एक्सप्रेस रद्द, लोकल ठप्प! मुंबईत पावसामुळे प्रवाशांचे हाल

    08-Jul-2024
Total Views | 87
 
Rain
 
मुंबई : मुंबईत पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या असून लोकलसेवा विस्कळीत झाली आहे. रविवारी रात्री १ वाजतापासून सकाळीपर्यंत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे ट्रॅकवर प्रचंड पाणी तुंबले आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.
 
आज सकाळी कोल्हापूर-महालक्ष्मी एक्प्रेस ४ ते ५ तास अंबरनाथमध्येच रखडली होती. दरम्यान, ही गाडी सायडिंगला उभी केल्याने प्रवाशांचे हाल झाले. तर दुसरीकडे सिंहगड एक्सप्रेस, डेक्कन एक्सप्रेस आणि प्रगती एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.
 
हे वाचलंत का? -  गरज असेल तरच घराबाहेर पडा; मुख्यमंत्री शिंदेंच्या नागरिकांना सूचना
 
रविवारी मध्यरात्रीपासून मुंबईत ३०० मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली असून रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. दादर, सायन, कुर्ला, चुनाभट्टी रेल्वे स्थानक परिसरात पाणी तुंबले आहे. त्यामुळे मध्य रेल्वेवरील गाड्या उशीराने धावत असल्याने रेल्वे स्थानकांवर प्रवाशांनी प्रचंड गर्दी केली आहे.
 
दरम्यान, प्रशासनाकडून रेल्वे ट्रॅकवरील पाणी काढण्याचं काम सुरु असून लवकरच वाहतूक पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रेल्वे सेवा विस्कळीत झाल्यामुळे अनेकांनी बसस्थानकांवर गर्दी केली आहे. त्यामुळे रस्त्यावर वाहतूककोंडी झाली आहे.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे पूर्ण होतील. संघाचा जन्म, जन्मापासून करावा लागलेला संघर्ष, विस्तार व आज समाजातील सर्वच क्षेत्रांवर संघाचा पडलेला लक्षणीय प्रभाव, या सार्‍या प्रक्रियांबाबत समाजात, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही कमालीचे कुतूहल आहे. यांसारख्या विविध विषयांवर ‘ऑर्गनायझर’चे संपादक प्रफुल्ल केतकर, ‘पांचजन्य’चे संपादक हितेश शंकर, सा. ‘विवेक’च्या संपादक अश्विनी मयेकर आणि मल्याळम दैनिक ‘जन्मभूमी’चे सहसंपादक एम. बालकृष्णन यांनी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद.....

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121