संघ हा राजकीय पक्ष नाही, मग संविधान कसं बदलणार?

पद्मश्री रमेश पतंगे यांचे प्रतिपादन

    17-Jan-2025
Total Views | 54

Ramesh Patange RSS

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (RSS Samvidhan) 
"राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा काही राजकीय पक्ष नव्हे, संविधान दुरुस्ती करायची असेल तर ते काम राजकीय पक्षाचे आहे. पूर्णपणे संविधान बदलून टाकता येत नाही. मग संघ कसा काय संविधान बदलणार? असा आरोप करणे म्हणजे सर्वात मोठा विनोद आहे.", असे प्रतिपादन ‘हिंदुस्तान प्रकाशन संस्थे’चे अध्यक्ष पद्मश्री रमेश पतंगे यांनी केले. छत्रपती संभाजीनगर गुरुवार, दि. १७ जानेवारी रोजी समर्पण कार्यालयात 'आम्ही संघात का आहोत...' हे रमेश पतंगे लिखित पुस्तक प्रकाशित करण्यात आले. त्यावेळी झालेल्या एका मुलाखतीमध्ये बोलत होते.

हे वाचलंत का? : महाकुंभादरम्यान किन्नर आखाड्याची 'अघोर काली साधना'

दरम्यान 'धर्म भगवान महाविराचा' हे पुस्तकही प्रकाशित करण्यात आले. यावेळी प्रांत संघचालक अनिल भालेराव, पश्चिम क्षेत्र कार्यकारिणी सदस्य हरीश कुलकर्णी व देवगिरी प्रांत कार्यकारिणी सदस्य डॉ. दिवाकर कुलकर्णी उपस्थित होते. हरीश कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर डॉ. दिवाकर कुलकर्णी यांनी रमेश पतंगे यांची मुलाखत घेतली.

रमेश पतंगे पुढे म्हणाले की, "संघ समजून घ्यायचा असेल तर केवळ पुस्तक वाचून कळणार नाही. त्यासाठी संघात यावे लागेल. संघाविषयी अनेक अपप्रचार पसरवण्यात येतात. श्रीगुरुजी यांच्या साहित्यातील सोयीचे व अर्धवट संदर्भ घेऊन संघविषयी संभ्रम निर्माण केला जातो. या आरोपांमध्ये काही तथ्य नसते. संघ संविधान बदलणार हा तसाच आरोप. परंतु यासारखा दुसरा विनोद आणि गाढवपणा नाही. आरोप करणारे आपली वैचारिक पातळी यातून दाखवत असतात. संविधानात दुरुस्ती करता येते पण संविधान बदलणे अशक्य आहे. यावर न्यायालयात अनेक दीर्घ चर्चा झाल्या आहेत. संविधानाच्या मूलभूत संरचनेला कोणीही धक्का लावू शकत नाही. त्यामुळे या आरोपात काही तथ्य नाही."

अग्रलेख
जरुर वाचा

'या'देशातील मुस्लिमांना हजयात्रा करता येणार नाही, भारतासोबत १४ देशातील नागरिकांच्या व्हिसांवर बंदी

Hajj जगभरातील असंख्य मुस्लिम हजसाठी आणि उमराहसाठी सौदी अरेबियात दाखल होत असतात. यावेळी सौदी अरेबिया सरकारने कठोर पाऊल उचलत भारतासोबत इतर १४ देशांना तात्पुरता व्हिसा देण्यासाठी त्यांनी बंदी घातली आहे. सरकारचे म्हणणे आहे की, या देशामध्ये असंख्य लोक हे व्हिसा नियमांचे पालक करत नाहीत आणि नोंदणीशिवाय हजमध्ये सहभागी होणार नाहीत. यावेळी सरकारने कठोर भूमिका घेत नोंदणीशिवाय कोणालाही हजला जाता येणार नाही असे सांगितले आहे. जर विनानोंदणीचे कोणी आढळल्यास त्याला पाच वर्षांसाठी सौदी अरेबियेत प्रवेश दिला जाणार नाही...

कंपनीतील कर्मचार्‍यांना कुत्र्याप्रमाणे रांगायला, जमिनीवर पडलेली नाणी चाटण्यास भाग पाडलं; काय आहे केरळच्या व्हायरल व्हिडिओमागील सत्य?

कंपनीतील कर्मचार्‍यांना कुत्र्याप्रमाणे रांगायला, जमिनीवर पडलेली नाणी चाटण्यास भाग पाडलं; काय आहे केरळच्या व्हायरल व्हिडिओमागील सत्य?

Kerala Firm Viral Video : एका खाजगी कंपनीतील बॅासने कर्मचाऱ्यांसोबत अमानुष वागणूक केल्याचा संतापजनक प्रकार केरळमधून समोर आला आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये कंपनीच्या कर्मचाऱ्यांना दोरीने बांधलेल्या गळ्यात पट्टा लावलेल्या कुत्र्यांप्रमाणे रांगायला लावल्याचं दिसून येत आहे. या प्रकरणावर देशभरातून संताप व्यक्त होत असून संबंधित बॉसवर कडक कारवाईची मागणी होत आहे. कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कामगार मंत्रालयाने याची दखल घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत. अशातच आता हा कथित व्हिडिओ ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121