ड्रीम व्हिलेज अंतर्गत १ हजार गावांचा विकास

पहिल्या टप्प्यात ३०० गावांचा विकास

    06-Sep-2024
Total Views | 66
 
Dream village
 
 
मुंबई, दि.५ : प्रतिनिधी : राज्यातील एक हजार गावांच्या विकासासाठी महाराष्ट्र सरकार आणि 'स्वदेस फाऊंडेशन' यांच्यात करार करण्यात आला आहे. "ही गावे शाश्वत विकासाचे अनुकरणीय मॉडेल ठरतील," असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
 
'ड्रीम व्हिलेज' हा उपक्रम ग्रामीण समुदायांना सशक्तीकरणात महत्त्वाची भूमिका बजावेल. ही गावं योग्य तंत्रज्ञानाचा वापर करून जगासाठी खुले केली जातील. पर्यावरण आणि सामाजिकदृष्ट्या जागरूक राहून न्याय्य आणि शाश्वत विकासाकडे या गावांची वाटचाल होईल. शहरी भागातील कुटुंबांचे त्यांच्या गावात स्थलांतर करण्याचा एक अनोखा कार्यक्रम देखील या प्रकल्पाचा एक भाग आहे. इतरांसाठी शाश्वत विकासाचे मॉडेल तयार करणे हा यामागचा उद्देश आहे.
 
"महाराष्ट्र सरकार आणि 'स्वदेस फाऊंडेशन' यांच्यात करार पत्रावर स्वाक्षरी करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत साक्ष देताना खूप आनंद झाला! या करारामुळे पुढील ५ वर्षात संपूर्ण महाराष्ट्रात १,००० 'ड्रीम व्हिलेज' विकसित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सध्या, 'स्वदेस फाउंडेशन' नाशिक आणि रायगडमधील ११ ब्लॉक्समध्ये काम करत आहे आणि मार्च २०२५ पर्यंत ३०० गावांना 'ड्रीम व्हिलेज' म्हणून रूपांतरित करेल. ही गावे शाश्वत विकासाचे अनुकरणीय मॉडेल आहेत. 'स्वदेस' च्या संस्थापक संचालक झरीना स्क्रूवाला आणि मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी एलओआयवर स्वाक्षरी केली," अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
वक्फ कायदा मंजूरीनंतर उत्तर प्रदेशात वक्फ दाव्यावर पहिली पोलीस तक्रार

वक्फ कायदा मंजूरीनंतर उत्तर प्रदेशात वक्फ दाव्यावर पहिली पोलीस तक्रार

Waqf Act संसदेच्या दोन्ही सभागृहात वक्फ सुधारित कायदा पारित झाल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सही करत कायद्याला मंजूरी देत वाट मोकळी केली आहे. याचा देशभरात चांगला प्रतिसाद दिसत आहे. तर काही धर्मांध यांचा गैर अपप्रचार करत आहेत. वक्फ कायदा लागू झाल्यानंतर इतरांच्या मालकी हक्कांवर वक्फ दावा करणाऱ्यांना आता चाप बसणार आहे. अशातच आता असेच एक प्रकरण समोर आले आहे. ज्यात अवैधपणे जमिनींवर वक्फने दावा केला आणि आता त्याविरोधात पोलीस तक्रार करण्यात आली आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील बरेलीतील असल्याचे सांगण्यात ..

पश्चिम बंगालमधील हिंदूंसाठी धोक्याची

पश्चिम बंगालमधील हिंदूंसाठी धोक्याची 'ममता', मिथून चक्रवर्तींचा हल्लाबोल

Mamata Banerjee पश्चिम बंगालमध्ये वक्फ सुधारित कायद्यावरून रान पेटलं आहे. वक्फ सुधारित कायदा मंजूर झाल्यानंचर आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या हिंदूंसाठी धोक्याची घंटा ठरत असल्याचे प्रतिपादन भाजप नेते आणि अभिनेते मिथून चक्रवर्तींनी केले आहे. बंगालमध्ये वक्फ कायदा लागू होऊ देणार नसल्याचा दावा ममता बॅनर्जी यांनी केला आहे. यामुळे आपली व्होट बँक दुरावली जाऊ नये, हे लक्षात घेत कायद्या सुव्यवस्था न ठेवता बांग्लादेशप्रमाणे पश्चिम बांगलादेशची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच मिथून चक्रवर्तींनी बारताच्या संविधानाचा..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121