महाकुंभमेळातून उत्तरप्रदेशला २५ हजार कोटींचा महसुल अपेक्षित

२ लाख कोटींची एकुण उलाढाल अपेक्षित

    13-Jan-2025
Total Views | 52
 
 
तो
 
 
 
 
लखनऊ: हिंदू धर्मातील अतिशय पवित्र अशा महाकुंभमेळ्यास उत्तरप्रदेशातील प्रयागराज येथे सोमवार पासून सुरुवात होत आहे. धार्मिक महत्वासोबतच हा सोहळा अर्थकारणास जोरदार उसळी देणारा ठरणार आहे. या सोहळ्यातुन २ लाख कोटींच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष उलाढालीतून जवळपास २५ हजार कोटींचा महसुल या सोहळ्यातून अपेक्षित आहे. उत्तरप्रदेश सरकारच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे.
 
 
यंदाचा कुंभमेळा गर्दीचे उच्चांक मोडणारा ठरणार आहे. ४५ दिवसांच्या या सोहळ्यात तब्बल ३५ कोटी भाविक हजेरी लावणार असल्याचा अंदाज आहे. या होणाऱ्या मोठ्या सोहळ्यामुळे महिला स्वयंसहायता बचत गट, स्थानिक कारागीर, स्थानिक हॉटेल्स, तसेच हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील मोठ्या नाममुद्रा असलेले ब्रँड्स या सर्वच अर्थकारणाला मोठी फायदा होण्याची शक्यता आहे. या सर्वांकडून जवळपास ३ हजार कोटींची गुंतवणुक अपेक्षित आहे.
 
 
या संपुर्ण सोहळ्यासाठी उत्तरप्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने तब्बल ६ हजार नऊशे कोटी रुपयांची तरतूद करत विविध योजनांची सुरुवात केली आहे. त्यामध्ये सार्वजनिक स्वच्छतेसह आरोग्य योजनांवरही मोठी तरतूद करण्यात आली आहे. उत्तरप्रदेश सरकारकडून राज्याला १ लाख कोटींची अर्थव्यवस्था बनन्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्यादिशेने सुरु असलेल्या वाटचालीत या कुंभमेळ्यामुळे होणाऱ्या आर्थिक उलाढालींचा खुप फायदा होणार आहे.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
IPL सामना अनपेक्षितपणे रद्द; प्रिटी झिंटाकडून चाहत्यांची माफी धर्मशाळा स्टेडियममध्ये काय घडलं?

IPL सामना अनपेक्षितपणे रद्द; प्रिटी झिंटाकडून चाहत्यांची माफी धर्मशाळा स्टेडियममध्ये काय घडलं?

हिमाचल प्रदेशमधील धर्मशाळा येथील HPCA (हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन) स्टेडियममध्ये गुरुवारी एक अनपेक्षित घटना घडली. पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सुरू असलेला IPL सामना अवघ्या 10.1 षटकांतच अचानक थांबवण्यात आला. यामुळे स्टेडियममध्ये उपस्थित असलेले हजारो प्रेक्षक आणि चाहत्यांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. मात्र या सगळ्या परिस्थितीत अभिनेता आणि पंजाब किंग्जची सह-मालक प्रिटी झिंटा हिने मोठ्या संयमाने आणि जबाबदारीने परिस्थिती हाताळली. यानंतर तिने सोशल मीडियावर एक सविस्तर पोस्ट लिहून आपल्या..

पाहलगाम हल्ल्यानंतर अमिताभ बच्चन यांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले,जग मागतंय सिंदूर... चितेच्या राखेतून!

पाहलगाम हल्ल्यानंतर अमिताभ बच्चन यांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले,"जग मागतंय सिंदूर... चितेच्या राखेतून!''

भारत आणि पाकिस्तानमधील सीमेवरील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शस्त्रसंधी असूनही पाकिस्तानकडून कुरापती थांबलेल्या नाहीत. शनिवारी रात्री पुन्हा एकदा पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं. अशा परिस्थितीत देशाच्या जवानांची शौर्यगाथा सर्वत्र गौरवली जात आहे. अनेक बॉलिवूड कलाकार सोशल मीडियावरून आपल्या भावना व्यक्त करत आहेत. मात्र, या सगळ्या पार्श्वभूमीवर 'सदीच्या महानायक' अमिताभ बच्चन यांचं मौन कायम होतं. पाहलगाम येथील दहशतवादी हल्ला आणि 'ऑपरेशन सिंदूर'नंतरही त्यांनी सोशल मीडियावर काहीही प्रतिक्रिया दिली ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121