तिरूपती बालाजी मंदिरात चेंगराचेंगरी! ६ भाविकांचा मृत्यू, ३० गंभीर जखमी

    09-Jan-2025
Total Views | 93

stampede

अमरावती (Tirupati Stampede): आंध्रप्रदेशच्या तिरुपती देवस्थानाला हजारोंच्या संख्येने भाविक दररोज दर्शनासाठी येत असतात. अशातच बुधवार दिनांक ८ जानेवारी रोजी संध्याकाळी तिरूपती बालाजी मंदिरात, चेंगराचेंगरीची दुर्देवी घटना घडली. यामध्ये आतापर्यंत ६ भाविकांचा मृत्यू झाला असून, किमान ३० जणं जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. टोकन वाटप करीत असताना हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे.

बुधवार ८ जानेवारी रोजी संध्याकाळी ८ वाजताच्या सुमारास तिरुपती देवस्थानच्या अधिकाऱ्यांनी दर्शनासाठीचे टोकनचे वाटायला सुरूवात केली. विष्णु निवास, पद्मावती पार्क या ठिकाणी टोकन वाटप सुरू झाले. विष्णू निवास मंदिराजवळच्या काऊंटरवर टोकन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. संध्याकाळपर्यंत ही गर्दी मोठ्या प्रमाणावर वाढली. काही भाविकांमध्ये टोकन घेण्यासाठी धक्काबुक्की झाल्याचे दिसून आले. तिरुपती देवस्थानमचे प्रमुख बी. आर. नायडू याबद्दल माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की " काऊंटरवर टोकन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. आतली गर्दी नियंत्रित करण्यासाठी गेट काही काळ बंद ठेवण्यात आलं होतं. पण आत एका महिलेला अचानक अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे सदर महिलेला बाहेर जाण्यासाठी रस्ता करून देण्यासाठी गेट उघडण्यात आलं. पण नेमक्या त्याचवेळी गेटबाहेर उभे असलेले सर्व भाविक एकाचवेळी आत शिरण्याचा प्रयत्न करू लागले. यातून तिथे गडबड झाली आणि चेंगराचेंगरीचा प्रकार घडला" जखमी झालेल्या भाविकांना नजीकच्या रूईया हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. यामध्ये दुर्देवाने तीघांचा मृत्यू झाला. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू हे पीडीत भाविकांची व त्यांच्या नातेवाईकांची भेट घेणार असून, त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना आर्थीक मदत जाहीर केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा या घटनेववर शोक व्यक्त केले असून आपल्या X हँडलवरून त्यांनी परिस्थीतीचा आढावा घेत म्हणाले की " तिरूपतीमध्ये झालेल्या या घटनेमुळे मला दु:ख झाले आहे. या दुर्घटनेत ज्यांनी आपल्या जवळच्या माणसांना गमावले आहे, आम्ही त्यांच्या पाठिशी उभे आहोत. आंध्रप्रदेशचे सरकार शक्य त्या मार्गाने भाविकांना मदत करीत आहे"

 
अग्रलेख
जरुर वाचा
मुंबई मेट्रो-३

मुंबई मेट्रो-३ 'बीकेसी ते आचार्य अत्रे' मार्गाचे लोकार्पण

कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे' मेट्रो ३ मार्गिकेतील बीकेसी ते आचार्य अत्रे चौक, वरळी अशा टप्पा २ अच्या संचलनाची प्रतीक्षा अखेर आता संपली आहे. या मार्गिकेसाठी मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस)कडून टप्पा २ अ ला सुरक्षा प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यामुळे या टप्प्याच्या संचलनाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार, आज दि.९ रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई मेट्रो ३च्या या टप्प्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे. यावेळी मुख्यमंत्री बीकेसी ते सिद्धिविनायक मंदिर स्थानकापर्यंत मेट्रोने ..

मसूद अजहरचा भाऊ जैशचा दहशतवादी अब्दुल रौफ अझहर ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये ठार!

मसूद अजहरचा भाऊ जैशचा दहशतवादी अब्दुल रौफ अझहर ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये ठार!

पहलगाम हल्ल्या नंतर भारताने पाकिस्तानी दहशतवाद्यांना जबरदस्त उत्तर ‘ऑपरेशन सिंदूर’ पूर्ण केले. दि. ७ मे रोजी रात्री १ वाजून ४ मिनिटांनी ते दीड वाजताच्या दरम्यान ऑपरेशन सिंदूर पूर्ण झाले. भारतीय दलांनी पाकिस्तानमध्ये बहावलपूर आणि मुरीदके येथे हल्ले केले आणि जैश आणि लष्करचे मुख्यालय उद्ध्वस्त केले. कित्येक वर्षांपासून या दोन्ही दहशतवादी संघटना सातत्याने भारताविरोधात कारवाया करत आहेत. हल्ल्यात जैश-ए-मोहम्मद प्रमूख मसूद अझहरचा भाऊ अब्दुल रौफ अझहर जो जैश-ए-मोहम्मदचा ऑपरेशनल प्रमुख आणि आयसी-८१४ अपहरणाचा मास्टरमाइ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121