महाकुंभ हा युगपरिवर्तनाचा संकेत नरेंद्र मोदी

    28-Feb-2025
Total Views | 16
 
Mahakumbh is a sign of change of era: Narendra Modi
 
नवी दिल्ली: ( Narendra Modi ) महाकुंभ हा युगपरिवर्तनाचा संकेत असून त्याने भारताच्या विकास प्रवासात एका नवीन अध्यायाचा संदेश दिला आहे असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या एकता का महाकुंभ युग परिवर्तन की आहट या विशेष ब्लॉगमध्ये केले आहे.
  
पंतप्रधान मोदी यांनी प्रयागराजमध्ये झालेल्या महाकुंभमेळ्याबद्दल एक ब्लॉग लिहिला आहे. पंतप्रधानांनी या भव्य कार्यक्रमाचे वर्णन ‘युगपरिवर्तनाची चाहूल’ असे केले. ते म्हणाले की, “या कार्यक्रमाने भारताच्या विकास प्रवासात एका नवीन अध्यायाचा संदेश दिला आहे आणि हा संदेश विकसित भारताचा आहे.” या कार्यक्रमाचे वर्णन ‘एकतेचा महाकुंभ’ असे करत त्यांनी सांगितले की, “या महाकुंभात समाजाच्या प्रत्येक वर्गातील आणि प्रत्येक क्षेत्रातील लोक एकत्र आले.” “ज्याप्रमाणे एकतेच्या महाकुंभात, प्रत्येक भक्त, मग तो गरीब असो वा श्रीमंत, बालक असो वा वृद्ध, स्वदेशी असो वा परदेशी, ग्रामीण भागातील असो वा शहरवासीय, पूर्व असो वा पश्चिम, उत्तरेकडून असो वा दक्षिणेकडून, कोणत्याही जातीचा असो, कोणत्याही विचारसरणीचा असो, सर्वजण एकाच महायज्ञासाठी एकतेच्या महाकुंभात एकत्र आले. ‘एक भारत, महान भारता’चे हे अविस्मरणीय दृश्य कोट्यवधी देशवासीयांमध्ये दिसत होते. आत्मविश्वासाचा एक भव्य उत्सव बनला. आता अशाप्रकारे आपल्याला विकसित भारताच्या महान कार्यासाठी एकत्र यावे लागेल,” असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केले.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाचे थैमान! 
 ८३ जणांचा मृत्यू, तर काही राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेनं अंगाची लाही लाही

उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाचे थैमान! ८३ जणांचा मृत्यू, तर काही राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेनं अंगाची लाही लाही

weather update देशात अवकाळी पावसाने नागरिकांना चांगलेच झोडपले आहे. त्यामुळे काही अंशी प्रमाणात नागरिकांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. महाराष्ट्रात काही दिवसांआधी ढगाळ वातावरण होते. तर काही बागात रिमझिम पावसाच्या सरी आल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर अशातच आता राज्यानंतर उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. वादळी वाऱ्यासोबत अवकाळी पावसाने धिंगाणा घातला आहे. यामुळे जिवीत हाणी झाल्याचे वृत्त आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये १० एप्रिल २०२५ रोजी वादळी वाऱ्यामुळे एक दोन नाहीतर ..

तहव्वूर राणाच्या एनआयए चौकशीला सुरुवात! एनआयए मुख्यालयाबाहेर सुरक्षेत वाढ; फक्त १२ अधिकाऱ्यांनाच चौकशी कक्षात प्रवेश

तहव्वूर राणाच्या एनआयए चौकशीला सुरुवात! एनआयए मुख्यालयाबाहेर सुरक्षेत वाढ; फक्त १२ अधिकाऱ्यांनाच चौकशी कक्षात प्रवेश

(Tahawwur Rana's NIA Interrogation Begins) २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार दहशतवादी तहव्वूर राणाचे अखेर गुरुवारी १० एप्रिल रोजी तब्बल १७ वर्षांनी भारतात यशस्वी प्रत्यार्पण झाले आहे. गुरुवारी १० एप्रिलला रात्री राणाला दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी एनआयएच्या विशेष न्यायालयाकडे एनआयएने २० दिवसांची कोठडी मागितली होती. परंतु, न्यायालयाने एनआयएला राणाची १८ दिवसांची कोठडी दिली. ताब्यात घेतल्यानंतर, तहव्वूर राणाची आता एनआयए मुख्यालयात चौकशीला सुरुवात झाली ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121