राम मंदिराच्या पायाभरणीची पहिली वीट रचणारे कामेश्वर चौपाल यांचे निधन

    07-Feb-2025
Total Views | 34

Kameshwar Chaupal

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Kameshwar Chaupal Passes Away)
अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या पायाभरणीची पहिली वीट रचणारे कामेश्वर चौपाल यांचे शुक्रवार, दि. ०७ फेब्रुवारी रोजी दिल्ली येथे निधन झाले. वयाच्या ६८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कामेश्वर चौपाल श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासचे सदस्य बिहारचे माजी विधान परिषद सदस्यही होते. दीर्घकाळापासून ते किडनीच्या आजाराने त्रस्त होते. गुरुवारी मध्यरात्री रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, तसेच विश्व हिंदू परिषदेने त्यांना पहिल्या कारसेवकाचा दर्जा दिला होता.

हे वाचलंत का? : यशस्वी हिंदू समाज घडवण्यासाठी आपली ताकद ओळखा

श्रीराम मंदिर आंदोलनादरम्यान, कामेश्वर चौपाल हे श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे आजीवन सदस्य होते. त्यांनी दि. ९ नोव्हेंबर १९८९ रोजी अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या पायाभरणीत पहिली वीट रचली होती. कामेश्वर चौपाल हे बिहारमधील सुपौल जिल्ह्यातील रहिवासी असून ते एका दलित समाजातून आले होते. त्यांचे शिक्षण मधुबनी जिल्ह्यात झाले. येथेच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संपर्कात आला. त्यांचे एक शिक्षक संघाचे कार्यकर्ता होते. संघाशी संबंधित याच शिक्षकाच्या मदतीने कामेश्वर चौपाल यांना त्याकाळी कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते संघाला पूर्णपणे समर्पित झाले. यानंतर त्यांना मधुबनी जिल्ह्याचे जिल्हा प्रचारक बनवण्यात आले होते.

अग्रलेख
जरुर वाचा
जन्म–मृत्यू बाबतच्या बोगस प्रमाणपत्रांना चाप! अधिनियमात सुधारणा; तात्काळ अंमलबजावणीचे महसूल मंत्र्यांचे निर्देश

जन्म–मृत्यू बाबतच्या बोगस प्रमाणपत्रांना चाप! अधिनियमात सुधारणा; तात्काळ अंमलबजावणीचे महसूल मंत्र्यांचे निर्देश

सरकारी व्यवस्थेतील उणीवांचा लाभ घेत जन्म-मृत्यू नोंदणीची प्रमाणपत्रे मिळविणाऱ्या परदेशी नागरिकांच्या हैदोसावर आता अंकुश बसणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवार, दि. १२ मार्च रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात निवेदन करून, विलंबाने करावयाच्या जन्म-मृत्यू नोंदीबाबतच्या कार्यपध्दतीनिश्चित केल्याचे सांगितले. तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार आजपासूनच महाराष्ट्रात नवीन बदल लागू होतील, अशी घोषणा केली...

लाठी मारी ते विधवांची होळी! महाराष्ट्राबाहेर होळी नेमकी कशी साजरी केली जाते ?

लाठी मारी ते विधवांची होळी! महाराष्ट्राबाहेर होळी नेमकी कशी साजरी केली जाते ?

होळी म्हणजे रंगांचा उत्सव. एका पौराणिक कथेनुसार हिरण्यकश्यपूची बहीण होलिका हिला अग्नी जाळू शकणार नाही असा वर मिळाला होता. हिरण्यकशपूने होलिकेला सांगितले की प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीवर बसावेस म्हणजे प्रल्हाद जळून मरेल आणि होलिका मात्र जिवंत राहील. हिरण्यकशपूचा सल्ला तिने ऐकला. परंतू प्रल्हादाने नारायणाचे नामस्मरण केल्याने होलिका जळून गेली आणि प्रल्हाद जिवंत राहिला या आनंदाप्रीत्यर्थ दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी प्रदोषकाली होलिकादहन केलं जाते. तसेच यावेळी दुष्ट प्रवृत्तीचा नाश व्हावा अशी प्रार्थना ..

स्वपक्षातील नेत्याच्या मुलाने तयार केलेलं चिन्ह हटवलं, हिंदीविरोधाच्य़ा नादात मुख्यमंत्री स्टॅलिन यांना पडला विसर! भाजप अध्यक्षांनी करुन दिली आठवण, म्हणाले...

स्वपक्षातील नेत्याच्या मुलाने तयार केलेलं चिन्ह हटवलं, हिंदीविरोधाच्य़ा नादात मुख्यमंत्री स्टॅलिन यांना पडला विसर! भाजप अध्यक्षांनी करुन दिली आठवण, म्हणाले...

(Tamil Nadu drops official Rupee Symbol from State Budget) तामिळनाडूमधील एमके स्टॅलिन यांचे सरकार आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून भाषेच्या मुद्द्यावर तणावाचे वातावरण आहे. यात आता तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन (M K Stalin) यांच्या निर्णयामुळे हा वाद पुन्हा पेटण्याची चिन्हे आहेत. तामिळनाडू सरकारने राज्याच्या २०२५-२६ च्या अर्थसंकल्पामध्ये रुपयाच्या चिन्हाऐवजी (₹) तमिळ भाषेतील रुबई मधील पहिले अक्षर ‘रु’ वापरण्याचा निर्णय घेतला आहे...