राहुल गांधींची मुक्ताफळे! म्हणे अग्निवीरमुळे समाजात गुन्हेगारी वाढणार

    15-Nov-2022
Total Views | 56
RAHUL


हिंगोली : काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ही हिंगोलीत पोहोचली होती. येथील माळहिवरात कॉर्नर सभेत भाषण करताना राहुल गांधी म्हणाले की,"अग्निवीर योजनेमुळे समाजात गुन्हेगारी वाढेल." केंद्र सरकारने काही दिवसापूर्वी अग्निवीर आणि अग्निपथ या दोन योजना आणल्या. या दोन्ही योजनेविरुद्ध अनेक ठिकाणी मोर्चे, आंदोलन झाली. परंतु हिंगोलीच्या सभेत राहुल गांधी यांनी केलेले वक्तव्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.



केंद्र सरकारने सैन्यात भरती इच्छिणाऱ्या तरुणांसाठी अग्निवीर योजना आणली. चार वर्षाच्या सेवेनंतर हे अग्निवीर हे आपल्या गावी येतील. अशावेळी या बेरोजगार झालेल्या अग्निवीर तरुणांकडे शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण असेल, मग त्यांच्याकडून गुन्हेगारी घडू शकते. त्यामुळे समाजात गुन्हेगारीचे प्रमाण वाढू शकते, असे वादग्रस्त वक्तव्य राहुल गांधी केले. देशाच्या सैन्यात जाणारा तरुण हा देशाच्या सेवेसाठी स्वतःच्या जीवाचे बलिदान द्याला तयार असतो. अशावेळी राहुल गांधी यांनी केलेले हे विधान म्हणजे भारतीय सैन्यावर आणि भारतीय सैन्याच्या प्रशिक्षणावर शंका घेतल्यासारखे आहे, अशी टीका आता राहुल गांधींवर केली जात आहे.







अग्रलेख
जरुर वाचा
नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तहव्वूर राणाचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण, सत्तेतून बाहेर जाऊनही काँग्रेस घेतंय श्रेय?

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तहव्वूर राणाचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण, सत्तेतून बाहेर जाऊनही काँग्रेस घेतंय श्रेय?

Tahawwur Rana काँग्रेस नेतृत्वाखालील असणाऱ्या युपीए सरकारला सत्तेतून बाहेर जाऊन ११ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, विरोधक नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या एनडीए सरकारच्या प्रत्येक कामाचे श्रेय हे स्वत:घेताना दिसत आहेत. नरेंद्र मोदींच्या प्रयत्नातून युपीए सरकारच्या शासनकाळात २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाला अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पित करण्यात आले आहे. नरेंद्र मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली संबंधित दहशतवाद्याचे प्रत्यार्पित करण्यात आले. मात्र, याचे सर्व श्रेय हे काँग्रेस घेत असल्याच..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121