मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याला वेग

गुजरातमधील कामांनी पकड वेग;गुजरातमधील कामांनी पकड वेग

    25-Feb-2025
Total Views | 26

nhsrcl


अहमदाबाद, दि.२४ : विशेष प्रतिनिधी 
मुंबई-अहमदाबाद शहरांतील दळणवळणाचा वेग वाढवण्यासाठी नॅशनल हाय स्पीड रेल काॅर्पोरेशन लिमिटेडकडून (एनएचएसआरसीएल) देशातील पहिल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम वेगात सुरु आहे. या मार्गातील पुलाचे काम झपाट्याने सुरू असून नुकताच गुजरात मध्ये पाचव्या प्रीस्ट्रेस्ड काँक्रीट (पीएससी) पुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे.

एनएचएसआरसीएलने दिलेल्या माहितीनुसार, गुजरात राज्यातील सूरत जिल्ह्यात कोसांबाजवळ राष्ट्रीय द्रुतगती मार्ग-४ वरील २६० मीटर लांबीचा पीएससी पूल शनिवार, दि.२२ फेब्रुवारी २०२५ रोजी बांधून पूर्ण झाला. या पुलामध्ये १०४ प्रीकास्ट विभाग आहेत. यात ५० मी + ८० मी + ८० मी + ५० मीटर अशा चार स्पॅनची संरचना आहे. हा पूल बॅलन्स्ड कँटिलीव्हर पद्धतीने बांधण्यात आला आहे, जे मोठ्या स्पॅनसाठी उत्कृष्ट तंत्रज्ञान आहे.


नवीन पूर्ण झालेला पूल सूरत आणि भरुच बुलेट ट्रेन स्थानकांच्या दरम्यान स्थित आहे. राष्ट्रीय द्रुतगती मार्ग-४ हा दिल्ली ते मुंबई दरम्यान बांधला जाणारा द्रुतगती मार्ग आहे. या महामार्गावरून जाणाऱ्या बुलेट ट्रेनच्या या पुलाच्या बांधकामाचे नियोजन अत्यंत काळजीपूर्वक करण्यात आले होते, ज्यामुळे वाहनचालक आणि कामगार दोघांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यात आली. तसेच, वाहतूक अखंडित सुरू राहील आणि जनतेला कमीत कमी गैरसोय होईल याचीही विशेष काळजी घेण्यात आली.


गुजरातमध्ये पूर्ण झालेल्या पीएससी पुलांचे तपशील



nhsrcl
अग्रलेख
जरुर वाचा
नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल, छत्तीसगढमध्ये २६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल, छत्तीसगढमध्ये २६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

Naxal free India छत्तीसगढ पोलिसांच्या ‘लोन वर्राटू’ अर्थात ‘घरी परत या’ या मोहिमेंतर्गत सोमवारी तब्बल २६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. त्यामुळे नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी पाऊल पडले आहे. छत्तीसगढ राज्यातील दंतेवाडा जिल्ह्यात सुरू असलेल्या नक्षल निर्मूलन मोहिम 'लोन वर्राटू' (आणि राज्य सरकारच्या पुनर्वसन धोरणामुळे एकूण २६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. यामध्ये ३ इनामी नक्षलवाद्यांचा समावेश आहे. हे आत्मसमर्पण ७ एप्रिल रोजी दंतेवाडा येथील डीआरजी कार्यालयात झाले. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांम..

ईशनिंदचा आरोप लावत जमावाने बांगलादेशी हिंदू युवकाला केली जबर मारहाण

ईशनिंदचा आरोप लावत जमावाने बांगलादेशी हिंदू युवकाला केली जबर मारहाण

Bangladeshi Hindu बांगलादेशातील टांगाइल जिल्ह्यात रविवार ६ एप्रिल २०२५ रोजी एका ४० वर्षीय हिंदू अखिल चंद्र मंडलवर काही कट्टरपंथींनी इशनिंदाचा आरोप करत जमावाने हल्ला केला आहे. कट्टरपंथीयांनी अखिल चंद्र मंडलवर इस्लमा धर्माविषयी आणि पैगंबर मोहम्मदांबाबत आरोप लावणयात आला आहे. ही माहिती प्रसारमाध्यमाद्वारे समोर आली आहे. त्यामुळे आता इतर वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,बांगलादेशात हिंदू अद्यापही सुरक्षित नसल्याचे वास्तव नाकारता येत नाही. यावेळी हल्ला सुरू असताना बचाव पथकाने मध्यस्थी केली, मात्र बचाव पथकाने ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121