औरंगाबादेत पुन्हा ढगफुटी सदृश्य पाऊस

औरंगाबादेत पुन्हा ढगफुटी सदृश्य पाऊस

    02-Oct-2021
Total Views | 128

aurangabad_1  H


सुखना नदीला मोठा पूर


औरंगाबाद:
गुलाब चक्रीवादळाच्या तडाख्यांनांतरही औरंगाबादेत पावसाचा जोर कायम आहे. शुक्रवारी मध्यरात्री शहरात पहाटे ढगफुटी सदृश्य पावसाने पुन्हा एकदा औरंगाबादला झोडपले आहे. त्यामुळे सुखना नदीला मोठा पूर आला असून गावांत पाणी शिरले आहे.


गुलाब चक्रीवादळाच्या प्रभावामुळे औरंगाबादला मुसळधार पावसाने झोपडले आहे. मुसळधार सतत कोसळत असलेल्या पावसामुळे नदी- नाले दुधडी भरुन वाहत आहेत. तर, जायकवाडीसह अन्य धरणदेखील पूर्ण क्षमतेने भरली आहेत. अनेक भागात नद्यांचे पाणी शेतात शिरल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उसंत घेतल्याना नागरिकांना थोडा दिलासा मिळाला होता. मात्र शहरात शनिवारी पहाटे पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली आहे. पहाटे तीन- चारच्या दरम्यान विजेच्या कडकडाटासह शहरात मुसळधार पाऊस कोसळला. अर्धा ते पाऊण तास पडलेल्या पावसाने संपूर्ण रस्ते जलमय झाले आहेत.


मुसळधार पावसामुळे महापालिकेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नूर कॉलनी परिसर येथे आणीबाणी सारखी परिस्थती निर्माण झाली होती. नाल्याला पूर आल्यामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे.घरांमध्ये चार - पाच फूट पाणी साचले होते त्यामुळे नागरिकांचे मोठे हाल झाले आहेत. या मुसळधार पावसाने सुखना नदीने रुद्ररूप धारण केले आहे. सईनगर मधील अनेक घराची पडझड होऊन अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. रस्त्यांवर पाण्याचे लोंढे वाहिल्यामुळे अनेक वाहनांचे मोठे नुकसान होत आहे. शहरातील नारेगाव आणि पिसादेवी परिसरात पावसाचे पाणी घुसले. यामुळे दुकानांचे मोठे नुकसान झाले. रात्रीतून अचानक दुकानांमध्ये पाणी शिरल्याने येथील वस्तू आणि मालाचे मोठे नुकसान झाले. पावसाचे पाणी गावात आणि रस्त्यावर साचल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले.या पुरामुळे सोयगाव मार्गे पाचोरा जोडणारा राज्यमार्ग बंद पडला होता. सोयगाव तालुक्यातील तिडका नदीला आलेल्या पुरामुळे सोयगाव मार्गे पाचोरा जोडणारा राज्यामर्ग बंद पडला. त्यामुळे औरंगाबाद जळगाव या दोन जिल्ह्यांचा संपर्क तुटला. सध्या नदीच्या काठावर दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

अग्रलेख
जरुर वाचा
‘द रूट्स ओपन माईक’च्या दोन यशस्वी वर्षांचा सांस्कृतिक उत्सव!

‘द रूट्स ओपन माईक’च्या दोन यशस्वी वर्षांचा सांस्कृतिक उत्सव!

‘संस्कार भारती’ कोकण प्रांताच्या पुढाकारातून सुरु झालेल्या ’THE ROOTS OPEN MIC ’ या उपक्रमाने आपल्या दोन यशस्वी वर्षांची पूर्तता साजरी केली. ‘सा कला या विमुक्तये’ या मूलमंत्रासोबत विविध कलांच्या अभिव्यक्तीसाठी कार्यरत असलेला हा अनोखा उपक्रम. या उपक्रमांतर्गत दर महिन्याच्या तिसर्‍या शनिवारी होणार्‍या कार्यक्रमाच्या यंदाच्या सत्रात मातृदिवस आणि समरसतेसारख्या भावनिक विषयांना वाहिलेली सादरीकरणे करण्यात आली. तसेच दि. 20 मे रोजी येणार्‍या थोर कवी सुमित्रानंदन पंत यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121