"दीड वर्षांच्या कोवळ्या जीवाला राजकारणात ओढतात..."

चित्राताई वाघ यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल!

    07-Oct-2022
Total Views | 159

Chitra Vagh
मुंबई: शिवतीर्थावर पार पडलेल्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना थोडेसे भान ही ठेवले नाही. ठाकरेंनी केलेल्या टीकेवरून आता प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडले आहे. "शिवरायांनी महिलांचा सन्मान करायला शिकवलं, तुम्ही तर तेही विसरलात. राजकारणाच्या या घसरलेल्या पातळीचा निषेध करावा तितका कमी आहे." असे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.
 
 
"शिवसैनिक सोडून स्वतःसाठी मुख्यमंत्रीपद. मुख्यमंत्री झाल्यावर शिवसैनिक सोडून स्वतःकडेच पक्षाध्यक्षपद. शिवसैनिक सोडून मुलासाठी मंत्रिपद. एखादी महिला शिवसैनिक सोडून घरातच संपादकपद. पदे वाटताना ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी‘ पाळणारे बिचाऱ्या दीड वर्षांच्या कोवळ्या जीवाला राजकारणात ओढतात... हे करत असताना त्याच्या आईच्या मनाचा जराही विचार केला नाही की तिला काय वाटले असेल. शिवरायांनी महिलांचा सन्मान करायला शिकवले, तुम्ही तर तेही विसरलात. राजकारण इतक्या खालच्या पातळीला याआधी कधीही गेले नव्हते..ज्यांनी नेले त्यांचा निषेध करावा तितका कमी आहे." अशी भूमिका चित्राताईंनी मांडली.
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे पूर्ण होतील. संघाचा जन्म, जन्मापासून करावा लागलेला संघर्ष, विस्तार व आज समाजातील सर्वच क्षेत्रांवर संघाचा पडलेला लक्षणीय प्रभाव, या सार्‍या प्रक्रियांबाबत समाजात, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही कमालीचे कुतूहल आहे. यांसारख्या विविध विषयांवर ‘ऑर्गनायझर’चे संपादक प्रफुल्ल केतकर, ‘पांचजन्य’चे संपादक हितेश शंकर, सा. ‘विवेक’च्या संपादक अश्विनी मयेकर आणि मल्याळम दैनिक ‘जन्मभूमी’चे सहसंपादक एम. बालकृष्णन यांनी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद.....

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121