शिवरायांचा भव्य आणि अत्युत्कृष्ट पुतळा उभारण्यासाठी संयुक्त समिती नेमणार! मुख्यमंत्री शिंदेंचे आदेश

    29-Aug-2024
Total Views | 29
 
Shinde
 
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य आणि अत्युत्कृष्ट पुतळा उभारण्यासाठी समिती नेमण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले आहेत. मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेसंदर्भात मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत बुधवारी वर्षा निवासस्थानी बैठक पार पडली.
 
या बैठकीमध्ये मालवण तालुक्यातील राजकोटमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्यामागची कारणे शोधणे आणि एकूणच या दुर्दैवी घटनेसंदर्भात विस्तृत कारणमीमांसा करण्यासाठी स्थापत्य अभियंते, तज्ञ, आयआयटी तसेच नौदलाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेली एक तांत्रिक संयुक्त समिती नेमण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले आहेत.
 
तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाला साजेसा भव्य आणि अत्युत्कृष्ट पुतळा उभारण्याच्या दृष्टीने देशातील उत्तम शिल्पकार, स्थापत्य अभियंते, तज्ञ, नौदलाचे अधिकारी यांची एक समिती नेमण्याचे निर्देशही यावेळी त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेत. नव्याने आणि भव्य स्वरुपात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तयार करून उभारण्यासाठी जे.जे. स्कूल ऑफ आर्टस, आयआयटी, स्थापत्य अभियंते, महाराष्ट्रातील नामांकित शिल्पकार, तसेच नौदलाचे तांत्रिक अधिकारी यांची एक समिती देखील नेमण्याचे निर्देशदेखील मुख्यमंत्री शिंदेंनी यावेळी दिले आहेत.
 
यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "झालेली घटना दुर्दैवी असून शिवभक्तांच्या भावना तीव्र आहेत. राजकोट येथे नौदल दिन साजरा करण्याच्या निमित्ताने नौदलाने हा पुतळा एका चांगल्या भावनेने उभारला होता. भविष्यात अशी दुर्घटना परत कधीच घडू नये, यासाठी अतिशय काळजी घेतली पाहिजे. यावेळी उभारण्यात येणारा शिवरायांचा पुतळा त्यांच्या लौकिकाला साजेसा हवा आणि यासाठी कुठेही निधी कमी पडू दिला जाणार नाही, असेही मुख्यमंत्री शिंदेंनी स्पष्ट केले.
 
या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) इक्बाल सिंग चहल, अतिरिक्त मुख्य सचिव सार्वजनिक बांधकाम मनिषा म्हैसकर, अतिरिक्त मुख्य सचिव (नगर विकास) असीम कुमार गुप्ता, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, व्हाईस ऍडमिरल अजय कोचर, रियर ऍडमिरल मनीष चढ्ढा, शिल्पकार राम सुतार, विनय वाघ, शशिकांत वडके उपस्थित होते.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
आधी शरिया आणि नंतर संविधान! कट्टरपंथी हाफिजुल हसनने तोडले अकलेचे तारे, भाजप नेते म्हणाले हा तर लोकशाहीचा घोर...

आधी शरिया आणि नंतर संविधान! कट्टरपंथी हाफिजुल हसनने तोडले अकलेचे तारे, भाजप नेते म्हणाले हा तर लोकशाहीचा घोर...

constitution झारखंडचे मंत्री हाफिजुल हसन यांनी सोमवारी १४ एप्रिल २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी संविधानाहून अधिक शरीयाला सर्वाधिक प्राधान्य देण्याबाबत वक्तव्य केले. त्यांनी आधी कुराण धर्मग्रंथास आपल्या हृदयात ठेवावे आणि संविधानाला आपल्या हातात ठेवावे, असा वक्तव्य केले. हसन यांनी केलेल्या अशा विधानावरून भाजप नेत्याने हसनला आरसा दाखवला आहे. भारतीय लोकशाहीचा घोर अपमान असल्याचा दावा आता भाजपने केला आहे. ज्यांच्या हृदयात शरीयत आहे त्यांच्यासाठी पाकिस्तान बांग्लादेशची दारं खुली राहणार आहेत. भारत ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121