दररोज वाईट बोलत राहावं, आम्ही आमचं काम चालूच ठेऊ असा टोला केसरकर यांनी संजय राऊतांना लगावला आहे.त्यामुळे राज्य सक्षमपणे चालवावं लागतं. केवळ केंद्राकडे बोट दाखवून होत नाही. असा ही टोला केसरकरांनी ठाकरेंवर लगावलाय.




आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.
जरुर वाचा
हरिद्वार येथे अखिल भारतीय शास्त्र स्पर्धेला सुरुवात

हरिद्वार येथे अखिल भारतीय शास्त्र स्पर्धेला सुरुवात

केंद्रीय संस्कृत विद्यापीठ, नवी दिल्ली आणि पतंजली विद्यापीठ, हरिद्वार यांच्या संयुक्त विद्यमाने ६२ वी अखिल भारतीय शास्त्र स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. दि. १८ ते २१ मार्च दरम्यान हरिद्वार येथे होत असलेल्या या स्पर्धेच्या उद्घाटन सत्रात पतंजली विद्यापीठाचे कुलगुरू आचार्य बाळकृष्ण यांनी सभागृहात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ते म्हणाले, संस्कृत ही केवळ प्राचीन भाषा नसून ती अध्यात्म, विज्ञान आणि संस्कृतीचा अद्भुत संगम आहे. संस्कृत ही आपली मूळ भाषा आहे, जी सत्यतेवर आधारित आहे. अशा कार्यक्रमांच्या माध्यमा..

पत्नीने आंधळ्यासारखं प्रेम करणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने केला खून! ड्राममध्ये ठेवण्यात आला मृतदेह, पत्नीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात केली तक्रार

पत्नीने आंधळ्यासारखं प्रेम करणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने केला खून! ड्राममध्ये ठेवण्यात आला मृतदेह, पत्नीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात केली तक्रार

Saurav Murder उत्तर प्रदेशातील मेरठमधील ब्रह्मपुरी पोलीस ठाणे परिसरात एक खळबळजनक घटना घडली आहे. ज्यात एका पत्नीने तिच्या प्रियकरासह तिच्या पतीची हत्या करण्यात आली. हत्येनंतर मृतदेह घरातील एका मोठ्या ड्रममध्ये ठेवण्यात आला आणि त्यावरील असणारे लोखंडी झाकण सिमेंटचा लेप देऊन बंद करण्यात आले. कोणालाही कसलाही संशय येऊ नये म्हणून, पत्नी तिच्या पतीच्या मोबाईलवरून त्याच्या जवळच्या लोकांना सतत मेसेज आणि कॉल करत. या संबंधीत घटनेची माहिती पोलिसांनी घटनास्थळी जाखल झाले होते. त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनास..