भारत सरकार नवी पेन्शन योजना आणणार

सर्वच प्रकारच्या नोकरदारांना संरक्षण मिळणार

    27-Feb-2025
Total Views | 38
जाले
 
 
नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून नवीन सार्वत्रिक पेन्शन योजना आणण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे. यामध्ये सर्व नोकरदार तसेच स्वयंरोजगारित व्यक्तींनाही यामध्ये सहभागी होता येणार आहे. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या अहवालानुसार केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालय या संदर्भात काम करत आहे. यातून सध्या कार्यरत असलेला नोकरदार वर्गच नव्हे तर असंघटित क्षेत्रातील कामगारांनाही याचा फायदा होण्याची शक्यता आहे.
 
 
भारतात या घडीला संघटित क्षेत्रातील कामगारांपेक्षाही, असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यात बांधकाम क्षेत्रात काम करणारे मजूर, घरकाम करणारे मजूर, सामानाची ने – आण करणारे म्हणजेच गिग क्षेत्रात काम करणारे मजूर यांना सरकारकडून मिळणाऱ्या कुठल्याही आर्थिक संरक्षणाचा लाभ घेता येत नाही. तसेच जे स्वयंरोजगारित आहेत अशा व्यक्तींनाही अशा कुठल्याही योजनांचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे या सर्व क्षेत्रातील श्रमबळास सरकारी लाभाच्या कार्यकक्षेत आणण्यासाठीचे केंद्र सरकारचे हे प्रयत्न आहेत.
 
या नव्या सार्वत्रिक पेन्शन योजना आणण्याचे मूळ हे देशातील देशातील सध्याच्या पेन्शन योजनेची व्याप्ती वाढवून त्यात सध्या सुरु असलेल्या पेन्शन योजनांचाही अंतर्भाव करण्याचा प्रयत्न यात आहे. याबाबत सध्या या योजनेचे एकूण स्वरुप काय असेल याबद्दल चर्चा सुरु असून त्यातून भागधारकांशी चर्चा करुन मगच या योजनेला अंतिम स्वरुप दिले जाईल. अशी प्रतिक्रिया मंत्रालयाकडून या अहवालात मांडली आहे.
 
या योजनेत सध्या सुरु असलेल्या प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना तसेच राष्ट्रीय स्वयंरोजगारित आणि व्यापारी पेन्शन योजना या दोघांचा अंतर्भाव केला जाणार आहे. या सध्याच्या योजनांमध्ये अनुक्रमे मासिक ५५ रुपये ते २०० रुपये हप्त्यांमध्ये रुपये ३००० पर्यंत पेन्शन दिले जाते. या दोन्ही योजनांचा या नव्या योजनेत अंतर्भाव केला जाणार आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
सामर्थ्य-परमार्थाचा मेळ म्हणजे मधु मंगेश कर्णिक!

सामर्थ्य-परमार्थाचा मेळ म्हणजे मधु मंगेश कर्णिक!

"कोकणी माणसाचे भावविश्‍व मराठी साहित्यामध्ये योग्य शब्दात चितरणारे मधु मंगेश कर्णिक म्हणजे सामर्थ्य आणि परमार्थाचा अनोखा संगम आहे" असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केले. ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांच्या ९५व्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्याच्या भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत, सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, कोकण मराठी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रदीप ढवळ, अध्यक्ष ..

पाकिस्तानी नागरिकांना परत पाठविण्याची कार्यवाही युद्धस्तरावर: मुख्यमंत्री

पाकिस्तानी नागरिकांना परत पाठविण्याची कार्यवाही युद्धस्तरावर: मुख्यमंत्री

महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांची यादी प्राप्त केली असून, त्यांना परत पाठविण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरु आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली. दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मिरातील पर्यटकांना परत महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकारने केलेले तिसरे विशेष विमान 232 प्रवाशांना घेऊन आज मुंबईत दाखल झाले. मंत्री आशिष शेलार यावेळी उपस्थित होते. यातील अकोला, अमरावती येथील प्रवाशांच्या पुढच्या प्रवासासाठी बसेसची व्यवस्था सुद्धा करण्यात आली. आतापर्यंत सुमारे ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121