बांगलादेशमधील आंदोलनात आणि त्यानंतरच्या हिंदूंवरील अत्याचारात ‘जमात-ए-इस्लामी’चा हात असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा या ‘जमात-ए-इस्लामी’चा इतिहासही तसा हिंदूविरोधाने बरबटलेलाच. शेख हसीना यांनीही आपल्या राजकीय कारकिर्दीत ‘जमात-ए-इस्लामी’लावर बंदी लादत, या कट्टरतावादी संघटनेचे कंबरडे मोडण्याचा पुरता प्रयत्न केला. तेव्हा, अशा या बांगलादेशातील हिंदू हिंसाचारामागचा क्रूर चेहरा असलेल्या ‘जमात-ए-इस्लामी’च्या कुकर्मांवर प्रकाश टाकणारा हा लेख..
बांगलादेशात नुकतेच मोहम्मद युनूस यांचे अंतरिम सरकार स्थापन झाले. बांगलादेशातील हिंदू विद्यार्थी आणि नेत्यांसोबत मोहम्मद युनूस यांची नुकतीच एक बैठकही संपन्न झाली. सत्तांतरानंतर हिंदूंवर झालेल्या हल्ल्यासंदर्भात हे पाऊल उचलण्यात आले, हे विशेष. या बैठकीत हिंदूंच्या सुरक्षेबाबत चर्चाो केली गेली. 52 जिल्ह्यांत हिंदूंवर झालेल्या हल्ल्यासंदर्भात 200 हून अधिक घटना घडल्या आहेत. बांगलादेशातील नवनिर्वाचित सरकार मोहम्मद युनूस यांच्या सरकारने हिंदूंवर झालेल्या हिंसेबाबत चिंता व्यक्त केली. बांगलादेशी हिंदूंनी यासंदर्भात आठ मागण्या केल्या आहेत. ज्यामध्ये हिंदू अल्पसंख्याकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी नवा कायदा अमलात आणावा, ही त्यांची प्रमुख मागणी आहे.
पाकिस्तानच्या ‘आयएसआय’ने शेख हसीना यांच्यावर दबाव आणण्यासाठी विद्यार्थ्यांचा वापर केला. यामागे पाकिस्तानचा भारतविरोधी सरकार स्थापन करण्याचा उद्देशही होता. हसीना यांच्या विरोधात ‘आयएसआय’चे ‘स्लीपर सेल’ सक्रिय केले गेले असल्याची माहिती आहे. ‘आयएसआय’ ढाक्यातील परिस्थिती आणखी बिघडवण्यासाठी ‘जमात-ए-इस्लामी’ आणि त्यांची विद्यार्थी संघटना ‘छात्रशिविर’चा वापर करत आहे. ‘जमात-ए-इस्लामी’ ही संघटना पाकिस्तानच्या अत्यंत जवळची मानली जाते. त्यांना वेळोवेळी गुप्त निधी दिला जात आहे. त्यांना ढाक्यातील पाकिस्तानी अधिकार्यांकडून नियमित माहिती/सूचना मिळतात.
चीनच्या राज्य आणि सुरक्षा मंत्रालयानेदेखील या आंदोलनाला पाठबळ दिले आहे. हसीना यांनी भारत आणि चीन यांच्यात कराराबाबत असो किंवा इतर काही प्रकल्पांबाबत, कायम समतोल साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, चीनने भारताच्या आजूबाजूच्या देशांवर आपले नियंत्रण ठेवले आहे आणि बांगलादेशात लष्कराच्या पाठिंब्याने सरकार स्थापन झाल्यास चीनशी जवळीक वाढेल, हादेखील यागील हेतू आहे.
हिंदूंवर झालेला हल्ल्याबाबत बांगलादेशच्या सरकारने माफी मागितली
अंतरिम सरकारच्या गृह विभागाचे सल्लागार एम. शखावत हुसैन यांनी अल्पसंख्याकांच्या सुरक्षेत झालेली चूक ही एक मोठी चूक आहे, असे ते म्हणाले. ते म्हणाले की, ही चूक केवळ सरकारची नाही, तर अवघ्या कट्टरपंथींची आहे. दोन्हीही आपले कर्तव्य बजावण्यास असक्षम ठरले आहेत. बांगलादेशात हिंदूंवर झालेला हल्ल्याबाबत बांगलादेशच्या सरकारने माफी मागितली आहे.
बांगलादेशातील हिंदू आपल्या सुरक्षेविषयी अत्यंत घाबरले आहेत. याचबरोबर भारतीय सीमेवर काहींनी पलायन केले आहे. एका बाजूला काही कट्टपंथीयांनी त्यांही क्रूर हत्या केली. त्यानंतर बांगलादेशच्या काही महिलांवर त्यांनी आत्याचार केला.
हिंसाचारामध्ये ‘जमात-ए-इस्लामी’ चा सर्वात मोठा वाटा
बांगलादेशात झालेल्या हिंदू विरोधात झालेल्या हिंसाचारामध्ये तेथील‘जमात-ए-इस्लामी’ या कट्टरपंथी संघटनेचा सर्वात मोठा वाटा होता. याशिवाय अनेक युवकही या हिंसाचारात सामील झाले. ज्यांचे मुख्य काम होते हिंदूंच्या घरातून सामान पळवायचे, त्यांच्या बायकांवरती अत्याचार करायचा आणि सध्या उद्भवलेल्या हिंसाचारामध्ये आपला स्वतःचा फायदा करून घ्यायचा.
मात्र, ‘जमात-ए-इस्लामी’चा हिंदू विरोधातील हिंसाचार हा अत्यंत जुना आहे आणि याची सुरुवात होते 1971 साली. ज्या वेळेला पाकिस्तानी सैन्याने ‘जमात-ए-इस्लामी’च्या मदतीने 1971 च्या युद्धापूर्वी 40 लाख तत्कालीन पूर्व पाकिस्तानी नागरिकांना मारले, ज्यामध्ये 30 लाख हे पूर्व पाकिस्तानमधले हिंदू होते आणि दहा लाख हे तिथे असलेले ‘अवामी लीग’ या पक्षाचे समर्थक होते.
1971 नंतर अनेक वेळा बांगलादेशमध्ये वेगवेगळ्या कारणाने हिंसाचार झाला आणि त्यामध्ये सर्वात जास्त टार्गेट केले गेले ते म्हणजे, तिथे असलेल्या हिंदूंना. बांगलादेशमध्ये हिंदूंची संख्या 1950 साली 24 टक्के एवढी होती. ती आता 2024 मध्ये कमी होऊन आठ टक्के एवढी झाली आहे. येणार्या पाच वर्षांमध्ये बांगलादेशी हिंदूंची संख्या ही सध्याच्या आठवरून शून्य टक्क्यांवरती येईल. मग हिंदू गेले कुठे? ते मारले गेले किंवा त्यांनी धर्मपरिवर्तन केले किंवा काही भारतामध्ये पळून आले. आपण ‘जमात-ए-इस्लामी’च्या इतिहासावर थोडी चर्चा करूया.
‘जमात-ए-इस्लामी’ची स्थापना
‘जमात-ए-इस्लामी’ ही एक धार्मिक व राजकीय संघटना आहे, ज्याचा प्रभाव दक्षिण आशियात विशेषतः पाकिस्तान, भारत आणि बांगलादेशात दिसून येतो. या संघटनेचा इतिहास वादग्रस्त असून, अनेक विवाद आणि हिंसाचाराच्या घटनांमध्ये या संघटनेचा सहभाग आहे. विशेषतः बांगलादेशातील अशांतता आणि तेथील राजकीय घटनांमध्ये या संघटनेची महत्त्वाची भूमिका असल्याचे दिसते.
‘जमात-ए-इस्लामी’ची स्थापना 1941 साली मौलाना अबुल आला मौदूदी यांनी लाहोर येथे केली होती. संघटनेचे मुख्य ध्येय इस्लामिक राज्याची स्थापना करणे होते. त्यांनी इस्लामी कायद्याच्या आधारे समाज व शासन चालवण्याचे विचार मांडले. या संघटनेची सुरुवात धार्मिक विचारप्रणाली आणि राजकीय दृष्टिकोनाच्या आधारावर झाली.
‘जमात-ए-इस्लामी’चा वादग्रस्त इतिहास
‘जमात-ए-इस्लामी’चा इतिहास वादग्रस्त आणि विवादित घटनांनी भरलेला आहे. 1971 साली बांगलादेशाच्या स्वातंत्र्य संग्रामादरम्यान, ‘जमात-ए-इस्लामी’ने पाकिस्तानच्या बाजूने भूमिका घेतली आणि त्याचा परिणाम बांगलादेशाच्या स्वातंत्र्यलढ्यात मोठ्या प्रमाणात हिंसाचारात झाला. बांगलादेशातील अनेक व्यक्तींनी या संघटनेवर मानवाधिकारांच्या उल्लंघनाचे आरोपदेखील केले आहेत.
बांगलादेशमधील अशांततेत ‘जमात-ए-इस्लामी’चा सहभाग
बांगलादेशातील अशांततेत ‘जमात-ए-इस्लामी’ आणि तिच्या विद्यार्थी संघटनेचा, ‘छात्रशिबीर’, महत्त्वाचा सहभाग राहिला आहे. विशेषतः 2013 साली झालेल्या घटनांमध्ये, जेव्हा या संघटनेच्या नेत्यांच्या विरोधात युद्धगुन्हे सिद्ध झाले, त्यावेळी बांगलादेशात मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला. या हिंसाचारात ‘जमात-ए-इस्लामी’च्या कार्यकर्त्यांचा सहभाग असल्याचे अनेक माध्यमांनी दाखवले आहे.
‘जमात-ए-इस्लामी’ला सरकारने कसा प्रतिसाद दिला?
बांगलादेशातील हसीना सरकारने ‘जमात-ए-इस्लामी’च्या विरोधात कठोर पावले उचलली. अनेक नेत्यांना युद्धगुन्ह्यांमध्ये दोषी ठरवण्यात आले असून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. 2013 साली, बांगलादेशातील न्यायालयाने ‘जमात-ए-इस्लामी’ला राजकीय पक्ष म्हणून बेकायदेशीर ठरवले, ज्यामुळे या संघटनेच्या राजकीय कारवायांवर मर्यादा आल्या.
‘जमात-ए-इस्लामी’बाबत शेख हसीना यांची भूमिका
बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी ‘जमात-ए-इस्लामी’बाबत कठोर भूमिका घेतली आहे. त्यांनी या संघटनेच्या हिंसक आणि विवादास्पद कारवायांच्या विरोधात कटाक्षाने पावले उचलली आहेत. हसीना यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ‘जमात-ए-इस्लामी’च्या अनेक नेत्यांना न्यायालयाच्या माध्यमातून न्यायालयीन कारवाईत अडकवले.
‘जमात-ए-इस्लामी’चे पतन 2010 पासून सुरू झाले आहे. न्यायालयीन निर्णय, नेत्यांची फाशी आणि संघटनेच्या विरोधातील जनआंदोलन यामुळे संघटनेचा प्रभाव कमी झाला आहे. त्याचबरोबर सरकारने ‘जमात-ए-इस्लामी’च्या विविध शाखांना बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
‘जमात-ए-इस्लामी’चा जागतिक प्रभाव त्यांच्या धार्मिक विचारधारांमुळे असून, त्याचे विचार पाकिस्तान, भारत आणि इतर मुस्लीम राष्ट्रांमध्ये लोकप्रिय आहेत. तथापि, त्यांच्या हिंसक कारवायांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्या विचारधारेवर टीका होत आहे.
निष्कर्ष
‘जमात-ए-इस्लामी’ ही एक वादग्रस्त आणि विवादास्पद संघटना आहे. तिच्या इतिहासात अनेक हिंसक घटना आणि विवाद आहेत. बांगलादेशातील तिच्या भूमिकेवर आधारित, ही संघटना आता राजकीय दृष्टिकोनातून आणि जागतिक स्तरावर मागे पडली आहे. सरकारच्या कठोर धोरणांमुळे तिच्या राजकीय कारवायांवर मर्यादा आल्या असून, तिचा प्रभाव कमी झाला आहे. ‘जमात-ए-इस्लामी’ ही संघटना तिच्या इतिहासातील वादग्रस्त भूमिकेमुळे विशेषतः बांगलादेशमध्ये खूपच विवादित ठरली आहे. स्वतंत्र बांगलादेशाच्या स्थापनेनंतर या संघटनेला त्याच्या युद्धगुन्ह्यांसाठी कठोर प्रतिसाद मिळाला, बांगलादेशमध्ये सरकारविरोधात चालू असलेल्या हिंसक आंदोलनांमध्ये त्यांच्या मोठा वाटा होता.
मात्र आता येणार्या काळामध्ये आणि आगामी बांगलादेशमधील सरकारमध्ये ‘जमात-ए-इस्लामी’चा राजकीय प्रभाव हा अत्यंत महत्त्वाचा असेल. कारण, हसीनांच्या विरोधात असलेली ‘बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी’ पूर्णपणे ‘जमात-ए-इस्लामी’च्या प्रभावाखाली आहे. यामुळे असे मानले जाते की, येणार्या काळामध्ये बांगलादेशमधील हिंदूंचे भवितव्य अतिशय कठीण होणार आहे. भारत सरकारने बांगलादेशमधील परिस्थितीवर लक्ष ठेवून, तेथील अल्पसंख्याक हिंदूंचे रक्षण करायला पाहिजे, अन्यथा आगामी पाच वर्षांमध्ये बांगलादेशी हिंदूंची संख्या ही सध्याच्या आठ टक्क्यांवरून शून्य टक्क्यांवरती येईल.