कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर! सत्र न्यायालयात अपील करण्यासाठी ३० दिवसांची मुदत

    20-Feb-2025
Total Views | 46
 
Manikrao Kokate Bail
 
नाशिक : कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूकीच्या प्रकरणी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा आणि ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. मात्र, आता नाशिक जिल्हा न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
 
माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी १९९५ मध्ये सदनिकांच्या घोटाळ्यासंबंधी माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात दावा दाखल केला होता. यानुसार, नाशिक जिल्हा न्यायालयाने कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूकीच्या प्रकरणावर माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे दोन वर्षांचा कारावास आणि ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
 
दरम्यान, माणिकराव कोकाटे यांनी तात्काळ जामीनासाठी अर्ज दाखल केला. न्यायालयाने त्यांना १५ हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला. तसेच सत्र न्यायालयात अपील करण्यासाठी त्यांना ३० दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
माणिकराव कोकाटे काय म्हणाले?
 
"गेल्या ३० वर्षांपूर्वी हा खटला दाखल झाला असून ही राजकीय केस होती. त्यावेळी तुकाराम दिघोळे हे राज्यमंत्री होते. माझे आणि त्यांचे राजकीय वैर होते. या वैरत्वापोटी सरकारला सांगून त्यांनी ही केस केली होती. आज पहिल्यांदा या केसचा निकाल लागलाय. ४० पानांचे निकालपत्र आहे. मी अजून हे निकालपत्र वाचलेले नाही. या प्रकरणात मी कायद्यानुसार जे करता येईल ते सगळे करणार असून मी हायकोर्टात न्याय मागणार आहे," असे माणिकराव कोकाटे यांनी सांगितले.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
सर्वसमावेशक विकासासाठी पतपेढी चळवळ आवश्यकच : विद्याधर अनास्कर

सर्वसमावेशक विकासासाठी पतपेढी चळवळ आवश्यकच : विद्याधर अनास्कर

2025 हे वर्ष संयुक्त राष्ट्राने ‘आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष’ म्हणून जाहीर केले आहे. याच सहकार क्षेत्राचे जाळे महाराष्ट्रात खूप खोलवर रुजले आहे. त्यातील महत्त्वाचा भाग म्हणजे सहकारी वित्तीय संस्था आणि या वित्तीय संस्थांमधील महत्त्वाचा भाग म्हणजे, सहकारी पतसंस्था म्हणजेच सहकारी पतपेढी. सर्वसामान्य माणसांच्या जवळच्या आणि त्यांच्या अर्थकारणातही या पतसंस्थांना आजही जिव्हाळ्याचे स्थान आहे. पण, आज याच पतसंस्थांची चळवळ ही काही गैरप्रकारांमुळे संशयाच्या भोवर्‍यात सापडली आहे. त्यानिमित्ताने पतसंस्थांच्या अर्थकारणाचा, ..