पूजा चव्हाण प्रकरणी सीबीआय चौकशी शक्य आहे का?

    23-Feb-2021
Total Views | 169

Pooja Chavan 122 _1 
 
 
 

संजय राठोड शक्तीप्रदर्शन करून कुणावर दबाव आणताहेत ?





मुंबई :
राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचे नाव बंजारा समाजातील पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात आल्यानंतर त्यांच्यावर चोहोबाजूने विरोधकांनी टीका सुरू केली आहे. पूजाच्या मृत्यूची आता सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी भाजप आमदार प्रसाद लाड यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. पूजा प्रकरणात अद्याप १३ ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतरही कारवाई झालेली नाही. यामुळे आता या प्रकरणी निःपक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी आमदार लाड यांनी केली आहे.


 
 
लाड म्हणाले, "बीडच्या पूजा चव्हाण कथित आत्महत्याप्रकरणी संशयित असलेले मंत्री संजय राठोड हे आज प्रसिद्धीमाध्यमांपुढे बोलत असताना चौकशीतून सत्य बाहेर येईल, असे वारंवार सांगत होते. मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत, असे ते सांगत होते. मात्र, त्यांनी आज ज्या प्रकारे शक्तिप्रदर्शन करून पोहरा देवीचे दर्शन घेतले. त्यामुळे निःपक्ष चौकशी होईल का, याबद्दल साशंकता आहे. म्हणून सीबीआय मार्फत चौकशी करावी, अशी मागणी मी करत आहे."

 
 
सीबीआय चौकशी शक्य आहे का ?
 
सुशांत सिंह प्रकरणात मुंबई पोलीस तपास करत असताना तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. त्यावेळी बिहार पोलीसांकडे सुशांतच्या मृत्यू प्रकरणी त्याच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे हा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आल्याचे बिहार पोलीसांनी सांगितले होते. यावेळी मुंबई पोलीस विरुद्ध बिहार पोलीस व सीबीआय, असा सामना सुरू होता. पूजा चव्हाण प्रकरणात अद्याप कारवाई संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे तपास सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार का हा देखील प्रश्न आहे.



अग्रलेख
जरुर वाचा
नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल, छत्तीसगढमध्ये २६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल, छत्तीसगढमध्ये २६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

Naxal free India छत्तीसगढ पोलिसांच्या ‘लोन वर्राटू’ अर्थात ‘घरी परत या’ या मोहिमेंतर्गत सोमवारी तब्बल २६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. त्यामुळे नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी पाऊल पडले आहे. छत्तीसगढ राज्यातील दंतेवाडा जिल्ह्यात सुरू असलेल्या नक्षल निर्मूलन मोहिम 'लोन वर्राटू' (आणि राज्य सरकारच्या पुनर्वसन धोरणामुळे एकूण २६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. यामध्ये ३ इनामी नक्षलवाद्यांचा समावेश आहे. हे आत्मसमर्पण ७ एप्रिल रोजी दंतेवाडा येथील डीआरजी कार्यालयात झाले. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांम..

ईशनिंदचा आरोप लावत जमावाने बांगलादेशी हिंदू युवकाला केली जबर मारहाण

ईशनिंदचा आरोप लावत जमावाने बांगलादेशी हिंदू युवकाला केली जबर मारहाण

Bangladeshi Hindu बांगलादेशातील टांगाइल जिल्ह्यात रविवार ६ एप्रिल २०२५ रोजी एका ४० वर्षीय हिंदू अखिल चंद्र मंडलवर काही कट्टरपंथींनी इशनिंदाचा आरोप करत जमावाने हल्ला केला आहे. कट्टरपंथीयांनी अखिल चंद्र मंडलवर इस्लमा धर्माविषयी आणि पैगंबर मोहम्मदांबाबत आरोप लावणयात आला आहे. ही माहिती प्रसारमाध्यमाद्वारे समोर आली आहे. त्यामुळे आता इतर वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,बांगलादेशात हिंदू अद्यापही सुरक्षित नसल्याचे वास्तव नाकारता येत नाही. यावेळी हल्ला सुरू असताना बचाव पथकाने मध्यस्थी केली, मात्र बचाव पथकाने ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121