धर्मांध फहीमच्या घरावर फिरवला बुलडोझर!

२४ तासांच्या अल्टीमेटमनंतर पालिकेची धडक कारवाई

    24-Mar-2025   
Total Views | 37

Buldozer Action on Fahim Khan House

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Buldozer Action on Fahim Khan House) 
औरंगजेबाच्या थडग्यावरून सुरू असलेल्या वादानंतर नागपुरात शिवजयंतीच्या दिवशी इस्लामिक कट्टरपंथींनी हैदोस घातला. या हिंसाचाराचा कथित सूत्रधार फहीम खान याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर सदर प्रकरणातील कारवाईला आणखी वेग आला आहे. फहीम खान याच्या घरावर नागपूर महापालिकेने सोमवारी (दि. २४ मार्च) बुलडोझर फिरवल्याचे निदर्शनास आले आहे. अवैध बांधकाम हटवण्यासाठी महापालिकेने २४ तासांचा अवधी दिला होता, त्यानंतर सदर कारवाई झाल्याचे समोर येत आहे.

महापालिकेच्या मते ८६.४८ चौरस मीटरवर बांधलेले हे घर बेकायदेशीर आहे, ज्याचा नकाशा मंजूर झालेला नाही. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी घराची पाहणी केली असता सदर बांधकाम महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ चे उल्लंघन करत असल्याचे आढळून आले. त्यामुळे नागपुरातील संजय बाग कॉलनीत असलेल्या फहीम खान यांच्या पत्नी जहिरुन्निसा यांच्या नावावर असलेल्या दुमजली घरावर महापालिकेची बुलडोझर कारवाई करण्यात आली आहे.



कायद्याने परवानगी दिल्यास प्रशासन बुलडोझर चालवण्यास मागे हटणार नाही, अशी भूमिका राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली होती. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या बुलडोझर मॉडेलबाबत विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी हे विधान केले आहे. नागपुरातील हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत ११२ जणांना अटक करण्यात आली असून सदर हिंसाचारात पोलिस उपायुक्त दर्जाचे तीन अधिकारी आणि ३३ पोलिस जखमी झाल्याची माहिती आहे.

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
अग्रलेख
जरुर वाचा
पाहलगाम हल्ल्यानंतर अमिताभ बच्चन यांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले,जग मागतंय सिंदूर... चितेच्या राखेतून!

पाहलगाम हल्ल्यानंतर अमिताभ बच्चन यांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले,"जग मागतंय सिंदूर... चितेच्या राखेतून!''

भारत आणि पाकिस्तानमधील सीमेवरील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शस्त्रसंधी असूनही पाकिस्तानकडून कुरापती थांबलेल्या नाहीत. शनिवारी रात्री पुन्हा एकदा पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं. अशा परिस्थितीत देशाच्या जवानांची शौर्यगाथा सर्वत्र गौरवली जात आहे. अनेक बॉलिवूड कलाकार सोशल मीडियावरून आपल्या भावना व्यक्त करत आहेत. मात्र, या सगळ्या पार्श्वभूमीवर 'सदीच्या महानायक' अमिताभ बच्चन यांचं मौन कायम होतं. पाहलगाम येथील दहशतवादी हल्ला आणि 'ऑपरेशन सिंदूर'नंतरही त्यांनी सोशल मीडियावर काहीही प्रतिक्रिया दिली ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121