दहशतद्यांना घरात आश्रय, वायफायच्या मदतीने पाकिस्तानमध्ये संपर्क; देशासोबत गद्दारी करणाऱ्या शौकत अलीला अटक

    18-Jul-2024
Total Views | 101

 INDIAN ARMY

 
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात दि. १५ जुलै रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४ जवानांच्या बलिदानानंतर आणखी एक दहशतवादी हल्ला झाला आहे. कास्तीगड भागातील जद्दन बाटा गावात हा हल्ला झाला. गुरुवार, दि. १८ जुलै २०२४ झालेल्या या हल्ल्यात लष्कराचे दोन जवान जखमी झाले. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
 
सोमवारी हल्ला करणारे हे तेच दहशतवादी असल्याचे मानले जात आहे. अशा स्थितीत एकीकडे लष्कराच्या जवानांनी या दहशतवाद्यांविरोधात शोधमोहीम सुरू केली असताना, दुसरीकडे डोडा पोलिसांनी जिल्ह्यातील दहशतवाद्यांच्या आश्रयदात्यांना शोधून त्यांच्यावर कारवाई करण्यास सुरूवात केली आहे.
 
दि. १७ जून रोजी या संदर्भात माहिती देताना डोडा पोलिसांनी सांगितले की, जून आणि जुलैमध्ये झालेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून डोडा पोलिसांनी स्थानिक पातळीवर दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. पोलिसांनी दहशतवाद्यांची मदत करणाऱ्या शौकत अली नावाच्या व्यक्तीला अटक केल्याचे समोर आले आहे.
 
शौकत अलीचे दहशतवाद्यांशी संबंध असल्याचे सांगण्यात येत असून तो ओव्हरग्राउंड वर्कर आहे. शौकत अलीवर आरोप आहे की, लष्कराच्या जवानांवर हल्ला करणाऱ्या तीन दहशतवाद्यांना त्याने काही दिवस आपल्या घरात ठेवले होते आणि यादरम्यान त्याने त्यांना फक्त खाण्यापिण्याची व्यवस्था केली नाही तर त्यांना वायफायही पुरवले ज्याद्वारे ते पाकिस्तानमध्ये बसलेल्या हॅन्डलरशी संवाद साधू शकले. पोलिसांनी शौकत अलीला पकडले असून त्याची चौकशी सुरू आहे. याआधीही तपास यंत्रणांनी कारवाई करत दहशतवाद्यांच्या आश्रयदात्यांना अटक केली आहे.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाचे थैमान! 
 ८३ जणांचा मृत्यू, तर काही राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेनं अंगाची लाही लाही

उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाचे थैमान! ८३ जणांचा मृत्यू, तर काही राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेनं अंगाची लाही लाही

weather update देशात अवकाळी पावसाने नागरिकांना चांगलेच झोडपले आहे. त्यामुळे काही अंशी प्रमाणात नागरिकांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. महाराष्ट्रात काही दिवसांआधी ढगाळ वातावरण होते. तर काही बागात रिमझिम पावसाच्या सरी आल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर अशातच आता राज्यानंतर उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. वादळी वाऱ्यासोबत अवकाळी पावसाने धिंगाणा घातला आहे. यामुळे जिवीत हाणी झाल्याचे वृत्त आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये १० एप्रिल २०२५ रोजी वादळी वाऱ्यामुळे एक दोन नाहीतर ..

तहव्वूर राणाच्या एनआयए चौकशीला सुरुवात! एनआयए मुख्यालयाबाहेर सुरक्षेत वाढ; फक्त १२ अधिकाऱ्यांनाच चौकशी कक्षात प्रवेश

तहव्वूर राणाच्या एनआयए चौकशीला सुरुवात! एनआयए मुख्यालयाबाहेर सुरक्षेत वाढ; फक्त १२ अधिकाऱ्यांनाच चौकशी कक्षात प्रवेश

(Tahawwur Rana's NIA Interrogation Begins) २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार दहशतवादी तहव्वूर राणाचे अखेर गुरुवारी १० एप्रिल रोजी तब्बल १७ वर्षांनी भारतात यशस्वी प्रत्यार्पण झाले आहे. गुरुवारी १० एप्रिलला रात्री राणाला दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी एनआयएच्या विशेष न्यायालयाकडे एनआयएने २० दिवसांची कोठडी मागितली होती. परंतु, न्यायालयाने एनआयएला राणाची १८ दिवसांची कोठडी दिली. ताब्यात घेतल्यानंतर, तहव्वूर राणाची आता एनआयए मुख्यालयात चौकशीला सुरुवात झाली ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121