कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर! सत्र न्यायालयात अपील करण्यासाठी ३० दिवसांची मुदत

    20-Feb-2025
Total Views | 48
 
Manikrao Kokate Bail
 
नाशिक : कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूकीच्या प्रकरणी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा आणि ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. मात्र, आता नाशिक जिल्हा न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
 
माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी १९९५ मध्ये सदनिकांच्या घोटाळ्यासंबंधी माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात दावा दाखल केला होता. यानुसार, नाशिक जिल्हा न्यायालयाने कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूकीच्या प्रकरणावर माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे दोन वर्षांचा कारावास आणि ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
 
दरम्यान, माणिकराव कोकाटे यांनी तात्काळ जामीनासाठी अर्ज दाखल केला. न्यायालयाने त्यांना १५ हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला. तसेच सत्र न्यायालयात अपील करण्यासाठी त्यांना ३० दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
माणिकराव कोकाटे काय म्हणाले?
 
"गेल्या ३० वर्षांपूर्वी हा खटला दाखल झाला असून ही राजकीय केस होती. त्यावेळी तुकाराम दिघोळे हे राज्यमंत्री होते. माझे आणि त्यांचे राजकीय वैर होते. या वैरत्वापोटी सरकारला सांगून त्यांनी ही केस केली होती. आज पहिल्यांदा या केसचा निकाल लागलाय. ४० पानांचे निकालपत्र आहे. मी अजून हे निकालपत्र वाचलेले नाही. या प्रकरणात मी कायद्यानुसार जे करता येईल ते सगळे करणार असून मी हायकोर्टात न्याय मागणार आहे," असे माणिकराव कोकाटे यांनी सांगितले.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
तुला घाबरण्याची गरज नाही..., शमीच्या लेकीने धुलीवंदन सण साजरा केल्याप्रकरणी मध्य प्रदेश मंत्र्याने पत्राद्वारे शमीला दिला धीर

"तुला घाबरण्याची गरज नाही...", शमीच्या लेकीने धुलीवंदन सण साजरा केल्याप्रकरणी मध्य प्रदेश मंत्र्याने पत्राद्वारे शमीला दिला धीर

Mohmmed Shami टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने उपवास सुरू असताना पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यादरम्यान ज्यूस प्यायल्याने त्याला एका मौलवीने इस्लामचा धर्म भ्रष्ट केल्याप्रकरणी टीका केली. उपवास सुरू असतानाही तो ज्यूस पित होता. त्याने उपवास पाळल्यावरून काही धर्मांधांनी त्याला धारेवर धरले. त्यानंतर आता त्याच शमीच्या लेकीने धुलीवंदन सणाचा आनंद घेतल्याने टीका करण्यात आली. यामुळे आता मध्य प्रदेशचे मंत्री विश्वास सारंग यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. कट्टरपंथींनी अनेक सीमा ओलांडल्या असल्याचे..