पुणे-सोलापूर दरम्यानचा रेल्वे प्रवास सुसाट वेगात

दौंड-सोलापूर-वाडी रेल्वे ताशी १३० किलोमीटरने धावणार; मध्य रेल्वेकडून पायाभूत सुविधांची कामे बुलेट वेगात

    08-Jan-2025
Total Views | 95

railway


मुंबई, दि.८: प्रतिनिधी 
रेल्वे मार्गाचे अपग्रेडेशन झाल्यानंतर पुणे-दौंड नंतर आता सोलापूर-दौंडदरम्यानच्या मार्गावरही रेल्वे गाड्या ताशी १३० कि.मी. वेगाने येत्या काही दिवसांत धावतील. लवकरच याची अंमलबजावणी होणार असून पुणे-सोलापूर या मार्गावर रेल्वे ताशी १३० धावणार आहे. दौंड-सोलापूर-वाडी विभागांत एकूण ४४ जोड्या रेल्वे (LHB रेकसह ८८ट्रेन सेवा) सध्याच्या ११० किमी प्रतितास वरून १३० किमी प्रतितास वेगाने धावतील अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.
ट्रेनचा वेग वाढल्याने प्रवाशांवर लक्षणीय परिणाम होतो. वेग वाढल्याने प्रवासाचा वेळ कमी होईल आणि प्रवासी त्यांच्या गंतव्यस्थानी जलद पोहोचू शकतात, ज्यामुळे वेळेची बचत होईल. यातूनच उत्पादकता वाढेल आणि आर्थिक फायदा होईल. यामुळे भविष्यात मागणी पूर्ण करण्यासाठी गाड्यांची संख्या वाढवण्याची संधी निर्माण होईल. जलद गाड्यांमुळे प्रवाशांचे समाधान वाढू शकते, कारण प्रवासी अधिक कार्यक्षम आणि आरामदायी प्रवासाचा आनंद घेतात. वेगवान गाड्यांमुळे इंधनाचा वापर कमी होतो, परिणामी हरितगृह वायूचे उत्सर्जन कमी होते आणि कार्बन फूटप्रिंट कमी होतो. यामुळे मध्य रेल्वे वाहतुकीच्या इतर पद्धतीपेक्षा स्पर्धात्मक फायदा मिळणे, अधिक प्रवाशांना आकर्षित करणे आणि बाजारपेठेतील हिस्सा वाढवणे शक्य होईल.
धावत्या गाड्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आणि प्रवाशांना उत्तम प्रवास सोई मिळावी यासाठी, ट्रॅकची उत्तम दर्जाची देखभाल केली जात आहे. याचप्रमाणे आयुष्य कमी झालेल्या गाड्यांची, मालमत्तेची पुनर्स्थापना देखील प्राधान्याने केली जात आहे. सर्व कायमस्वरूपी आणि तात्पुरत्या वेगावरील निर्बंधांचे आणि गाड्या सुरक्षितपणे चालवण्यासाठी वेळोवेळी लागू केलेल्या सर्व निर्बंधांचे पालन करून संबंधित अधिकाऱ्यांनी सुरक्षिततेच्या सर्व पैलूंची आणि तांत्रिक तपासणीची खात्री केल्यानंतर गाड्यांचा वेग वाढवण्यात आला आहे, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
आधी शरिया आणि नंतर संविधान! कट्टरपंथी हाफिजुल हसनने तोडले अकलेचे तारे, भाजप नेते म्हणाले हा तर लोकशाहीचा घोर...

आधी शरिया आणि नंतर संविधान! कट्टरपंथी हाफिजुल हसनने तोडले अकलेचे तारे, भाजप नेते म्हणाले हा तर लोकशाहीचा घोर...

constitution झारखंडचे मंत्री हाफिजुल हसन यांनी सोमवारी १४ एप्रिल २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी संविधानाहून अधिक शरीयाला सर्वाधिक प्राधान्य देण्याबाबत वक्तव्य केले. त्यांनी आधी कुराण धर्मग्रंथास आपल्या हृदयात ठेवावे आणि संविधानाला आपल्या हातात ठेवावे, असा वक्तव्य केले. हसन यांनी केलेल्या अशा विधानावरून भाजप नेत्याने हसनला आरसा दाखवला आहे. भारतीय लोकशाहीचा घोर अपमान असल्याचा दावा आता भाजपने केला आहे. ज्यांच्या हृदयात शरीयत आहे त्यांच्यासाठी पाकिस्तान बांग्लादेशची दारं खुली राहणार आहेत. भारत ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121