रहिवासी भागातील सुवर्णकार उद्योग औद्योगिक परिसरात स्थलांतरित करा

भुलेश्वर काळबादेवी परिसरातील रहिवासी-सुवर्णकार संघटनांची महानगरपालिका मुख्यालयात बैठक संपन्न

    27-Mar-2025
Total Views | 7
 
Bhushan Gagrani
 
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या अध्यक्षतेखाली भुलेश्वर काळबादेवी परिसरातील रहिवासी आणि सुवर्णकार संघटनांची संयुक्त बैठक गुरुवार, २७ मार्च रोजी महानगरपालिकेच्या मुख्यालयात पार पडली. यावेळी रहिवासी भागातील सुवर्णकार उद्योग औद्योगिक परिसरात स्थलांतरित करा, अशी मागणी करण्यात आली. महापालिकेच्या 'सी' विभाग अंतर्गत भुलेश्वर / काळबादेवी परिसरात सुवर्णकारांना त्यांच्या व्यवसायासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
 
या बैठकीला अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, विशेष कार्य अधिकारी चंद्रशेखर चोरे, उपायुक्त (परिमंडळ १) डॉ. संगीता हसनाळे, ‘सी’ विभागाचे सहायक आयुक्त विष्णू विधाते, सर्व संबंधित अधिकारी यांच्यासह सुवर्णकार संघटनांचे आणि रहिवासी संघटनांचे विविध प्रतिनिधी उपस्थित होते.
 
हे वाचलंत का? -  सुषमा अंधारे आणि कुणाल कामराविरोधात विधान परिषदेत हक्कभंग प्रस्ताव
 
यावेळी आयुक्त भूषण गगराणी यांनी रहिवासी संघटना तसेच सुवर्णकार संघटनांचे म्हणणे ऐकून घेतले. तसेच याप्रकरणी महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाच्या निर्देशान्वये दोन्ही बाजू ऐकून घेण्यासाठी ही समन्वय बैठक घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीत भुलेश्वर रेसिडेन्ट असोसिएशनच्या प्रतिनिधींनी रहिवासी जागेत आरोग्य आणि सुरक्षेच्या अनुषंगाने मुद्दे मांडत रहिवासी भागात चालणारे सुवर्णकार उद्योग हे औद्योगिक परिसरात स्थलांतरित करण्याची मागणी केली. तर सुवर्णकार संघटनांच्या प्रतिनिधींनी व्यवसाय चालविताना सुरक्षा आणि पर्यावरणीयदृष्ट्या करण्यात आलेल्या उपाययोजनांबाबतची माहिती दिली. दरम्यान, दोन्ही बाजुंचे सविस्तर म्हणणे ऐकून घेत याबाबतचा सविस्तर अहवाल महाराष्ट्र शासनाकडे सादर करण्यात येणार असल्याचे उपआयुक्त डॉ. संगीता हसनाळे यांनी स्पष्ट केले.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
जेएनयूत निनादला परिवर्तनाचा शंखनाद; विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत अभाविपने रचला इतिहास

जेएनयूत निनादला परिवर्तनाचा शंखनाद; विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत अभाविपने रचला इतिहास

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत केंद्रीय पॅनेलच्या सहसचिव पदावर प्रचंड विजय मिळवला. अभाविपचे उमेदवार वैभव मीणा यांनी सहसचिव पदावर विजय मिळवत डाव्या संघटनांना एकप्रकारे आव्हान दिले आहे. त्याचबरोबर १६ शाळा आणि विविध संयुक्त केंद्रांमध्ये एकूण ४२ पैकी २४ समुपदेशक पदांवर विजय मिळवून अभाविपने 'लाल किल्ल्यावर' भगवा फडकवला आणि अनेक वर्षांपासून प्रचलित असलेल्या तथाकथित डाव्या विचारसरणीचा पाडाव केल्याचे दिसून आले. ABVP in JNU Election Result..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121