सहकार कार्यालयांना टाळे ठोकणार: जनसंग्रामचा इशारा

    16-Sep-2018
Total Views | 22
जळगाव, १५ सप्टेंबर
सहकार राज्यमंत्री व सहकार आयुक्त यांनी कालबद्ध कृती कार्यक्रम ठरवूनसुद्धा ठेवीदारांना ठेवी परत करण्यात सहकार विभाग पूर्णपणे अपयशी ठरला आहे. त्यामुळे महिनाभरात ठेवीदारांना वसुलीच्या प्रमाणात चेक नाही दिले तर प्रत्येक तालुका कार्यालयाला टाळे ठोकून ठेवीदार जेलभरो आंदोलन करतील, असा इशारा जनसंग्राम ठेवीदार संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... https://www.facebook.com/Tarunbharatjal/
  
सहकार विभागाचे नाशिक विभागीय सहनिबंधक मिलिंद भालेराव यांच्या विशेष उपस्थितीत जळगाव येथे नुकतेच डीडीआर कार्यालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विवेक ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
 
 
मालमत्ता विक्री व ठेवीदारांनी लिलावात भाग घेण्याचा शासनाच्या निर्णयाचासुद्धा ठोस असा उपयोग झालेला नाही. प्रत्यक्षात ठेवी परत करण्याचे थेट प्रयोजन काय? असा सवाल करत रावेर, यावल, भुसावळ व जळगाव तालुक्यांच्या सहाय्यक निबंधकांनी कर्ज वसुलीतून ठेवीदारांना चेक वाटप करण्याचा कार्यक्रम लावावा, अशी मागणी त्यांनी केली.
 
 
जिल्ह्यासाठी संस्थांच्या कर्ज वसुलीला गती मिळावी, म्हणून स्वतंत्र जिल्हा उपनिबंधक दर्जाचा अतिरिक्त अधिकारी व कार्यालय देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. संस्थाचालकांशी सहकार व ऑडीट विभागाच्या लोकांशी असलेले साटेलोटे यामुळे ईडीच्या कारवाईचे घोडे अडले असल्याचा आरोप करण्यात आला.
 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... https://www.facebook.com/Tarunbharatjal/

 
अग्रलेख
जरुर वाचा
वटवृक्षाविरोधात निघाला फतवा, धर्मांधांनी चालवली करवत; हिंदूंमध्ये संतापाची लाट!

वटवृक्षाविरोधात निघाला फतवा, धर्मांधांनी चालवली करवत; हिंदूंमध्ये संतापाची लाट!

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना सत्तेवरून पायउतार झाल्यापासून बांगलादेश एका उन्मादाकडे वाटचाल करत आहे हे स्पष्ट आहे. इस्लामिक कट्टरपंथी लोक प्रत्येक विभागात, सामाजिक जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात वर्चस्व गाजवू पाहतायत. सरकारी किंवा सामाजिक पातळीवर घेतलेल्या निर्णयांवर प्रभाव पाडणे हा त्यांचा शरिया अधिकार मानतात. हिंदूंची प्रतिके धर्मांधांना एकतर धोकादायक वाटतात किंवा त्यास हराम म्हणून संबोधतात. हिंदूंसाठी पवित्र असलेले वडाचे प्राचीन झाड 'शिर्क' म्हणून तोडल्याचे निदर्शनास आले आहे Islamists destroy ..

तैमूर नगर परिसरातील बेकायदा बांधकामांवर बुलडोझर; बांगलादेशींची १०० हून अधिक घरे जमीनदोस्त!

तैमूर नगर परिसरातील बेकायदा बांधकामांवर बुलडोझर; बांगलादेशींची १०० हून अधिक घरे जमीनदोस्त!

दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, डीडीए प्रशासनाने पोलिस आणि इतर विभागांसह सोमवार, दि. ५ मे रोजी तैमूर नगर नाल्याभोवतीच्या अतिक्रमणांविरुद्ध मोठी कारवाई केली. नाल्याच्या नऊ मीटर परिसरात असलेल्या अनेक बेकायदेशीर इमारती आणि त्यांच्या बांधकामांवर बुलडोझर फिरवण्यात आला. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशींनी नाल्याजवळील जमिनीवर अतिक्रमण केले होते. आतापर्यंत, बेकायदेशीरपणे बांधलेली १०० हून अधिक घरे आणि दुग्धशाळा पाडण्यात आल्या आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी दिल्ली पोलिस ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121