अकोल्यात १० तबलिगींपैकी चौघांची चाचणी; इतरांचा शोध सुरु

    02-Apr-2020
Total Views | 89
akola_1  H x W:


अकोला : राजधानी दिल्लीतील निजामुद्दीन येथे 'तबलिगी' जमातीचे धार्मिक संमेलन अर्थात 'मरकज'मध्ये देशविदेशातून मोठ्या संख्येने मुस्लीम धर्मप्रचारक सामील झाले होते. कोरोना व्हायरच्या पार्श्वभूमीवर या संमेलनातील सहभागी मुस्लीम धर्मप्रचारकांमुळे आता कोरोनाचे विषाणू थेट अंदमान बेटांपर्यंतही जाऊन पोहोचले आहेत.


यामध्ये महाराष्ट्रातीलही पाचशेपेक्षा अधिक मुस्लीम सहभागी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. यामध्ये अकोला जिल्ह्यातील १० जणांनी या संमेलनात हजेरी लावल्याचे समजते. या सर्व कोरोना संशयितांचा जिल्हा प्रशासनाने शोध घेतला असून यापैकी केवळ चार जण अकोल्यात परतले असून त्यापैकी तीन जणांना विलगीकरण कक्षात पाठविण्यात आले आहे.


मुस्लिमांच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचा संशय आहे. त्यामुळे या दहापैकी जे जिल्ह्यात अजून परतले नाहीत, त्यांची माहिती घेतली जात आहे.


अकोला जिल्ह्यात आजवर तरी कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. मात्र, आता या उर्वरित सहा जणांमुळे प्रशासनाच्या काळजीत भर पडली आहे. त्यामुळे या उर्वरित ६ मुस्लीम धर्मप्रसारकांनी आपली जबाबदारी वेळीच ओळखून स्वत:ची माहिती प्रशासनाला द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. शिवाय त्यांच्या नातेवाईकांशीही संपर्क करण्यात आल्याचे समजते.


निजामुद्दीन येथील 'तबलिगी' जमातीच्या 'मरकज'ला हजेरी लावण्यासाठी अकोल्यातून १० जण ७ मार्च रोजी दिल्लीत पोहोचले होते आणि ११ मार्च रोजी ते दिल्लीहून जिल्ह्यात परतले होते.


अकोला तालुक्यातील या १० कोरोना संशयितांपैकी अकोला तालुक्यातील ४, बार्शीटाकळी ३ आणि पातूर येथील ३ रहिवाशी असल्याचे समजते. परंतु, यापैकी केवळ ४ जणांबरोबर संपर्क झाला असून उर्वरित ६ मुस्लीम नागरिक परत जिल्ह्यात परतले नसल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली आहे. त्याचबरोबर या ४ कोरोना संशयितांना विलगीकरण कक्षात दाखल केले असून त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचे समजते.


अग्रलेख
जरुर वाचा
उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाचे थैमान! 
 ८३ जणांचा मृत्यू, तर काही राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेनं अंगाची लाही लाही

उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाचे थैमान! ८३ जणांचा मृत्यू, तर काही राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेनं अंगाची लाही लाही

weather update देशात अवकाळी पावसाने नागरिकांना चांगलेच झोडपले आहे. त्यामुळे काही अंशी प्रमाणात नागरिकांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. महाराष्ट्रात काही दिवसांआधी ढगाळ वातावरण होते. तर काही बागात रिमझिम पावसाच्या सरी आल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर अशातच आता राज्यानंतर उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. वादळी वाऱ्यासोबत अवकाळी पावसाने धिंगाणा घातला आहे. यामुळे जिवीत हाणी झाल्याचे वृत्त आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये १० एप्रिल २०२५ रोजी वादळी वाऱ्यामुळे एक दोन नाहीतर ..

तहव्वूर राणाच्या एनआयए चौकशीला सुरुवात! एनआयए मुख्यालयाबाहेर सुरक्षेत वाढ; फक्त १२ अधिकाऱ्यांनाच चौकशी कक्षात प्रवेश

तहव्वूर राणाच्या एनआयए चौकशीला सुरुवात! एनआयए मुख्यालयाबाहेर सुरक्षेत वाढ; फक्त १२ अधिकाऱ्यांनाच चौकशी कक्षात प्रवेश

(Tahawwur Rana's NIA Interrogation Begins) २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार दहशतवादी तहव्वूर राणाचे अखेर गुरुवारी १० एप्रिल रोजी तब्बल १७ वर्षांनी भारतात यशस्वी प्रत्यार्पण झाले आहे. गुरुवारी १० एप्रिलला रात्री राणाला दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी एनआयएच्या विशेष न्यायालयाकडे एनआयएने २० दिवसांची कोठडी मागितली होती. परंतु, न्यायालयाने एनआयएला राणाची १८ दिवसांची कोठडी दिली. ताब्यात घेतल्यानंतर, तहव्वूर राणाची आता एनआयए मुख्यालयात चौकशीला सुरुवात झाली ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121