गुजरातमध्ये पावसाचा हाहाकार, २८ जणांचा मृत्यू , प्रशासन अलर्ट मोडवर

    29-Aug-2024
Total Views | 21

Gujrat Flood
 
गांधीनगर : गुजरात राज्यात पावसाने हाहाकार माजला आहे. या अतिवृष्टीमुळे एकूण २८ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील १८ जिल्हे हे जलमय झाले असून राज्याला मोठा हदरा बसला आहे. कच्छ, द्वारका, जामनगर, राजकोट ते वडोदरा पाण्यामध्ये बुडाले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
 
गुजरात येथील वडेदऱ्यातील विश्वामित्री नदीला पूर आल्याने रस्त्यांना जलमय स्वरूप प्राप्त झाले आहे. येथील सखल भागात पाणी साचले आहे. गुजरात येथील दुचाकी, चारचाकी वाहने पाण्यात बुडाली आहेत. यावेळी लष्कर मतद कार्य करत आहेत. कच्छ, द्वारका, जामनगर, मोरबी, सुरेंद्रनगर, जुनागड, राजकोट, बोताड, गीर सोमनाथ, अमरेली आणि भावनगर जिल्हे सर्वाधिक प्रभावित झाले आहेत.
 
 
 
येत्या ५ दिवसात अशीच परिस्थिती राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या पावसामुळे गुजरात येथील रस्ते मार्ग आणि रेल्वेमार्ग पाण्याखाली गेली आहेत. यामुळे गुजरात राज्यातील निम्मी दळणवळण सुविधा ठप्प पडली आहे. यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या वंदे भारत रेल्वे बंद करण्यात आल्याचे सांगितले गेले आहे. २९ ऑगस्ट रोजी हवामान खात्याने गुजरात येथील अकरा जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. तसेच उर्वरित २२ जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आल्याचे सांगितले.
 
वडोदरा शहर पाण्याखाली गेल्याने काही नागरिक पाण्यात अडकली आहेत. त्यांना वाचवण्यासाठी बचाव कार्य सुरू आहे. तसेच रेस्क्यूच्या मदतीने बचाव कार्य सुरू आहे. ५ हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यात आले आहे. लष्कर, प्रशासन, भारतीय हवाईदल बचाव कार्य अलर्ट मोडवर आहे. याप्रकरणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात येथील आलेल्या पुराचा आढावा घेत गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र यादव यांच्याशी चर्चा केली आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल, छत्तीसगढमध्ये २६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल, छत्तीसगढमध्ये २६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

Naxal free India छत्तीसगढ पोलिसांच्या ‘लोन वर्राटू’ अर्थात ‘घरी परत या’ या मोहिमेंतर्गत सोमवारी तब्बल २६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. त्यामुळे नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी पाऊल पडले आहे. छत्तीसगढ राज्यातील दंतेवाडा जिल्ह्यात सुरू असलेल्या नक्षल निर्मूलन मोहिम 'लोन वर्राटू' (आणि राज्य सरकारच्या पुनर्वसन धोरणामुळे एकूण २६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. यामध्ये ३ इनामी नक्षलवाद्यांचा समावेश आहे. हे आत्मसमर्पण ७ एप्रिल रोजी दंतेवाडा येथील डीआरजी कार्यालयात झाले. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांम..

ईशनिंदचा आरोप लावत जमावाने बांगलादेशी हिंदू युवकाला केली जबर मारहाण

ईशनिंदचा आरोप लावत जमावाने बांगलादेशी हिंदू युवकाला केली जबर मारहाण

Bangladeshi Hindu बांगलादेशातील टांगाइल जिल्ह्यात रविवार ६ एप्रिल २०२५ रोजी एका ४० वर्षीय हिंदू अखिल चंद्र मंडलवर काही कट्टरपंथींनी इशनिंदाचा आरोप करत जमावाने हल्ला केला आहे. कट्टरपंथीयांनी अखिल चंद्र मंडलवर इस्लमा धर्माविषयी आणि पैगंबर मोहम्मदांबाबत आरोप लावणयात आला आहे. ही माहिती प्रसारमाध्यमाद्वारे समोर आली आहे. त्यामुळे आता इतर वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,बांगलादेशात हिंदू अद्यापही सुरक्षित नसल्याचे वास्तव नाकारता येत नाही. यावेळी हल्ला सुरू असताना बचाव पथकाने मध्यस्थी केली, मात्र बचाव पथकाने ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121