सुषमा स्वराज अभ्यासू, व्यासंगी आणि प्रभावी नेत्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : मेधा सोमय्या लिखित "अग्निशिखा : सुषमा स्वराज" ऑडिओ बुकचे प्रकाशन

    13-Feb-2025
Total Views | 73
 
Fadanvis
 
मुंबई : सुषमा स्वराज या अभ्यासू, व्यासंगी आणि प्रभावी नेत्या होत्या, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवार, १३ फेब्रुवारी रोजी केले.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मेधा किरीट सोमय्या लिखित ‘अग्निशिखा : सुषमा स्वराज’ या ई-बुक आणि ऑडिओ बुकचे प्रकाशन पार पडले. याप्रसंगी माजी खासदार किरीट सोमय्या, मराठी अभिवाचक तनुजा राहणे, ईबुक पुस्तक रचनाकार स्वाती जोशी, हिंदी अभिवाचक दिव्या शारदा, झंकारचे संचालक सत्यजित पंगू आणि आनंद लिमये उपस्थित होते.
 
हे वाचलंत का? -  शिंदेंच्या बड्या नेत्याच्या घरी स्नेहभोजनाला ठाकरेंच्या ३ खासदारांची हजेरी!
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "सुषमा स्वराज या अभ्यासू, व्यासंगी आणि चतुरस्त्र व्यक्तिमत्व होत्या. लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्या आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणून त्यांनी खूप मोठे काम केले. परराष्ट्र व्यवहार मंत्री असताना पासपोर्ट आणि व्हिसाबाबत अनेक पद्धती त्यांनी लागू केल्या. तसेच त्यांनी केलेल्या 'रिफॉर्म'मुळे आज पासपोर्ट मिळणे सोपे झाले. लोकसभेत विरोधी पक्ष नेत्या असताना त्यांनी तत्कालीन सरकारच्या कारभारावर केलेले अभ्यासपूर्ण विवेचन खूप गाजले. सुषमा स्वराज यांचा व्यासंग, विषयाची हाताळणी आणि प्रचंड बुद्धिमत्तेसोबत असलेली स्मरणशक्ती ही त्यांची ओळख पुरेशी आहे," असे ते म्हणाले.
 
ऑडिओ बुकमधून सुषमा स्वराज यांचा जीवनप्रवास पुढच्या पिढीपर्यंत जाईल
 
"सुषमा स्वराज या भारतीय राजकारणाला पडलेले स्वप्न आहेत. 'अग्निशिखा : सुषमा स्वराज' या ई आणि ऑडिओ बुकच्या माध्यमातून त्यांचे कार्य आणि जीवन प्रवास पुढच्या पिढीपर्यंत जाईल. सुषमा स्वराज यांचा विविध भाषांचा अभ्यास होता. त्या कधीही बोलताना समोर कागद ठेवत नव्हत्या. त्यांची अभ्यासपूर्ण भाषणे आजही मार्गदर्शक ठरत आहे," असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
दीर्घकालीन व्हिसा असलेल्या पाकिस्तानी हिंदूंना भारत सोडावा लागणार नाही!; परराष्ट्र मंत्रालयाची स्पष्टोक्ती

"दीर्घकालीन व्हिसा असलेल्या पाकिस्तानी हिंदूंना भारत सोडावा लागणार नाही!"; परराष्ट्र मंत्रालयाची स्पष्टोक्ती

(Pakistani Hindus With LTV Not Affected By Visa Ban) पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २८ निष्पाप पर्यटकांना जीव गमवावा लागला. भारत सरकारने या हल्ल्याला जबाबदार धरत पाकिस्तान कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीच्या बैठकीनंतर केंद्र सरकारने पाकिस्तानी नागरिकांसाठी सर्व व्हिसा सेवा तात्काळ प्रभावाने स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. पण या निर्णयाचा दीर्घकालीन व्हिसा असलेल्या पाकिस्तानी हिंदूंवर कोणताही परिणाम होणार नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाने ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121