नैसर्गिक मृत्यू नोंद होण्यास विलंब हे धक्कादायक; सुप्रीम कोर्टाचे बंगाल सरकारवर ताशेरे

    22-Aug-2024
Total Views | 42
supreme court on west bengal govt


नवी दिल्ली :         कोलकात्याच्या आरजी कार वैद्यकीय महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवरील बलात्कार – हत्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने बंगाल पोलिसांच्या निष्काळजीपणावर कठोर शब्दात ताशेरे ओढले. याप्रकरणी पुढील सुनावणी ५ सप्टेंबर रोजी होणार आहे. आरजी कार वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील बलात्कार – हत्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने या प्रकरणात पोलिसांनी केलेल्या निष्काळजीपणाबद्दल न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या हत्येचा गुन्हा अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंदवण्यात पोलिसांनी बराच वेळ घेतल्याविषयी न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.

सरन्यायाधी न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्या. जे. बी. पार्डिवाला आणि न्या. मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने या प्रकरणातील पोलिस कारवाईबाबत प्रश्न विचारले. ते म्हणाले की, 9 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6:10 ते 7:10 या वेळेत मृतांचे शवविच्छेदन झाले हे अतिशय आश्चर्यकारक आहे. यानंतर रात्री साडेअकरा वाजता अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली. नियमानुसार अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यापूर्वी शवविच्छेदन केले जाते. असे कसे होऊ शकते, असा सवाल न्यायालयाने केला.

ही अत्यंत अस्वस्थ करणारी वस्तुस्थिती आहे. बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल करणाऱ्या कोलकाता पोलिस अधिकाऱ्याला कोर्टाने पुढील सुनावणीत हजर राहण्याचे निर्देश दिले आणि गुन्हा नोंदवण्याच्या वेळेची माहिती देण्यास सांगितले आहे. या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने आंदोलक डॉक्टरांना कामावर परतण्यास सांगितले. कामावर परत आल्यास कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असे आश्वासनही न्यायालयाने त्यांना दिले.
 



अग्रलेख
जरुर वाचा
शिक्षण क्षेत्रात युट्युब करणार महाराष्ट्राला सहकार्य

शिक्षण क्षेत्रात युट्युब करणार महाराष्ट्राला सहकार्य

भारतात 'क्रिएटिव्हिटी'ला तोड नाही. देशात मोठ्या प्रमाणावर 'क्रिएटिव्हिटी' असून त्यामध्ये मुंबईचे स्थान अग्रगण्य आहे. मुंबई हे देशाचे ‘क्रिएटिव्ह कॅपिटल’ आहे. पुढील काळात मुंबईत आयआयसीटी (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी) स्थापन करण्यात येणार आहे. या इन्स्टिट्यूटच्या रचनेमध्ये युट्यूबचा सहभाग आवश्यक आहे. राज्यात शिक्षणाच्या क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या सहकार्याने बदल घडविण्यासाठी युट्यूबने सहकार्य केल्यास निश्चितच सकारात्मक परिणाम दिसतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला...

महाबळेश्वर येथे २ मे ते ४ मे

महाबळेश्वर येथे २ मे ते ४ मे 'महाराष्ट्र महापर्यटन उत्सव'चे आयोजन :पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

महाबळेश्वर येथे दि.२ ते ४ मे २०२५ रोजी 'महाराष्ट्र महापर्यटन उत्सव'चे आयोजन केले आहे. या उत्सवाच्या निमित्ताने महाबळेश्वर इथे ६० पंचतारांकित टेंट्स असतील, त्यात राहण्याची वेगळी अनुभूती लोकांना मिळणार आहे. लेझर शो,विविध पर्यटन सहली,सांस्कृतिक कार्यक्रमांचे २ ते ४ मे रोजी आयोजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, यांच्या मार्गदर्शनाखाली महापर्यटन उत्सव सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती पर्यटनमंत्री शंभुराज देसाई यांनी दिली...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121