यापुढे गडचिरोली राज्यातील ‘पहिला’ जिल्हा! स्थापना दिनानिमित्त उपमुख्यमंत्री फडणवीसांकडून शुभेच्छा

    26-Aug-2024
Total Views | 91

Devendra Fadanvis


गडचिरोली :
यापुढे गडचिरोली हा राज्यातील शेवटचा नाही, तर पहिला जिल्हा असेल, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शुभेच्छा दिल्या आहेत. गडचिरोली जिल्ह्याच्या स्थापनेला ४२ वर्ष पुर्ण झाल्याच्या निमित्ताने त्यांनी ट्विट करत नागरिकांना शुभेच्छा दिल्या.
 
 
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “गडचिरोली जिल्हा स्थापनेला आज ४२ वर्ष पूर्ण झाले असून जिल्ह्यातील नागरिकांना मी अतिशय मनापासून शुभेच्छा देतो. आपण सारे मिळून विकासाच्या आणखी नवनव्या उंची गाठू, हा संकल्प सारे मिळून करुया.”
 
हे वाचलंत का? - संजय राऊतांची उबाठांकडे तक्रार! महिलेचं पत्र व्हायरल
  
“गेल्या १० वर्षांत गडचिरोली जिल्ह्याने विकासाचे अनेक टप्पे गाठले. नक्षल जिल्हा म्हणून असलेली ओळख पुसत हळूहळू देशातील स्टिल शहर म्हणून ओळख होऊ लागली. या क्षेत्रात सुमारे ३० हजार कोटींची गुंतवणूक होत आहे. आपल्या गडचिरोलीत आता मेडिकल कॉलेज आणि विमानतळसुद्धा साकारतेय. समृद्धी महामार्गसुद्धा गडचिरोलीपर्यंत विस्तारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,” असे त्यांनी सांगितले.
 
ते पुढे म्हणाले की, “एकीकडे जिल्ह्याच्या विकासाचा आलेख उंचावत असताना या जिल्ह्यातून नक्षलवाद हद्दपार करण्यासाठी मोठा पुढाकार घेण्यात आला. गर्देवाडा, वांगेतुरी अशा सुदूर भागात पोलिस ठाणी सुरु झाली. पोलिस अधिकारी-कर्मचार्‍यांच्या निवासस्थानांची व्यवस्था करण्यात आली. रस्त्यांसह मोबाईल कनेक्टिव्हीटी वाढविण्यात आली. दादालोरा खिडकीसारख्या उपक्रमात आमचे पोलिस जनतेचे मित्र बनले. गडचिरोली हा राज्यातील शेवटचा नाही, तर पहिला जिल्हा आहे, हीच भूमिका घेत आम्ही काम करतो आहोत आणि यापुढेही करीत राहू,” असेही ते म्हणाले.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल, छत्तीसगढमध्ये २६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल, छत्तीसगढमध्ये २६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

Naxal free India छत्तीसगढ पोलिसांच्या ‘लोन वर्राटू’ अर्थात ‘घरी परत या’ या मोहिमेंतर्गत सोमवारी तब्बल २६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. त्यामुळे नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी पाऊल पडले आहे. छत्तीसगढ राज्यातील दंतेवाडा जिल्ह्यात सुरू असलेल्या नक्षल निर्मूलन मोहिम 'लोन वर्राटू' (आणि राज्य सरकारच्या पुनर्वसन धोरणामुळे एकूण २६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. यामध्ये ३ इनामी नक्षलवाद्यांचा समावेश आहे. हे आत्मसमर्पण ७ एप्रिल रोजी दंतेवाडा येथील डीआरजी कार्यालयात झाले. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांम..

ईशनिंदचा आरोप लावत जमावाने बांगलादेशी हिंदू युवकाला केली जबर मारहाण

ईशनिंदचा आरोप लावत जमावाने बांगलादेशी हिंदू युवकाला केली जबर मारहाण

Bangladeshi Hindu बांगलादेशातील टांगाइल जिल्ह्यात रविवार ६ एप्रिल २०२५ रोजी एका ४० वर्षीय हिंदू अखिल चंद्र मंडलवर काही कट्टरपंथींनी इशनिंदाचा आरोप करत जमावाने हल्ला केला आहे. कट्टरपंथीयांनी अखिल चंद्र मंडलवर इस्लमा धर्माविषयी आणि पैगंबर मोहम्मदांबाबत आरोप लावणयात आला आहे. ही माहिती प्रसारमाध्यमाद्वारे समोर आली आहे. त्यामुळे आता इतर वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,बांगलादेशात हिंदू अद्यापही सुरक्षित नसल्याचे वास्तव नाकारता येत नाही. यावेळी हल्ला सुरू असताना बचाव पथकाने मध्यस्थी केली, मात्र बचाव पथकाने ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121