अशाप्रकारे जर जीन्स टी-शर्टवर बंदी आली तर विद्यार्थी रस्त्यावर उतरतील!

आमदार प्रताप सरनाईक यांचा चेंबूरच्या "त्या" महाविद्यालयाला इशारा

    03-Jul-2024
Total Views | 107
 
Pratap Sarnaik
 
मुंबई : जर जीन्स आणि टी शर्टवर बंदी आली तर विद्यार्थी रस्त्यावर उतरतील, असा कडक इशारा शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी चेंबुरच्या आचार्य आणि मराठे महाविद्यालयाला दिला आहे. आचार्य आणि मराठे महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना जीन्स आणि टीशर्ट घालण्यास मनाई करणारे परिपत्रक काढले. यावर प्रताप सरनाईक यांनी कारवाईची मागणी केली आहे.
 
प्रताप सरनाईक म्हणाले की, "आचार्य आणि मराठे महाविद्यालयामध्ये काल एक परिपत्रक काढण्यात आलं आणि यात विद्यार्थ्यांच्या गणवेशावर गदा आणण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात जीन्स आणि टी-शर्ट परिधान करु नये, असे या परिपत्रकात म्हटले आहे. अनेक पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी याला विरोध केला आहे. चेंबुरच्या आचार्य आणि मराठे महाविद्यालयात ज्यापद्धतीने हे परिपत्रक काढलं तसंच जर मुंबई किंवा महाराष्ट्रातील इतर विद्यालयांनी काढलं तर कदाचित विद्यार्थी रस्त्यावर उतरतील."
 
हे वाचलंत का? -  पुणे अपघात प्रकरण! वडील आणि आजोबाला जामीन मंजूर, पण विशाल अग्रवाल...
 
"हिजाब ही वेगळी गोष्ट आहे आणि जीन्स, टी-शर्ट व जर्सी परिधान करणं ही वेगळी गोष्ट आहे. उद्या जर स्पोर्ट्स डे असेल तर स्विमींगचा गणवेश, खेळाडूंचे टीशर्ट आणि शॉर्ट्सवर तुम्ही बंदी घालणार आहात का? त्यामुळे तालिबानी वटहुकुम काढल्यासारखं परिपत्रक मुंबईतील आचार्य आणि मराठे महाविद्यालयाने काढलं आहे. मी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं असून सभागृहातसुद्धा यावर मी आवाज उठवणार आहे," असे ते म्हणाले.
 
ते पुढे म्हणाले की, "देशातच नाही तर परदेशातसुद्धा ७० ते ८० टक्के तरुण मुलं मुली जीन्स टीशर्ट परिधान करत असताना मुंबईच्या एका महाविद्यालयात हिजाब बंदीवरून जर जीन्स टीशर्टवर बंदी आणण्यात येत असेल तर हा लोकशाहीचा खून आहे. विद्यार्थ्यांच्या अधिकारावर गदा आणण्याचा प्रकार या महाविद्यालयाने केला आहे. त्यामुळे त्यांनी आणलेली बंदी काढावी आणि अशा प्रकारे तालीबानी हुकुम काढणाऱ्या व्यवस्थापकावर आणि संस्था चालकावर कारवाई करावी. मला मिळालेल्या माहितीनुसार, स्वत:ला पत्रकार म्हणवणारे आणि संपादक असणारे लोक यामागे आहेत. ते जाणूबुजून महाविद्यालयावर दबाव आणून परिपत्रक काढायला भाग पाडत आहेत. त्यामुळे आम्ही त्यांचा निषेध करतो आणि यावर कारवाई करण्याची मागणी करतो," असेही ते म्हणाले.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
शेती ही केवळ अन्न देणारी व्यवस्था नसून, ती संस्कृती, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार आहे- उपमुख्यमंत्री अजित पवार

शेती ही केवळ अन्न देणारी व्यवस्था नसून, ती संस्कृती, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार आहे- उपमुख्यमंत्री अजित पवार

“शेती ही केवळ अन्न देणारी व्यवस्था नसून, ती संस्कृती, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार आहे” ही समज ठेवून आपण जर एकत्र काम केले, तर महाराष्ट्राची शेती ही डिजिटल युगात जगाला दिशा देणारी शेती बनेल, असा विश्वास उपमख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. राज्य शासनाचा कृषी विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि कृषी महाविद्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सिंचन नगर मैदान, कृषी महाविद्यालय येथे आयोजित पुणे ॲग्री हॅकॅथॉन कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते...

सामाजिक संघटन व परिवर्तन हे संघाचे यशस्वी मॉडेल : अनिल जोशी

सामाजिक संघटन व परिवर्तन हे संघाचे यशस्वी मॉडेल : अनिल जोशी

“राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाच्या यात्रेने हे सिद्ध केले की, सामाजिक संघटन आणि सामाजिक परिवर्तन हे प्रभावी मॉडेल आहे,” असे उद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महाराष्ट्र, गोवा, गुजरात क्षेत्र बौद्धिक प्रमुख अनिल जोशी यांनी काढले. रा. स्व. संघाचा पश्चिम क्षेत्र स्तरावरील कार्यकर्ता विकास वर्ग-प्रथमचा प्रकट समारोप नुकताच विद्याप्रबोधिनी प्रशालेच्या मैदानावर पार पडला. त्यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे ‘आर्मस्ट्राँग’ कंपनीचे सहसंस्थापक व कार्यकारी संचालक ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121